शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

'फुटिरतावाद्यांशी कठोर भूमिका घेतली तरच काश्मीरचा विकास' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 09:31 IST

जम्मू काश्मीरला देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्या राज्यात स्थानिक पातळीवर पंचायत समिती, नगरपालिका अशा निवडणुका व्हायला हव्या होत्या हे आमचे प्रयत्न होते

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरला देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्या राज्यात स्थानिक पातळीवर पंचायत समिती, नगरपालिका अशा निवडणुका व्हायला हव्या होत्या हे आमचे प्रयत्न होते. मात्र तेथील फुटिरतावादी नेत्यांनी निवडणुका घेतल्या तर हत्या होतील, दंगली घडतील असा कांगावा केला. यातूनच आम्ही पीडीपीसोबतशी युती तोडली. आज त्या राज्यात स्थानिक पातळीवर निवडणुका होत आहेत. लोकं उत्स्फुर्तपणे मतदान करतात. 75 टक्के मतदान होतंय पण एकही हिंसक घटना घडली नाही. निवडणुका झाल्यातरच विकास होऊ शकतो असं मतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले.  

आज जम्मू काश्मीरमध्ये प्रत्येक घरात आज वीज पोहचली आहे. शौचालय बनले, कृषी आणि खादी क्षेत्राचा विकास झाला. पर्यटनामुळे जम्मू काश्मीरच्या विकासाला चालना मिळाली. आम्ही योग्य दिशेने चाललो आहोत. फुटिरतावादी नेत्यांची कठोरतेने वागलो म्हणून हे शक्य झालं आहे. जे पुढे जाण्यासाठी तयार आहेत त्यांना घेऊन पुढे जाणार असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. 

देशद्रोहाचा कायदा रद्द करण्याचं आश्वासन चिंताजनक

कायदा रद्द करण्याची भाषा भाजपाने केली नाही. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात देशद्रोह कायदा रद्द करण्याची भाषा फुटिरतावादी नेत्यांची आहे. काही वर्षांपूर्वी तामिळनाडूत न्युक्लिअर प्लांटचे आंदोलन झालं होतं त्यावेळी काँग्रेसने 6 हजार लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. देशाच्या तिरंग्याचा कोण अपमान करत असेल, कोणी आपल्या संविधानाचा अपमान करत असेल त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चाललाच पाहिजे. सामान्य माणसांचे जीवन सुलभ करण्यासाठी जे जाचक कायदे आहेत ते आम्ही मोडीत काढले.

नरेंद्र मोदींचे काँग्रेसवर आरोप

मी आता देशभरात प्रचारासाठी नव्हे तर मतदारांचे आभार मानण्यासाठी जातोय, त्यांनी मला 60 महिने देश चालविण्याची संधी दिली, 60 वर्षाच्या तुलनेत 60 महिन्यात काम चांगले झाले.  गेल्या 60 महिन्यात सरकारच्या कामामध्ये शिस्त, कठोर निर्णय, देशाच्या विकासाला गती देण्याचं काम केलं. स्वातंत्र्यानंतर फक्त 2 पंतप्रधान देशात झाले ते कॉंग्रेसच्या गोत्रातील नाही. एक अटलबिहारी वाजपेयी आणि दुसरे नरेंद्र मोदी आहेत. काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्याने लोकांची निराशा केली. काँग्रेसने जी आश्वासने दिली ती फोल ठरली. काँग्रेसने जाहीरनाम्यात शॉर्टकट शोधला आहे. काँग्रेसचा निवडणुकीतील आश्वासनांचा ट्रॅक रेकॉर्ड खराब असल्याचा आरोप मोदींनी केला. दिडशे वर्षाची परंपरा असलेला काँग्रेस पक्ष आहे, या पक्षात नवं नेतृत्त्व का निर्माण केलं जात नाही हा चिंतेचा विषय आहे असंही नरेंद्र मोदी यांनी सांगितले.   

अखेर काय घडलं होतं 'त्या' रात्री? मोंदींनी उलगडलं एअर स्ट्राईकचं रहस्य

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीJammu Kashmirजम्मू-काश्मीर