शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
3
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
4
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
5
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
6
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
7
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
8
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
9
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
10
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
11
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
12
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
13
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
14
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
15
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
16
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
17
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
18
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

'आरोपीची स्थावर मालमत्ता पोलीस जप्त करू शकत नाहीत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 02:10 IST

संशयाच्या आधारे कारवाई नको; कायद्याच्या मुद्यावर सुप्रीम कोर्टाचा निवाडा

नवी दिल्ली : एखाद्या गुन्ह्याचा तपास करताना पोलीस आरोपीच्या स्थावर मालमत्तेवर टाच आणू शकत नाहीत, ती जप्त करू शकत नाहीत किंवा तिला सीलही ठोकू शकत नाहीत, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. अशा प्रकारे गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला फौजदारी कायद्याशी संबंधित एक महत्त्वाचा विवाद्य मुद्दा निकाली निघाला आहे.महाराष्ट्रातून दाखल केल्या गेलेल्या सहा अपिलांमध्ये सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई, न्या. दीपक गुप्ता व न्या. संजीव खन्ना यांच्या विशेष पीठाने हा निकाल दिला. नोव्हेंबर २०१४ मध्ये या मुद्द्याचा निर्णय करण्यासाठी तीन न्यायाधीशांचे विशेष पीठ स्थापन करण्याची शिफारस द्विसदस्यीय खंडपीठाने केली होती. याच मुद्द्यावर आधी मुंबई उच्च न्यायालयात दोन खंडपीठांनी परस्पर विरोधी निकाल दिल्याने तीन न्यायाधीशांचे पूर्णपीठ नेमले गेले होते. त्या पूर्णपीठाने २९ नोव्हेंबर २०१० रोजी पोलिसांना मालमत्ता जप्तीचा अधिकार नाही, असा निकाल दोन विरुद्ध एक अशा बहुमताने दिला होता. त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपिले केली गेली होती. मुंबई व पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने काही प्रकरणांमध्ये आरोपींच्या स्थावर मालमत्तांच्या जप्तीचे आदेश काढल्याने हा मुद्दा उपस्थित झाला होता. हा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने दंड प्रक्रिया संहितेच्या कलम १०२(१) मध्ये वापरलेल्या ‘कोणतीही मालमत्ता’ या शब्दांचा नेमका अर्थ विषद केला आहे. हे कलम असे म्हणते की, जी चोरीला गेल्याचा आरोप असेल किंवा ज्याच्यावरून गुन्ह्याचा संशय निर्माण होईल अशा परिस्थितीत आढळून आलेली कोणतीही मालमत्ता पोलीस अधिकारी जप्त करू शकेल. न्यायालय म्हणते की, स्थावर मालमतेची चोरी केली जाऊ शकत नाही, यावरून हा संदर्भ स्थावर मालमत्तेशी नाही, हे स्पष्ट होते.तपासासाठी गरजेचे नाहीन्यायालय म्हणते की, स्थावर मालमत्ता जप्त करणे ही तपासाची गरज नाही व त्याने तपासाला मदतही होत नाही. काही विशिष्ट गुन्ह्यांमध्ये खटल्याचा निकाल झाल्यावर बाधित व्यक्तींना भरपाई देण्यासाठी आरोपीच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तरतूद आहे.न्यायालय म्हणते की, या कलमातील नंतरचा अर्धा भाग संशयावरून मालमत्ता जप्त करण्यासंबंधी आहे. जमीन-जुमल्यासारखी स्थावर मालमत्ता जप्त करायची झाल्यास तिचे मालकीहक्क संबंधितांकडून काढून घेणे व तिचा प्रत्यक्ष ताबा घेणे अभिप्रेत आहे.तसे अधिकार संबंधित न्यायालयांना दिलेले आहेत. त्यामुळे कलम १०२ अन्वये पोलिसांना असलेला अधिकार आणि न्यायालयास असलेले अधिकाऱ्यांची गल्लत करता येणार नाही.मालमत्तेच्या मालकीची असे हस्तांतर हा दिवाणी विषय आहे व ते दिवाणी न्यायालयाचे काम आहे. केवळ संशयाच्या आधारे पोलीस अधिकाºयास असे अधिकार असल्याचे मानणे हे फौजदारी न्यायतत्वालाही धरून होणार नाही.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय