शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

Rajasthan Congress: राजस्थान काँग्रेसमध्ये मोठी घडामोड! तीन मंत्र्यांचं सोनियांना पत्र, राजीनामा देण्याची इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 22:09 IST

राजस्थानच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. मुख्यमंत्री गहलोत सरकारमधील तीन मंत्र्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

जयपूर

राजस्थानच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. मुख्यमंत्री गहलोत सरकारमधील तीन मंत्र्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मंत्रिपदावरुन पायऊतार होऊन पक्ष संघटनेसाठी काम करण्याची इच्छा गहलोत सरकारमधील तीन मंत्र्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सरकारमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा प्रकर्षानं दिसून येत आहे. 

राजस्थान सरकारमधील रघू शर्मा, हरीश चौधरी आणि गोविंद सिंह डोटासरा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसच्या पक्ष बांधणीसाठी पूर्णवेळ काम करण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती राजस्थान काँग्रेसचे प्रभारी अजय माकन यांनी दिली आहे. यासाठी तिन्ही मंत्र्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आहे. 

दिवाळीआधीच राजस्थान सरकारमधील मंत्रिमंडळात बदलाचे वारे वाहू लागले होते. पण आता पूर्णपणे बदल करण्याची तयारी काँग्रेसनं सुरू केली आहे आणि याच दृष्टीकोनातून हे पहिलं पाऊल टाकलं जात असल्याचं सांगितलं जात आहे. मंत्रिमंडळातील फेरबदलच्या चर्चेनं जोर धरला असतानाच आज अजय माकन जयपूरमध्ये पोहोचले असून काँग्रेस नेतृत्त्व राजस्थानमध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे. 

राजस्थान काँग्रेसमध्ये सचिन पायलट आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या गटातील तणावाच्या बातम्या याआधीही समोर येत राहिल्या आहेत. राजस्थान काँग्रेसमधील संतुलन आणि संघटना मजबूत राखण्यासाठी काही संघटनात्मक बदल देखील होणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधी