शहरं
Join us  
Trending Stories
1
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
2
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
3
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
4
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
5
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
6
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
7
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
8
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
9
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?
10
"चीन अमेरिकेला मागे टाकणार, तिसरं महायुद्ध, अन्...!"; 2026 साठी बाबा वेंगाची भविष्यवाणी, भारतासह जागात काय-काय घडणार?
11
बाजारात गेलेल्या सुनेचा २ वर्षांनी विहिरीत सापडला सांगाडा; राँग नंबरवरुन सुरू झालेली लव्हस्टोरी
12
जगात पहिल्यांदा 'ड्रोन वॉल' बनणार; रशियाला घाबरुन २७ देशांनी निर्णय घेतला, जाणून घ्या कसे करणार काम
13
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
14
Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त सरकाने प्रसिद्ध केलं विशेष नाणं आणि टपाल तिकीट, मोदी म्हणाले...
17
Viral Video: मुंबई लोकलमध्ये नवरात्रीचा जल्लोष! 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर महिलांचा जबरदस्त डान्स
18
'मैत्रीमुळे विचारधारा सोडली, असे होत नाही.. ' संघाच्या निमंत्रण पत्रिकेवर न्यायाधीशांच्या आईचे नाव असल्याने वाद !
19
भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद
20
Asia Cup 2025 : ट्रॉफी द्या, अन्यथा..; BCCI ने मोहसिन नकवींना दिला ७२ तासांचा अल्टिमेटम

नूंह हिंसाचार : पोलीस सर्वांचे संरक्षण करू शकत नाहीत; मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 19:26 IST

Nuh Violence : हरयाणातील नूह जिल्ह्यात झालेल्या हिंसाचाराने आतापर्यंत ६ जणांचा जीव घेतला. 

Haryana CM Manohar Lal Khattar on Nuh Violence : हरयाणातील नूह जिल्ह्यात झालेल्या हिंसाचाराने आतापर्यंत ६ जणांचा जीव घेतला. कित्येक वाहने जाळली गेली, शेकडो दुकानांची तोडफोड करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण असून या हिंसाचाराच्या आगीत अनेकांचे लाखोंचे नुकसान झाले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने देखील या हिंसाचारावर तातडीने सुनावणी करण्याचे आदेश दिले आहेत. अशातच हरयाणाचेमुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचे एक विधान चर्चेत आहे. पोलीस सर्वांना संरक्षण देऊ शकत नाहीत, असे खट्टर यांनी म्हटले आहे. बुधवारी चंदीगडमध्ये हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर म्हणाले की, राज्याची लोकसंख्या २.७ कोटी आहे. आमच्याकडे ६० हजार जवान आहेत. अशा परिस्थितीत पोलीस प्रत्येक व्यक्तीचे संरक्षण करू शकत नाहीत. एखाद्या जबाबदार पदावर बसलेल्या व्यक्तीकडून हिंसाचाराच्या स्थितीत असे बोलणे अत्यंत वादग्रस्त असल्याची टीका विरोधक करत आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे हिंसाचारात बळी पडलेल्यांचे मनोबल खचले आहे, अशा तिखट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. 

दोषींना सोडणार नाही - मुख्यमंत्री मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, राज्यात कोणतीही बेकायदेशीर कामे होऊ नयेत यासाठी २० निमलष्करी दल तैनात करण्यात आली आहेत. ६ जणांचा मृत्यू झाला असून त्यात २ पोलीस कर्मचारी आणि ४ नागरिकांचा समावेश आहे. तर, ११६ जणांना अटक करण्यात आली आहे. अन्य ९० जणांना ताब्यात घेण्यात आले असून चौकशीनंतर कारवाई केली जाईल. यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याला सोडले जाणार नाही आणि त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. भारतीय राखीव बटालियनही नूहमध्ये तैनात करण्यात येणार असल्याचे खट्टर यांनी सांगितले. 

टॅग्स :HaryanaहरयाणाChief Ministerमुख्यमंत्रीPoliceपोलिस