शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
6
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
7
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
8
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
9
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
10
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
11
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
12
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
13
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
14
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
15
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
16
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
17
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
18
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
19
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
20
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

कलम 66 अ अंतर्गत अटकेचे आदेश देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना तुरुंगात धाडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 05:47 IST

सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला सुनावले

नवी दिल्ली : माहिती तंत्रज्ञान कायद्याचे ६६ अ हे कलम सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविलेले असूनही अजूनही त्या कलमाखाली लोकांना अटक केली जाते. अशी कारवाई रोखण्यासाठी योग्य पावले न टाकल्याबद्दल केंद्र सरकारवर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. आॅनलाईन झळकविलेला मजकूर आक्षेपार्ह किंवा खोटा असल्याचे ठरवून तो लिहिणाºयाला तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा माहिती तंत्रज्ञान कायद्यातील ६६ अ कलमाद्वारे होऊ शकत होती. अभिव्यक्ती व भाषणस्वातंत्र्यावर त्यामुळे गदा येते असे कारण देऊन हे कलम सर्वोच्च न्यायालयाने २०१५ साली रद्द ठरविले होते. मात्र, या कलमान्वये अजूनही लोकांवर कारवाई होत असल्याचे एका याचिकेद्वारे सोमवारी न्यायालयाच्या निदर्शनास आणले गेले. तशा प्रकरणांची यादीच त्यात देण्यात आली होती.

पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज (पीयूसीएल) या संघटनेने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, ६६ अ कलम रद्द झाल्यानंतरही आतापर्यंत त्या कलमाच्या आधारे २२ लोकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारताना न्या. रोहिंटन फली नरिमन म्हणाले की, या याचिकेत केलेले आरोप योग्य असतील तर अशी चुकीची कारवाई करणाºया प्रत्येकाला आम्ही तुरुंगात पाठवू. याप्रकरणी आपले उत्तर सादर करण्यास केंद्राला न्यायालयाने चार आठवड्यांची मुदत दिली आहे.दोन मुलींना झाली होती अटकच्माहिती तंत्रज्ञान कायद्याचे ६६ अ कलम रद्द करण्याचा निर्णय न्या. रोहिंटन फली नरिमन यांनीच तीन वर्षांपूर्वी दिला होता. या कलमाअन्वये केलेल्या कारवाईत पालघर येथील दोन मुलींना अटक करण्यात आली होती. च्त्यावेळी हे कलम रद्द व्हावे याकरिता कायदा शाखेची विद्यार्थिनी श्रेया सिंघल हिने २०१२ साली पहिली जनहित याचिका दाखल केली होती. च्शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर मुंबईमध्ये जो बंद पाळला गेला, त्याविषयी या दोनपैकी एका मुलीने समाजमाध्यमावर पोस्ट लिहिली होती व दुसºया मुलीने ती लाईक केली होती.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय