शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

राहुल गांधी अखिलेश यादवांना तब्बल ७ वर्षांनी भेटले; अखिलेश म्हणाले, आग्रा हे प्रेमाचे दुकान...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 08:38 IST

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस व सपात जागावाटपानंतर राहुल गांधी आणि अखिलेश यादव पहिल्यांदाच एकत्र दिसले, सपा आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.

आग्रा : राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेत आग्रा येथे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादवही सहभागी झाले. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस व सपात जागावाटपानंतर राहुल गांधी आणि अखिलेश यादव पहिल्यांदाच एकत्र दिसले, सपा आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.

राहुल गांधी म्हणाले की, भारतातील जनतेने, शेतकरी आणि मजुरांनी मला सांगितले की हिंसा आणि द्वेषाचे कारण अन्याय आहे. या देशात २४ तास गरिबांवर अन्याय होत आहे.

अखिलेश म्हणाले की, आग्रा हे प्रेमाचे दुकान म्हणून जगात ओळखले जाते. या शहरातून प्रेम घ्या आणि देशभरात द्या. प्रियंका गांधी म्हणाल्या की, आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. अखिलेश आणि राहुल ७ वर्षांनंतर एकत्र आले आहेत. त्याचा उत्तरप्रदेशला फायदा होईल. 

चिनी मालामुळे आले 'गंभीर संकट'• राहुल गांधींनी लॉक इंडस्ट्रीचे केंद्र असलेल्या अलीगढमध्ये चिनी बनावटीच्या वस्तूंच्या विक्रीचा मुद्दा उपस्थित केला आणि स्थानिक कारागिरांना येणाऱ्या समस्यांचा उल्लेख केला.ते म्हणाले की, भारतीय बाजारपेठांमध्ये चिनी बनावटीच्या वस्तूंचा पूर आल्याने स्वदेशी लघु, कुटीर उद्योग आणि कारागीर यांच्यावर 'गंभीर परिणाम' झाला आहे. भारत जोडो न्याय यात्रा एकता, बंधुता आणि समरसतेचा संदेश देते.• ही यात्रा येणाऱ्या पिढ्यांना संदेश देईल की, एक सरकार देशाची अखंडता, सार्वभौमत्व आणि राज्यघटना नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत असताना आम्ही या यात्रेच्या माध्यमातून त्यांना रोखण्याचे काम केले होते.आज शेतकरी सरकारच्या विरोधात उभा आहे.

सरकार शेतकऱ्यांच्या ताकदीमुळे घाबरले आहे. यावेळी शेतकऱ्यांना सन्मान दिला जाईल. पीडीएला (मागास, दलित, अल्पसंख्याक) जो सन्मान मिळायला हवा होता तो इतक्या वर्षानंतरही मिळाला नाही आणि जो मिळत होता तोही भाजपने लुटला आहे.- अखिलेश यादव, सपा, अध्यक्ष 

अन्याय काळात बेरोजगारी हे सर्वात मोठे संकट बनले आहे. अग्निवीर योजना आणून सैन्यात भरती होण्याच्या तयारीत असलेल्या तरुणांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. लाखो सरकारी पदे रिकामी आहेत, पण वर्षानुवर्षे भरली जात नाहीत. पदे भरण्यास सुरुवात झाली की पेपर फुटतो. अन्यायाविरुद्ध एकत्र व्हा. न्याय मिळत नाही तोपर्यंत लढत रहा.  - प्रियांका गांधी, सरचिटणीस काँग्रेस

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAkhilesh Yadavअखिलेश यादवBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा