शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Tajinder Pal Singh Bagga: भाजपाच्या एका नेत्यावरून तीन राज्यांच्या पोलिसांत धमासान, सात तास चालली पकडापकडी, अखेर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 17:31 IST

Tajinder Pal Singh Bagga: सकाळी जनकपुरीमधून सकाळी सव्वा आठ वाजता सुरू झालेला पकडा पकडीचा खेळ सात तास सुरू होता, अखेर या नाट्यानंतर संध्याकाळी दिल्लीला परतले आहेत.

नवी दिल्ली - दिल्ली भाजपाचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांच्या अटकेचं प्रकरण तीन राज्यांच्या पोलिसांसाठी नसती आफत बनला आहे. आज सकाळी जनकपुरीमधून सकाळी सव्वा आठ वाजता सुरू झालेला पकडा पकडीचा खेळ सात तास सुरू होता, अखेर या नाट्यानंतर संध्याकाळी दिल्लीला परतले आहेत.

आज सकाळी दिल्लीमध्ये येत पंजाबपोलिसांनी बग्गा यांना अटक केली. त्यानंतर ते बग्गा यांना मोहालीला घेऊन निघाले होते. मात्र दिल्ली पोलिसांच्या सांगण्यावरून हरियाणा येथील कुरुक्षेत्र येथे पंजाब पोलिसांचा ताफा रोखण्यात आला. त्यानंतर हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी बग्गा यांना पंजाब नाही तर दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्याची घोषणा केली. त्यानंतर तशी कारवाई झाली आणि दिल्ली पोलीस बग्गा यांना घेऊन दिल्लीत आले.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात पंजाब पोलीस पंजाब-हरियाणा हायकोर्टात जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनी सांगितले की, हरियाणा पोलिसांनी बेकायदेशीर पद्धतीने कामात अडथळा आणल्याचा पंजाब पोलिसांचा आरोप आहे.

दरम्यान, बग्गा यांच्या वडिलांनी दिल्ली पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यात म्हटले आहे की, काही लोकांनी त्यांच्या घरात घुसून मारहाण केली. त्यानंतर बग्गा यांना आपल्यासोबत घेऊन गेले. या तक्रारीच्या आधारावर पंजाब पोलिसांच्या जवानांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याात आला.

आम आदमी पक्षाचे नेते डॉ. सनी सिंह यांच्या तक्रारीच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून पंजाब पोलीस तेजिंदरपाल सिंह बग्गा यांचा शोध घेत होते. तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी काश्मीर फाईल्स चित्रपटाबाबत अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या विधानावर टीका केली होती. तसेच केजरीवाल यांना काश्मिरी पंडितांचे विरोधक म्हटले होते. त्यानंतर बग्गा यांच्याविरोधात पंजाबमध्ये गुन्हा दाखल झाला होता.

टॅग्स :BJPभाजपाPoliceपोलिसAAPआपPunjabपंजाब