शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची शेतकऱ्यांवर लाठी; संतप्त ग्रामस्थांनी अनेक वाहने जाळली, बिहारच्या बक्सरमध्ये तणाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 07:38 IST

ग्रामस्थांनी वीज केंद्रावर लाठ्या-रॉडने हल्ला केला. पोलिसांच्या १३ वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली.

- एस. पी. सिन्हापाटणा : बिहारच्या बनारपूर (जि. बक्सर) गावाजवळ औष्णिक वीज प्रकल्पासाठी भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी शेतकरी ८५ दिवसांपासून करत असलेल्या आंदोलनाला बुधवारी हिंसक वळण लागले. मंगळवारी रात्री बक्सर पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांच्या घरांवर लाठीहल्ला केला. त्यामुळे अनेक ग्रामस्थ जखमी झाले. त्यानंतर बुधवारी सकाळी ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक झाला.

ग्रामस्थांनी वीज केंद्रावर लाठ्या-रॉडने हल्ला केला. पोलिसांच्या १३ वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. पोलिसांनी हवेत गोळीबार करून जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूंनी दगडफेकही झाली. यामध्ये चार पोलिस जखमी झाले आहेत.ग्रामस्थांनी लाठ्या-काठ्या घेऊन प्रकल्पावर हल्ला केला. जमावाने पोलिसांची दोन वज्र वाहने, तीन बाईक, तीन कंपनीच्या बस, तीन फायर इंजिन, एक रुग्णवाहिका आणि एक क्रेन जाळली. त्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला.

८५ दिवसांपासून आंदोलन

गेल्या ८५ दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. मंगळवारी शेतकऱ्यांनी प्रकल्पाच्या मुख्य द्वाराला कुलूप लावून धरणे धरले. त्यावेळी पोलिसांनी काहीही केले नाही, मात्र रात्री पोलिसांनी बनारपूर गावात घुसून बेदम मारहाण केली. चारजणांना अटक करण्यात आली. पोलिसांच्या या मारहाणीच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी लोकांचा रोष उसळला. 

पोलिसांचा अमानवी चेहरा समोर

बनारपूर गावाजवळ औष्णिक वीज प्रकल्प उभारला जात आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यास ग्रामस्थांचा विरोध आहे. या पार्श्वभूमीवर बनारपूरमध्ये पोलिसांचा अमानवी चेहरा समोर आला. येथील घरात घुसून रात्री १२ वाजता झोपलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी आलेल्या महिला आणि लहान मुलांनाही पोलिसांकडून मारण्यात करण्यात आली. शेतकऱ्यांवर पोलिसांच्या अत्याचाराचा एक व्हिडीओही समोर आला आहे, ज्यामध्ये पोलिस बेदम मारहाण करताना दिसतात.  शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रियेनंतर परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे.

नितीश सरकार ‘गुंडाराज’

बक्सर येथील घटनेनंतर बिहारचे राजकारण चांगलेच तापले आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजयकुमार सिन्हा यांनी शेतकऱ्यांवर झालेल्या मारहाणीनंतर नितीश सरकारला ‘गुंडाराज’ म्हटले आहे. 

टॅग्स :BiharबिहारPoliceपोलिसFarmerशेतकरी