शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
2
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
3
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
4
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
5
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
6
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
7
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
8
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
9
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
10
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
11
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
12
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
13
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
14
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
15
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
16
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
17
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
18
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
19
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
20
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?

पोलिसांची शेतकऱ्यांवर लाठी; संतप्त ग्रामस्थांनी अनेक वाहने जाळली, बिहारच्या बक्सरमध्ये तणाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 07:38 IST

ग्रामस्थांनी वीज केंद्रावर लाठ्या-रॉडने हल्ला केला. पोलिसांच्या १३ वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली.

- एस. पी. सिन्हापाटणा : बिहारच्या बनारपूर (जि. बक्सर) गावाजवळ औष्णिक वीज प्रकल्पासाठी भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी शेतकरी ८५ दिवसांपासून करत असलेल्या आंदोलनाला बुधवारी हिंसक वळण लागले. मंगळवारी रात्री बक्सर पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांच्या घरांवर लाठीहल्ला केला. त्यामुळे अनेक ग्रामस्थ जखमी झाले. त्यानंतर बुधवारी सकाळी ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक झाला.

ग्रामस्थांनी वीज केंद्रावर लाठ्या-रॉडने हल्ला केला. पोलिसांच्या १३ वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. पोलिसांनी हवेत गोळीबार करून जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूंनी दगडफेकही झाली. यामध्ये चार पोलिस जखमी झाले आहेत.ग्रामस्थांनी लाठ्या-काठ्या घेऊन प्रकल्पावर हल्ला केला. जमावाने पोलिसांची दोन वज्र वाहने, तीन बाईक, तीन कंपनीच्या बस, तीन फायर इंजिन, एक रुग्णवाहिका आणि एक क्रेन जाळली. त्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला.

८५ दिवसांपासून आंदोलन

गेल्या ८५ दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. मंगळवारी शेतकऱ्यांनी प्रकल्पाच्या मुख्य द्वाराला कुलूप लावून धरणे धरले. त्यावेळी पोलिसांनी काहीही केले नाही, मात्र रात्री पोलिसांनी बनारपूर गावात घुसून बेदम मारहाण केली. चारजणांना अटक करण्यात आली. पोलिसांच्या या मारहाणीच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी लोकांचा रोष उसळला. 

पोलिसांचा अमानवी चेहरा समोर

बनारपूर गावाजवळ औष्णिक वीज प्रकल्प उभारला जात आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यास ग्रामस्थांचा विरोध आहे. या पार्श्वभूमीवर बनारपूरमध्ये पोलिसांचा अमानवी चेहरा समोर आला. येथील घरात घुसून रात्री १२ वाजता झोपलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी आलेल्या महिला आणि लहान मुलांनाही पोलिसांकडून मारण्यात करण्यात आली. शेतकऱ्यांवर पोलिसांच्या अत्याचाराचा एक व्हिडीओही समोर आला आहे, ज्यामध्ये पोलिस बेदम मारहाण करताना दिसतात.  शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रियेनंतर परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे.

नितीश सरकार ‘गुंडाराज’

बक्सर येथील घटनेनंतर बिहारचे राजकारण चांगलेच तापले आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजयकुमार सिन्हा यांनी शेतकऱ्यांवर झालेल्या मारहाणीनंतर नितीश सरकारला ‘गुंडाराज’ म्हटले आहे. 

टॅग्स :BiharबिहारPoliceपोलिसFarmerशेतकरी