शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

"माझा राजीनामा माझ्या खिशात, दबावाखाली काम करणार नाही"; राज्यपालांचा थेट पंतप्रधान मोदींना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 17:52 IST

केंद्र सरकारच्या योजनेवरून केली सडकून टीका

Pm Modi and Governor: एखाद्या राज्याचे राज्यपाल आणि देशातील सत्ताधारी पक्ष यांचे सहसा जिव्हाळ्याचे संबंध असतात. राज्यपाल केंद्र सरकारवर टीका करताना दिसण्याचे प्रसंग फार कमी पाहायला मिळतात. पण मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक हे सातत्याने केंद्र सरकारच्या न पटणाऱ्या गोष्टींवर टीका करतात. नुकतीच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अग्निपथ योजना मागे घेण्याचे आवाहन केले आहे. शेतकरी आंदोलनाच्या काळापासून सत्यपाल मलिक मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. मी कोणाच्याही दबावाखाली काम करत नाही आणि माझा राजीनामा माझ्या खिशातच आहे. पंतप्रधान मोदींच्या संकेताची वाट पाहत आहे, असा इशारा सत्यपाल मलिक यांनी दिला आहे.

सत्यपाल मलिक यांनी एका चॅनेलशी बोलताना सांगितले की, “मी अशा शेतकऱ्यांबद्दल बोललो जे केंद्र सरकारच्या बाजूने गेले असते आणि शेतकरी आंदोलन झाले नसते. ७०० शेतकरी मरण पावले आहेत आणि त्यांच्याबाबत साधा शोक संदेश पाठविला गेला नाही हे चुकीचे आहे. उलट मोदी सरकारने नंतर माफी मागून हे विधेयक मागे घेतले. त्यामुळे मी नेहमीच जनतेच्या बाजूने बोललो आहे आणि अजूनही बोलत आहे."

अग्निपथ योजनेबद्दल सत्यपाल मलिक म्हणाले, “ मुलांसंबंधी असलेल्या अग्निपथ योजनेबाबत लवकर विचार करा. अशा गोष्टी घडणे चांगले नाही. असंतुष्ट मुलं सैन्यात गेली तर त्यांच्या हातात रायफल असेल, अशा वेळी ती बंदुक कोणत्या दिशेला वळू शकेल याची आपण कल्पना करू शकत नाही. केंद्र सरकार कमालीच्या उद्दामपणात जगत आहे. त्यामुळे यापेक्षा वाईट काहीही घडण्याआधीच काहीतरी करा. बॅकफूटवर या आणि योग्य निर्णय घ्या."

“मी पहिल्यांदा बोललो तेव्हापासून माझ्या खिशात राजीनामा आहे. ज्या दिवशी मोदींकडून संकेत मिळतील, त्या दिवशी मला हटवावे लागणार नाही. मीच माझा निर्णय घेईन. फक्त असे म्हणा की मला तुमच्याबरोबर काम करणे अस्वस्थ वाटते. मी त्याच दिवशी निघून जाईन", असा थेट इशाराच मलिक यांनी पंतप्रधान मोदींना दिला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAgneepath Schemeअग्निपथ योजना