शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
4
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
5
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
6
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
7
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
8
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
9
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
10
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
11
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
12
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
13
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
14
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
15
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
16
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
17
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
18
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
19
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
20
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 04:26 IST

पंजाबमधील आदमपूर हवाई तळाला भेट देऊन जवानांमध्ये भरला उत्साह, पाकचा खोटेपणा केला उघड

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: दहशतवाद अजिबात खपवून घेतला जाणार नाही ही ऑपरेशन सिंदूरने आखून दिलेली लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा नाश अटळ आहे हे लक्षात ठेवा, असा खणखणीत इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पाकिस्तानला दिला. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यामुळे भारताच्या एकाही लष्करी तळाचे नुकसान झालेले नाही. यापुढे दुसऱ्या देशाच्या भूमीतून भारतात दहशतवादी कारवाया सुरू राहिल्या तर तुमचे संपूर्ण उच्चाटन केले जाईल, अशी तंबी मोदी यांनी पाकिस्तानला दिली.

आदमपूर हवाई तळावर भारतीय जवानांसमोर केलेल्या भाषणात ते म्हणाले की, अण्वस्त्र हल्ला करण्याची धमकी भारताला देण्यात आली होती. भारतीय लष्कराने त्याला भीक घातली नाही. आम्ही केलेल्या कारवाईनंतर भारतमाता की जय या घोषणेचे महत्व शत्रूना कळले. ही केवळ घोषणा नाही तर तो मातृभूमीसाठी बलिदान देण्याचा जवानांचा संकल्प आहे.

ऑपरेशन सिंदूर हे भारताचे नवे धोरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ठाम धोरण, योग्य हेतू, निर्णायक क्षमता ही ऑपरेशन सिंदूरची त्रिसूत्री आहे. ही केवळ लष्करी कारवाई नव्हती तर भारताच्या नव्या विचारसरणीचे ते प्रतिक होते. भारत हा भगवान बुद्धांच्या शांततेचा संदेश देणारे राष्ट्र आहे, पण हा देश गुरु गोविंदसिंग यांच्या शौर्याचेही प्रतिक आहे. पाकिस्तानच्या कोणत्याही कोपऱ्यात दहशतवादी सुरक्षित राहू शकत नाही. पलायनाची संधी न देता आम्ही त्यांचा खात्मा करू. पाकिस्तान आमच्या शस्त्रास्त्रांशी स्पर्धा करू शकत नाही, असे ते म्हणाले.

'ऑपरेशन सिंदूरने भारतातील ऐक्य, आत्मविश्वास वाढविला'

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारताच्या हवाई दलाने २०-२५ मिनिटांत पाकमधील दहशतवादी तळांवर अचूक निशाणा साधला. ऑपरेशन सिंदूरने भारतातील ऐक्य, आत्मविश्वास आणि लष्कराची ताकद वाढविली आहे. जर पुन्हा दहशतवादी हल्ला झाला, तर भारत आपल्या पद्धतीने चोख प्रत्युत्तर देईल. अण्वस्त्रांनी हल्ला करण्याच्या धमक्यांना आम्ही भीक घालणार नाही. दहशतवादी आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या सरकारांमध्येही आम्ही फरक करणार नाही. आमच्या ड्रोन, क्षेपणास्त्रांच्या आठवणींनी पाकिस्तानची झोप उडविली आहे, असेही ते म्हणाले.

काय आहे आदमपूर हवाई तळावर ?

आदमपूर हा वायूदलाचा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा हवाई तळ आहे. येथे राफेल आणि मिग-२९ विमाने तैनात आहेत. १९६५ आणि १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धात या तळाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. तिथे पंतप्रधान मोदी मंगळवारी भेट देणार हे जाहीर केले नव्हते. ते तिथे अनपेक्षितपणे पोहोचले तेव्हा हवाई दलाच्या जवानांनी 'भारतमाता की जय'च्या घोषणा दिल्या. मोदी यांनी वेस्टर्न एअर कमांडचे त्रिशूल चिन्ह असलेली टोपी परिधान केली होती. ऑपरेशन सिंदूरनंतर जवानांशी संवाद साधला.

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरNarendra Modiनरेंद्र मोदीIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक