शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत राजकीय वातावरण तापलं! ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालहून का बोलावली 'स्पेशल फोर्स'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 09:27 IST

रात्री उशिरा बंगालहून विशेष फोर्स दिल्लीत पोहचली. त्यामुळे आजचा मंगळवारचा दिवस दिल्लीतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत

नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांच्या कडेकोट सुरक्षा बंदोबस्तातही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाताहून स्पेशल फोर्स दिल्लीला बोलावले आहे. डिएसपी रँकचे अधिकारी, आरएएफच्या २२ जवानांची तुकडीसह बंगाल पोलिसांची एक विशेष पथक विमानाने दिल्लीला आले. त्यामुळे ममता बॅनर्जी यांना कोणती भीती सतावत आहे असा प्रश्न उभा राहिला आहे. 

माहितीनुसार, संध्याकाळी ४ वाजता ममता बॅनर्जी यांच्याकडून टीएमसीच्या खासदारांसाठी चहापानाचं निमंत्रण देण्यात आले होते. त्याआधी दुपारी ३ वाजता ममता बॅनर्जी एसआयआर पीडितांसोबत पत्रकार परिषद घेण्यात येईल. ममता बॅनर्जी आणि निवडणूक आयोगाच्या संघर्षाची ठिणगी आता दिल्लीपर्यंत पोहचली आहे. सोमवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी एसआयआर मुद्द्यावर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासोबत बैठकीतून मध्येच बाहेर पडल्या. ममता यांनी आयोगाच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले. अधिकाऱ्यांनी अंहकारी वर्तणूक करून शिष्टमंडळाला अपमानित केले असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.

त्यानंतर रात्री उशिरा बंगालहून विशेष फोर्स दिल्लीत पोहचली. त्यामुळे आजचा मंगळवारचा दिवस दिल्लीतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत. ममता बॅनर्जी यांची सुरक्षा आणि दिल्लीतील बंगाल सरकारच्या संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी कोलकाताहून अतिरिक्त सुरक्षा दल दिल्ली मागवल्याचे बोलले जाते. दिल्ली येथील बंग भवन आणि पश्चिम बंगाल सरकारच्या इतर गेस्ट हाऊसची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. आयोग भाजपाची दलाली करतेय असा आरोप केल्याने राजकीय वातावरण गरम झाले आहे. दिल्लीतील संभाव्य विरोध प्रदर्शनामुळे कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत त्यांच्या सुरक्षेसाठी बंगालहून विशेष सुरक्षा दल बोलावले आहे. 

ममता बॅनर्जी काय म्हणाल्या?

निवडणूक आयोगाच्या मुख्यालयातून बाहेर पडल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा आयोगावर जोरदार हल्ला चढवला आणि आयोगाचे अधिकारी भाजपासाठी दलाल म्हणून काम करत असल्याचा आरोप केला. इतके लोक मरण पावले आहेत, याला कोण जबाबदार आहे? आयोग जबाबदार आहे. ते भाजपाच्या इशाऱ्यावर काम करत आहेत असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Political Tensions Rise in Delhi: Mamata Banerjee Calls in Special Force

Web Summary : Mamata Banerjee summoned a special force from Kolkata to Delhi amidst rising tensions with the Election Commission. Accusing officials of pro-BJP bias after a meeting walkout, Banerjee fears potential unrest, prompting heightened security for her and Bengal's assets in Delhi.
टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBJPभाजपा