शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

'फुटिरतावाद्यांशी कठोर भूमिका घेतली तरच काश्मीरचा विकास' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 09:31 IST

जम्मू काश्मीरला देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्या राज्यात स्थानिक पातळीवर पंचायत समिती, नगरपालिका अशा निवडणुका व्हायला हव्या होत्या हे आमचे प्रयत्न होते

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरला देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्या राज्यात स्थानिक पातळीवर पंचायत समिती, नगरपालिका अशा निवडणुका व्हायला हव्या होत्या हे आमचे प्रयत्न होते. मात्र तेथील फुटिरतावादी नेत्यांनी निवडणुका घेतल्या तर हत्या होतील, दंगली घडतील असा कांगावा केला. यातूनच आम्ही पीडीपीसोबतशी युती तोडली. आज त्या राज्यात स्थानिक पातळीवर निवडणुका होत आहेत. लोकं उत्स्फुर्तपणे मतदान करतात. 75 टक्के मतदान होतंय पण एकही हिंसक घटना घडली नाही. निवडणुका झाल्यातरच विकास होऊ शकतो असं मतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले.  

आज जम्मू काश्मीरमध्ये प्रत्येक घरात आज वीज पोहचली आहे. शौचालय बनले, कृषी आणि खादी क्षेत्राचा विकास झाला. पर्यटनामुळे जम्मू काश्मीरच्या विकासाला चालना मिळाली. आम्ही योग्य दिशेने चाललो आहोत. फुटिरतावादी नेत्यांची कठोरतेने वागलो म्हणून हे शक्य झालं आहे. जे पुढे जाण्यासाठी तयार आहेत त्यांना घेऊन पुढे जाणार असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. 

देशद्रोहाचा कायदा रद्द करण्याचं आश्वासन चिंताजनक

कायदा रद्द करण्याची भाषा भाजपाने केली नाही. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात देशद्रोह कायदा रद्द करण्याची भाषा फुटिरतावादी नेत्यांची आहे. काही वर्षांपूर्वी तामिळनाडूत न्युक्लिअर प्लांटचे आंदोलन झालं होतं त्यावेळी काँग्रेसने 6 हजार लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. देशाच्या तिरंग्याचा कोण अपमान करत असेल, कोणी आपल्या संविधानाचा अपमान करत असेल त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चाललाच पाहिजे. सामान्य माणसांचे जीवन सुलभ करण्यासाठी जे जाचक कायदे आहेत ते आम्ही मोडीत काढले.

नरेंद्र मोदींचे काँग्रेसवर आरोप

मी आता देशभरात प्रचारासाठी नव्हे तर मतदारांचे आभार मानण्यासाठी जातोय, त्यांनी मला 60 महिने देश चालविण्याची संधी दिली, 60 वर्षाच्या तुलनेत 60 महिन्यात काम चांगले झाले.  गेल्या 60 महिन्यात सरकारच्या कामामध्ये शिस्त, कठोर निर्णय, देशाच्या विकासाला गती देण्याचं काम केलं. स्वातंत्र्यानंतर फक्त 2 पंतप्रधान देशात झाले ते कॉंग्रेसच्या गोत्रातील नाही. एक अटलबिहारी वाजपेयी आणि दुसरे नरेंद्र मोदी आहेत. काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्याने लोकांची निराशा केली. काँग्रेसने जी आश्वासने दिली ती फोल ठरली. काँग्रेसने जाहीरनाम्यात शॉर्टकट शोधला आहे. काँग्रेसचा निवडणुकीतील आश्वासनांचा ट्रॅक रेकॉर्ड खराब असल्याचा आरोप मोदींनी केला. दिडशे वर्षाची परंपरा असलेला काँग्रेस पक्ष आहे, या पक्षात नवं नेतृत्त्व का निर्माण केलं जात नाही हा चिंतेचा विषय आहे असंही नरेंद्र मोदी यांनी सांगितले.   

अखेर काय घडलं होतं 'त्या' रात्री? मोंदींनी उलगडलं एअर स्ट्राईकचं रहस्य

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीJammu Kashmirजम्मू-काश्मीर