शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

बिहारमध्ये राजकीय भूकंप, नितीश कुमार JDUच्या अध्यक्षांनाच हटवणार, नेतृत्व स्वत:कडे घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 10:32 IST

Nitish Kumar: दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर बिहारमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये राज्यातील राजकीय उलथापालथीला सुरुवात होऊ शकते.

दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर बिहारमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये राज्यातील राजकीय उलथापालथीला सुरुवात होऊ शकते. नितीश कुमार दिल्लीतून परतल्यानंतर जेडीयूने २९ डिसेंबर रोजी राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राष्ट्रीय परिषदेची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह यांना पदावरून हटवण्याचा निर्णय होऊ शकतो, असं सांगण्यात येत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे सध्या कुठलेही संघटनात्मक पद नाही आहे. त्यामुळे ते जेडीयूच्या अध्यक्षपाचा कार्यभार सांभाळू शकतात.

गेल्या काही दिवसांपासून ललन सिंह यांची लालूप्रसाद यादव यांच्याशी जवळीक वाढली आहे. सध्या जेडीयूमध्ये दोन शक्यता निर्माण झालेल्या आहेत. त्यामधील एक म्हणजे पक्षामधील कुठल्याही प्रकारची फूट टाळण्यासाठी नितीश कुमार हे स्वत: पक्षाचे अध्यक्ष बनू शकतात. नितीश कुमार यांचे निकटवर्तीय असलेल्या नेत्यांती तशी इच्छा आहे. तर दुसरी शक्यता म्हणजे नितीश कुमार अशा नेत्याकडे अध्यक्षपद सोपवू शकतात. जो त्यांच्या मर्जीबाहेर नसेल. मात्र त्यामुळे पक्षामध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण होऊ शकते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नितीश कुमार हे ललन सिंह यांची कार्यपद्धती आणि विशेषकरून राजद प्रमुख लालूप्रसाद यादव आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याशी त्यांच्या वाढत असलेल्या जवळीकीमुळे नाराज आहेत. ललन सिंह २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मुंगेर मतदारसंघातून लढण्यास इच्छूक आहेत. या मतदारसंघातील ते विद्यमान खासदार आहेत. मात्र आता ते आरजेडीच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतात. 

आता २९ डिसेंबर रोजी जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आणि राष्ट्रीय परिषदेची जेव्हा बैठक होईल, तेव्हा ललन सिंह बाहेर होऊ शकतात, तसेच नितीश कुमार हे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचं अध्यक्षपद सांभाळू शकतात.

जर २९ नोव्हेंबर रोजी ललन सिंह यांना पक्षाच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं तर ते वरिष्ठ नेते असूनही नितीश कुमार यांच्यापासून वेगळे झालेल्या जॉर्ज फर्नांडिस, शरद यादव, आरसीपी सिंह, उपेंद्र कुशवाह आणि प्रशांत किशोर यांच्या पंक्तीत समाविष्ट होऊ शकतात.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी