शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

'फुटिरतावाद्यांशी कठोर भूमिका घेतली तरच काश्मीरचा विकास' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 09:31 IST

जम्मू काश्मीरला देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्या राज्यात स्थानिक पातळीवर पंचायत समिती, नगरपालिका अशा निवडणुका व्हायला हव्या होत्या हे आमचे प्रयत्न होते

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरला देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्या राज्यात स्थानिक पातळीवर पंचायत समिती, नगरपालिका अशा निवडणुका व्हायला हव्या होत्या हे आमचे प्रयत्न होते. मात्र तेथील फुटिरतावादी नेत्यांनी निवडणुका घेतल्या तर हत्या होतील, दंगली घडतील असा कांगावा केला. यातूनच आम्ही पीडीपीसोबतशी युती तोडली. आज त्या राज्यात स्थानिक पातळीवर निवडणुका होत आहेत. लोकं उत्स्फुर्तपणे मतदान करतात. 75 टक्के मतदान होतंय पण एकही हिंसक घटना घडली नाही. निवडणुका झाल्यातरच विकास होऊ शकतो असं मतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले.  

आज जम्मू काश्मीरमध्ये प्रत्येक घरात आज वीज पोहचली आहे. शौचालय बनले, कृषी आणि खादी क्षेत्राचा विकास झाला. पर्यटनामुळे जम्मू काश्मीरच्या विकासाला चालना मिळाली. आम्ही योग्य दिशेने चाललो आहोत. फुटिरतावादी नेत्यांची कठोरतेने वागलो म्हणून हे शक्य झालं आहे. जे पुढे जाण्यासाठी तयार आहेत त्यांना घेऊन पुढे जाणार असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. 

देशद्रोहाचा कायदा रद्द करण्याचं आश्वासन चिंताजनक

कायदा रद्द करण्याची भाषा भाजपाने केली नाही. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात देशद्रोह कायदा रद्द करण्याची भाषा फुटिरतावादी नेत्यांची आहे. काही वर्षांपूर्वी तामिळनाडूत न्युक्लिअर प्लांटचे आंदोलन झालं होतं त्यावेळी काँग्रेसने 6 हजार लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. देशाच्या तिरंग्याचा कोण अपमान करत असेल, कोणी आपल्या संविधानाचा अपमान करत असेल त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चाललाच पाहिजे. सामान्य माणसांचे जीवन सुलभ करण्यासाठी जे जाचक कायदे आहेत ते आम्ही मोडीत काढले.

नरेंद्र मोदींचे काँग्रेसवर आरोप

मी आता देशभरात प्रचारासाठी नव्हे तर मतदारांचे आभार मानण्यासाठी जातोय, त्यांनी मला 60 महिने देश चालविण्याची संधी दिली, 60 वर्षाच्या तुलनेत 60 महिन्यात काम चांगले झाले.  गेल्या 60 महिन्यात सरकारच्या कामामध्ये शिस्त, कठोर निर्णय, देशाच्या विकासाला गती देण्याचं काम केलं. स्वातंत्र्यानंतर फक्त 2 पंतप्रधान देशात झाले ते कॉंग्रेसच्या गोत्रातील नाही. एक अटलबिहारी वाजपेयी आणि दुसरे नरेंद्र मोदी आहेत. काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्याने लोकांची निराशा केली. काँग्रेसने जी आश्वासने दिली ती फोल ठरली. काँग्रेसने जाहीरनाम्यात शॉर्टकट शोधला आहे. काँग्रेसचा निवडणुकीतील आश्वासनांचा ट्रॅक रेकॉर्ड खराब असल्याचा आरोप मोदींनी केला. दिडशे वर्षाची परंपरा असलेला काँग्रेस पक्ष आहे, या पक्षात नवं नेतृत्त्व का निर्माण केलं जात नाही हा चिंतेचा विषय आहे असंही नरेंद्र मोदी यांनी सांगितले.   

अखेर काय घडलं होतं 'त्या' रात्री? मोंदींनी उलगडलं एअर स्ट्राईकचं रहस्य

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीJammu Kashmirजम्मू-काश्मीर