शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

देशभरातील ५०८ रेल्वे स्थानकांचा होणार पुनर्विकास, ६ ऑगस्टला मोदींच्या हस्ते पायाभरणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 23:59 IST

अमृत भारत स्टेशन योजना देशभरातील १३०९ स्थानकांच्या पुनर्विकासासाठी सुरू करण्यात आली.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ ऑगस्टला सकाळी ११ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशाच्या कानाकोपऱ्यातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाच्या कामाची पायाभरणी करतील. अत्याधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था करण्यावर नरेंद्र मोदींनी अनेकदा भर दिला आहे. देशभरातील लोकांसाठी रेल्वे हे वाहतुकीचे पसंतीचे साधन असल्याचे सांगत नरेंद्र मोदींनी रेल्वे स्थानकांवर जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याच्या महत्त्वावर भर दिला. या दूरदृष्टीनुसार अमृत भारत स्टेशन योजना देशभरातील १३०९ स्थानकांच्या पुनर्विकासासाठी सुरू करण्यात आली.

या योजनेचा एक भाग म्हणून नरेंद्र मोदींच्या हस्ते ५०८ स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी होत आहे. या स्थानकांच्या पुनर्विकासासाठी २४,४७० कोटी रुपयांहून अधिक खर्च केले जाणार आहेत. शहराच्या दोन्ही बाजूंना योग्य प्रकारे जोडून ही स्थानके 'सिटी सेंटर' म्हणून विकसित करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात येत आहे. हा एकात्मिक दृष्टीकोन रेल्वे स्थानकाच्या आजूबाजूच्या परिसरावर लक्ष केंद्रित करून शहराच्या सर्वांगीण नागरी विकासाच्या दृष्टीकोनातून प्रेरित आहे.

ही ५०८ स्थानके देशातील २७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहेत, ज्यात उत्तर प्रदेशातील ५५, राजस्थानमधील ५५, बिहारमधील ४९, महाराष्ट्रातील ४४, पश्चिम बंगालमधील ३७, मध्य प्रदेशातील ३४, आसाममधील ३२, ओडिशामधील २५, पंजाबमधील २२, गुजरातमधील २१, तेलंगणामधील २१, झारखंडमधील २०, आंध्र प्रदेशातील १८, तामिळनाडूमधील १८, हरयाणामधील १५ आणि कर्नाटकमधील १३ स्थानकांचा समावेश आहे.

स्थानकाची रचना स्थानिक संस्कृतीपासून प्रेरित असेलपुनर्विकासाचे काम प्रवाशांना आधुनिक सुविधा प्रदान करेल आणि प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी सु-समन्वित वाहतूक सुविधा, आंतर-मॉडल एकत्रीकरण आणि सुव्यवस्थित चिन्हे सुनिश्चित करेल. स्थानक इमारतींचे डिझाइन स्थानिक संस्कृती, वारसा आणि वास्तुकला यांच्यापासून प्रेरित असणार आहे.

टॅग्स :railwayरेल्वेNarendra Modiनरेंद्र मोदीIndian Railwayभारतीय रेल्वे