शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

पोलिसांची शेतकऱ्यांवर लाठी; संतप्त ग्रामस्थांनी अनेक वाहने जाळली, बिहारच्या बक्सरमध्ये तणाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 07:38 IST

ग्रामस्थांनी वीज केंद्रावर लाठ्या-रॉडने हल्ला केला. पोलिसांच्या १३ वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली.

- एस. पी. सिन्हापाटणा : बिहारच्या बनारपूर (जि. बक्सर) गावाजवळ औष्णिक वीज प्रकल्पासाठी भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी शेतकरी ८५ दिवसांपासून करत असलेल्या आंदोलनाला बुधवारी हिंसक वळण लागले. मंगळवारी रात्री बक्सर पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांच्या घरांवर लाठीहल्ला केला. त्यामुळे अनेक ग्रामस्थ जखमी झाले. त्यानंतर बुधवारी सकाळी ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक झाला.

ग्रामस्थांनी वीज केंद्रावर लाठ्या-रॉडने हल्ला केला. पोलिसांच्या १३ वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. पोलिसांनी हवेत गोळीबार करून जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूंनी दगडफेकही झाली. यामध्ये चार पोलिस जखमी झाले आहेत.ग्रामस्थांनी लाठ्या-काठ्या घेऊन प्रकल्पावर हल्ला केला. जमावाने पोलिसांची दोन वज्र वाहने, तीन बाईक, तीन कंपनीच्या बस, तीन फायर इंजिन, एक रुग्णवाहिका आणि एक क्रेन जाळली. त्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला.

८५ दिवसांपासून आंदोलन

गेल्या ८५ दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. मंगळवारी शेतकऱ्यांनी प्रकल्पाच्या मुख्य द्वाराला कुलूप लावून धरणे धरले. त्यावेळी पोलिसांनी काहीही केले नाही, मात्र रात्री पोलिसांनी बनारपूर गावात घुसून बेदम मारहाण केली. चारजणांना अटक करण्यात आली. पोलिसांच्या या मारहाणीच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी लोकांचा रोष उसळला. 

पोलिसांचा अमानवी चेहरा समोर

बनारपूर गावाजवळ औष्णिक वीज प्रकल्प उभारला जात आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यास ग्रामस्थांचा विरोध आहे. या पार्श्वभूमीवर बनारपूरमध्ये पोलिसांचा अमानवी चेहरा समोर आला. येथील घरात घुसून रात्री १२ वाजता झोपलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी आलेल्या महिला आणि लहान मुलांनाही पोलिसांकडून मारण्यात करण्यात आली. शेतकऱ्यांवर पोलिसांच्या अत्याचाराचा एक व्हिडीओही समोर आला आहे, ज्यामध्ये पोलिस बेदम मारहाण करताना दिसतात.  शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रियेनंतर परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे.

नितीश सरकार ‘गुंडाराज’

बक्सर येथील घटनेनंतर बिहारचे राजकारण चांगलेच तापले आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजयकुमार सिन्हा यांनी शेतकऱ्यांवर झालेल्या मारहाणीनंतर नितीश सरकारला ‘गुंडाराज’ म्हटले आहे. 

टॅग्स :BiharबिहारPoliceपोलिसFarmerशेतकरी