शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
2
पाकिस्तान, पाकिस्तानसारखा खेळला! विजयासाठी आयर्लंडसमोर टाकाव्या लागल्या धापा
3
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
4
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
5
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
6
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
7
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
8
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

३९ दिवसांच्या चिमुकलीच्या अवयवदानाने भारावले मोदी; ‘मन की बात’मध्ये केले पालकांचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 1:18 PM

देशात त्याबाबत जागरूकता वाढत आहे आणि गेल्या १० वर्षांत अवयवदान करणाऱ्यांची संख्या तिप्पट वाढली आहे.

नवी दिल्ली : अवयवदान हे ईश्वराचे रूप असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’च्या ९९ व्या भागात सांगितले की, आज देशात त्याबाबत जागरूकता वाढत आहे आणि गेल्या १० वर्षांत अवयवदान करणाऱ्यांची संख्या तिप्पट वाढली आहे. यावेळी पंतप्रधानांनी ३९ दिवसांच्या अबाबत या चिमुकलीच्या अवयवदानाचा उल्लेख केला. 

ऑल इंडिया रेडिओच्या मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’मध्ये अवयवदान करणाऱ्या चंडीगड येथील चिमुकल्या अबाबतचे पालक सुखबीर सिंग संधू, सुप्रीत कौर आणि झारखंडच्या सरायकेला येथील स्नेहलता यांचा मुलगा अभिजित चौधरी यांच्याशी पंतप्रधानांनी अवयवदानाच्या अनुभवांबद्दल चर्चा केली. मोदी म्हणाले, ‘राज्यांच्या अधिवास स्थापनेची अटही काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच आता रुग्णाला देशातील कोणत्याही राज्यात जाऊन अवयवदानासाठी नोंदणी करता येणार आहे. अवयवदानासाठी ६५ वर्षांखालील वयोमर्यादा काढून टाकण्याचा निर्णयही घेतला आहे.’

चिमुकली मानवतेच्या अमर गाथेची अमर प्रवासी 

अबाबतची कहाणी सांगताना पंतप्रधान म्हणाले की, ती केवळ ३९ दिवसांची असताना तिने हे जग सोडले, परंतु तिच्या पालकांनी मुलीचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयाचे कौतुक करताना पंतप्रधान त्यांना म्हणाले, ‘तुमची मुलगी मानवतेच्या अमर गाथेची अमर प्रवासी बनली आहे. शरीराच्या एका अंशाच्या रूपाने ती आजही उपस्थित आहे.’ याच क्रमाने, पंतप्रधानांनी वयाच्या ६३ व्या वर्षी हृदय, किडनी आणि यकृतदान करणाऱ्या स्नेहलता चौधरी यांच्या मुलाशी चर्चा केली. 

मोदी म्हणाले...

सर्व महिला भारताला आणि भारताच्या स्वप्नाला ऊर्जा देत आहेत, स्त्री शक्तीची ही ऊर्जा विकसित भारताचे जीवन आहे.n आज सौरऊर्जेच्या क्षेत्रात देश ज्या वेगाने पुढे जात आहे, ती स्वतःमध्ये एक अनोखी घटना आहे. मोठी उपलब्धी आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMan ki Baatमन की बात