शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
3
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
4
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
5
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
6
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
7
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
8
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
9
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
10
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
11
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
12
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
13
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
14
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
15
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
16
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
17
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
18
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
19
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
20
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी

नूंह हिंसाचार : पोलीस सर्वांचे संरक्षण करू शकत नाहीत; मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 19:26 IST

Nuh Violence : हरयाणातील नूह जिल्ह्यात झालेल्या हिंसाचाराने आतापर्यंत ६ जणांचा जीव घेतला. 

Haryana CM Manohar Lal Khattar on Nuh Violence : हरयाणातील नूह जिल्ह्यात झालेल्या हिंसाचाराने आतापर्यंत ६ जणांचा जीव घेतला. कित्येक वाहने जाळली गेली, शेकडो दुकानांची तोडफोड करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण असून या हिंसाचाराच्या आगीत अनेकांचे लाखोंचे नुकसान झाले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने देखील या हिंसाचारावर तातडीने सुनावणी करण्याचे आदेश दिले आहेत. अशातच हरयाणाचेमुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचे एक विधान चर्चेत आहे. पोलीस सर्वांना संरक्षण देऊ शकत नाहीत, असे खट्टर यांनी म्हटले आहे. बुधवारी चंदीगडमध्ये हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर म्हणाले की, राज्याची लोकसंख्या २.७ कोटी आहे. आमच्याकडे ६० हजार जवान आहेत. अशा परिस्थितीत पोलीस प्रत्येक व्यक्तीचे संरक्षण करू शकत नाहीत. एखाद्या जबाबदार पदावर बसलेल्या व्यक्तीकडून हिंसाचाराच्या स्थितीत असे बोलणे अत्यंत वादग्रस्त असल्याची टीका विरोधक करत आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे हिंसाचारात बळी पडलेल्यांचे मनोबल खचले आहे, अशा तिखट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. 

दोषींना सोडणार नाही - मुख्यमंत्री मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, राज्यात कोणतीही बेकायदेशीर कामे होऊ नयेत यासाठी २० निमलष्करी दल तैनात करण्यात आली आहेत. ६ जणांचा मृत्यू झाला असून त्यात २ पोलीस कर्मचारी आणि ४ नागरिकांचा समावेश आहे. तर, ११६ जणांना अटक करण्यात आली आहे. अन्य ९० जणांना ताब्यात घेण्यात आले असून चौकशीनंतर कारवाई केली जाईल. यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याला सोडले जाणार नाही आणि त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. भारतीय राखीव बटालियनही नूहमध्ये तैनात करण्यात येणार असल्याचे खट्टर यांनी सांगितले. 

टॅग्स :HaryanaहरयाणाChief Ministerमुख्यमंत्रीPoliceपोलिस