शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

आताची काँग्रेस गांधी विचारांच्या विरोधी, नरेंद्र मोदी यांचा ब्लॉगमधून काँग्रेसवर निशाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 19:22 IST

भारताच्या स्वातंत्र्य लढाईत दांडी यात्रेला महत्त्व आहे. या दिवसाचं महत्त्व जाणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं आहे. दांडी यात्रेच्या निमित्ताने मुठीतल्या मिठाने इंग्रजांचे साम्राज्य हादरवून सोडलं, असं मोदी यांनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली - भारतीय इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला आहे. आज दांडी यात्रेला 89 वर्ष पूर्ण झाली. 12 मार्च 1930 रोजी दांडी यात्रेला सुरुवात करण्यात आली होती. भारताच्या स्वातंत्र्य लढाईत दांडी यात्रेला महत्त्व आहे. या दिवसाचं महत्त्व जाणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट  केलं आहे. दांडी यात्रेच्या निमित्ताने मुठीतल्या मिठाने इंग्रजांचे साम्राज्य हादरवून सोडलं, असं मोदी यांनी म्हटलं आहे.

त्याचसोबत मोदी यांनी टिविट्सोबत ब्लॉग जोडलेला आहे. या ब्लॉगच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. महात्मा गांधी यांनी असमानता आणि जाती विभाजन या गोष्टींना कधीच थारा दिला नाही. देशाची एकता हेच खरं स्वातंत्र्य आहे, मात्र दुख: आहे की, आत्ताच्या काँग्रेसने जाती-जातींमध्ये फूट पाडण्याचं काम केलंय. काँग्रेस सरकारच्या काळात सर्वाधित जातीय दंगली आणि दलितांवर अत्याचार झाले. 

नरेंद्र मोदी यांनी ब्लॉगमध्ये लिहलंय की, आपल्याला माहीत आहे का दांडी यात्रेमध्ये मुख्य भूमिका कोणाची होती ? ती महान सरदार पटेल यांची होती. पटेल यांनी दांडी यात्रेच्या योजनेत शेवटपर्यंत सहभाग घेतला. मात्र सरदार पटेल यांना ब्रिटीश सरकार घाबरत असल्याने दांडी यात्रा सुरु होण्याच्या काही दिवस आधीच त्यांना अटक करण्यात आली. पटेल यांना अटक केल्यानंतर इंग्रजांना वाटले की गांधी घाबरतील, पण असं काही घडले नाही. इंग्रजांच्या गुलामीविरोधात लढाई सुरुच राहिली. 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे लिहितात की, मागील महिन्यात मी दांडीमध्ये होतो, त्याठिकाणी अत्याधुनिक संग्रहालय बनविण्यात आले आहे. मी सर्वांना आवाहन करतो की आपण एकदा त्याठिकाणी भेट द्यावी. गांधी यांनी नेहमी शिकवण दिली होती, तुम्ही गरिबांकडे बघा, त्यांची परिस्थिती जाणा आणि नंतर विचार करा की तुम्ही करत असलेल्या कामाचा गरिबाच्या जीवनावर काय परिणाम होऊ शकतो. मला सांगताना गर्व होतोय की, आमचं सरकार महात्मा गांधी यांनी सांगितलेल्या याच मार्गावर चालत आहे. गरिबी दूर करून त्यांचे जीवन समृद्ध करण्यासाठी आमचं सरकार कटीबद्ध आहे. या गोष्टीचं दुख: आहे की सध्याची काँग्रेस गांधी यांच्या विचारधारेच्या विरुध्द वागत आहे. महात्मा गांधी यांनी अतिरिक्त धनापासून दूर राहायला हवं असं सांगितले होते. मात्र काँग्रेसने जी काही कामं केली ती स्वत:ची तिजोरी भरण्यासाठी वापरली. गरिबांच्या जीवावर काँग्रेसने आपलं जीवन अलिशान बनवलं. बापूंनी घराणेशाहीच्या राजकारणाला विरोध केला मात्र आता काँग्रेस घराणेशाहीला प्राधान्य देतं आहे. 1947 साली महात्त्मा गांधी यांनी सांगितले होते की, भारताच्या स्वच्छ प्रतिमेचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येकावर आहे. तो व्यक्ती  कोणत्याही पक्षाचा अथवा विचारांचा असला तरी चालेल देशाच्या प्रतिमेचे रक्षण करायला हवं. आम्ही भ्रष्टाचाराला आळा घालत भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई केली. मात्र काँग्रेस आणि भ्रष्टाचार हे समीकरण देशाने बघितलं आहे. कोणत्याही क्षेत्राचे नाव घेतलं तरी त्यात काँग्रेसने घोटाळा केला आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीMahatma Gandhiमहात्मा गांधीcongressकाँग्रेसGujaratगुजरात