शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कलम 66 अ अंतर्गत अटकेचे आदेश देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना तुरुंगात धाडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 05:47 IST

सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला सुनावले

नवी दिल्ली : माहिती तंत्रज्ञान कायद्याचे ६६ अ हे कलम सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविलेले असूनही अजूनही त्या कलमाखाली लोकांना अटक केली जाते. अशी कारवाई रोखण्यासाठी योग्य पावले न टाकल्याबद्दल केंद्र सरकारवर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. आॅनलाईन झळकविलेला मजकूर आक्षेपार्ह किंवा खोटा असल्याचे ठरवून तो लिहिणाºयाला तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा माहिती तंत्रज्ञान कायद्यातील ६६ अ कलमाद्वारे होऊ शकत होती. अभिव्यक्ती व भाषणस्वातंत्र्यावर त्यामुळे गदा येते असे कारण देऊन हे कलम सर्वोच्च न्यायालयाने २०१५ साली रद्द ठरविले होते. मात्र, या कलमान्वये अजूनही लोकांवर कारवाई होत असल्याचे एका याचिकेद्वारे सोमवारी न्यायालयाच्या निदर्शनास आणले गेले. तशा प्रकरणांची यादीच त्यात देण्यात आली होती.

पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज (पीयूसीएल) या संघटनेने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, ६६ अ कलम रद्द झाल्यानंतरही आतापर्यंत त्या कलमाच्या आधारे २२ लोकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारताना न्या. रोहिंटन फली नरिमन म्हणाले की, या याचिकेत केलेले आरोप योग्य असतील तर अशी चुकीची कारवाई करणाºया प्रत्येकाला आम्ही तुरुंगात पाठवू. याप्रकरणी आपले उत्तर सादर करण्यास केंद्राला न्यायालयाने चार आठवड्यांची मुदत दिली आहे.दोन मुलींना झाली होती अटकच्माहिती तंत्रज्ञान कायद्याचे ६६ अ कलम रद्द करण्याचा निर्णय न्या. रोहिंटन फली नरिमन यांनीच तीन वर्षांपूर्वी दिला होता. या कलमाअन्वये केलेल्या कारवाईत पालघर येथील दोन मुलींना अटक करण्यात आली होती. च्त्यावेळी हे कलम रद्द व्हावे याकरिता कायदा शाखेची विद्यार्थिनी श्रेया सिंघल हिने २०१२ साली पहिली जनहित याचिका दाखल केली होती. च्शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर मुंबईमध्ये जो बंद पाळला गेला, त्याविषयी या दोनपैकी एका मुलीने समाजमाध्यमावर पोस्ट लिहिली होती व दुसºया मुलीने ती लाईक केली होती.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय