शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

बिहारमध्ये राजकारण तापले; नितीशकुमार आणि तेजस्वी यादव एकत्र येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 03:30 IST

नितीशकुमार यांच्याशी हातमिळवणी करण्याची शक्यता राजदने फेटाळली

एस. पी. सिन्हापाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टीला हजेरी लावल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. राज्यात तेजस्वी यादव यांच्याशी हातमिळवणी करून नितीशकुमार सरकार स्थापन करणार असल्याचा तेजप्रताप यादव यांचा दावा राजदने फेटाळून लावला. राजदचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी तर म्हटले आहे की, राजदमध्ये नितीशकुमार यांच्यासाठी कोणतीही रिक्त जागा नाही. त्यांना राजदकडून कोणतीही खुर्ची मिळणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

जगदानंद सिंह यांनी नितीशकुमार यांच्यावर हल्लाबोल करताना म्हटले आहे की, त्यांच्यावरील जनतेचा विश्वास उडाला आहे. राजदकडे अशी कोणतीही खुर्ची नाही, ज्यावर त्यांना बसविले जाईल. त्यांनी जनादेश लुटला असला तरी सर्वसामान्य जनता व गरिबांबाबत त्यांचे विचार काय आहेत? राबडीदेवी यांच्या निवासस्थानी झालेली इफ्तार पार्टी राजकीय कार्यक्रम नव्हता. नितीशकुमार भाजपवर कोणता दबाव आणू पाहत आहेत, हे तेच जाणोत. 

राजकीय चर्चाइफ्तार पार्टीच्या वेळी राजकीय चर्चा झाली, असे सांगून लालूंचे ज्येष्ठ चिरंजीव तेजप्रताप यांनी या भेटीबाबतची उत्सुकता वाढविली. राजकारणात कधीही काहीही होऊ शकते व आमचे सरकार येऊ शकते, असेही ते म्हणाले. तथापि, नितीशकुमार यांनी स्पष्ट केले की, तेजस्वी यादव यांच्या इफ्तार पार्टीतील माझ्या हजेरीचे राजकीय अर्थ काढू नयेत.

भाजपवर निशाणाभाजपवर निशाणा साधताना जगदानंद सिंह म्हणाले की, बाबू वीरकुंवर सिंह यांचा विजयोत्सव ज्या पद्धतीने साजरा केला जात आहे. त्याच भाजपच्या शासन काळात त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही आणि ते बंधुत्त्वाच्या गोष्टी करीत आहेत. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारTejashwi Yadavतेजस्वी यादव