शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पीएमओने दिला कचरा उचलण्याचा आदेश, आता हेच काम करणार का लष्कर? नागरिकांचा संतप्त सवाल

By सागर सिरसाट | Published: September 22, 2017 6:28 PM

पंतप्रधान कार्यालयाने संरक्षण मंत्रालयाला पर्यटकांकडून किंवा भाविकांकडून केला जाणारा पर्वतीय परिसरातील कच-याची योग्य विल्हेवाट लावण्यास सांगितलं आहे. भारतीय लष्कराने कचरा उचलण्याचं काम करावं यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई - पर्वतीय परिसरात पर्यटकांकडून किंवा भाविकांकडून केला जाणा-या  कच-याची योग्य विल्हेवाट लावण्यास पंतप्रधान कार्यालयाने संरक्षण मंत्रालयाला  सांगितलं आहे. या आदेशावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. भारतीय लष्कराने कचरा उचलण्याचं काम करावं यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. लष्कराचं काम हे देशाला सुरक्षित ठेवणं असतं देशातील कचरा साफ करणं नाही अशी टीका अनेकांनी केली आहे. 

हा आदेश येताच सेवानिवृत्त लेफ्टिनेंट जनरल एचएस पनाग यांनी “काव-काव करणं बंद करा आणि कामावर चला ! आदेश पीएमओने दिला आहे आणि सर्व देश तुमच्या पाठिशी आहे'' असं खोचक ट्विट केलं. पनाग यांच्या ट्वीटवर अनेक जणांनी प्रश्न उपस्थित केले . त्यावर उत्तर देताना त्यांनी आणखी एका ट्विटमध्ये “आदेश आदेश असतो, पालन करावच लागतं, असं म्हटलं.  

त्यावर, ज्या परिसरामध्ये लष्कराला साफ-सफाई करण्यास सांगितलं आहे तेथे साफसफाई कर्मचारी पोहोचू शकत नाही असं ट्विट करत एका युजरने पीएमओच्या आदेशाचा बचाव केला. पण 'ज्या ठिकाणी पर्यटक किंवा भाविक जाऊन कचरा करू शकतात तर ते स्वतःचा कचरा स्वतः साफ देखील करू शकतात. सैनिक स्वतः केलेला कचरा स्वतःच साफ करत असतात' असं उत्तर पनाग यांनी दिलं. 

जम्मू-काश्मीरच्या कारगिल, लदाख, पूर्वोत्तर भारतातील सिक्कीम आणि उत्तराखंडच्या पर्वतीय भागांमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक जात असतात.  पीएमओच्या या आदेशाची माहिती संरक्षण मंत्री निर्मला सितारमण यांनी मीडियाला दिली. अनेक पर्वतीय परिसरांमध्ये  सामान्य लोकांना पोहोचणं कठीण असतं, तरीही काही भाविक तेथे पोहोचण्यात यशस्वी होतात. त्या परिसरांतील परिस्थितीमुळे तेथे असलेला कचरा कधी साफ करता येत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी स्वच्छता ठेवणं हा देखील स्वच्छता अभियानाचा एक उद्देश आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकारIndian Armyभारतीय जवान