शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी अखिलेश यादवांना तब्बल ७ वर्षांनी भेटले; अखिलेश म्हणाले, आग्रा हे प्रेमाचे दुकान...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 08:38 IST

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस व सपात जागावाटपानंतर राहुल गांधी आणि अखिलेश यादव पहिल्यांदाच एकत्र दिसले, सपा आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.

आग्रा : राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेत आग्रा येथे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादवही सहभागी झाले. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस व सपात जागावाटपानंतर राहुल गांधी आणि अखिलेश यादव पहिल्यांदाच एकत्र दिसले, सपा आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.

राहुल गांधी म्हणाले की, भारतातील जनतेने, शेतकरी आणि मजुरांनी मला सांगितले की हिंसा आणि द्वेषाचे कारण अन्याय आहे. या देशात २४ तास गरिबांवर अन्याय होत आहे.

अखिलेश म्हणाले की, आग्रा हे प्रेमाचे दुकान म्हणून जगात ओळखले जाते. या शहरातून प्रेम घ्या आणि देशभरात द्या. प्रियंका गांधी म्हणाल्या की, आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. अखिलेश आणि राहुल ७ वर्षांनंतर एकत्र आले आहेत. त्याचा उत्तरप्रदेशला फायदा होईल. 

चिनी मालामुळे आले 'गंभीर संकट'• राहुल गांधींनी लॉक इंडस्ट्रीचे केंद्र असलेल्या अलीगढमध्ये चिनी बनावटीच्या वस्तूंच्या विक्रीचा मुद्दा उपस्थित केला आणि स्थानिक कारागिरांना येणाऱ्या समस्यांचा उल्लेख केला.ते म्हणाले की, भारतीय बाजारपेठांमध्ये चिनी बनावटीच्या वस्तूंचा पूर आल्याने स्वदेशी लघु, कुटीर उद्योग आणि कारागीर यांच्यावर 'गंभीर परिणाम' झाला आहे. भारत जोडो न्याय यात्रा एकता, बंधुता आणि समरसतेचा संदेश देते.• ही यात्रा येणाऱ्या पिढ्यांना संदेश देईल की, एक सरकार देशाची अखंडता, सार्वभौमत्व आणि राज्यघटना नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत असताना आम्ही या यात्रेच्या माध्यमातून त्यांना रोखण्याचे काम केले होते.आज शेतकरी सरकारच्या विरोधात उभा आहे.

सरकार शेतकऱ्यांच्या ताकदीमुळे घाबरले आहे. यावेळी शेतकऱ्यांना सन्मान दिला जाईल. पीडीएला (मागास, दलित, अल्पसंख्याक) जो सन्मान मिळायला हवा होता तो इतक्या वर्षानंतरही मिळाला नाही आणि जो मिळत होता तोही भाजपने लुटला आहे.- अखिलेश यादव, सपा, अध्यक्ष 

अन्याय काळात बेरोजगारी हे सर्वात मोठे संकट बनले आहे. अग्निवीर योजना आणून सैन्यात भरती होण्याच्या तयारीत असलेल्या तरुणांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. लाखो सरकारी पदे रिकामी आहेत, पण वर्षानुवर्षे भरली जात नाहीत. पदे भरण्यास सुरुवात झाली की पेपर फुटतो. अन्यायाविरुद्ध एकत्र व्हा. न्याय मिळत नाही तोपर्यंत लढत रहा.  - प्रियांका गांधी, सरचिटणीस काँग्रेस

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAkhilesh Yadavअखिलेश यादवBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा