शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
4
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
5
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
6
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
7
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
8
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
9
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
10
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
11
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
12
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
13
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
14
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
15
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
16
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
17
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
18
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
19
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
20
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे

CoronaVirus : 21 दिवस 9 गरीब कुटुंबांची मदत करून देवीची आराधना करा, पंतप्रधानांचे जनतेला आवाहन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 19:29 IST

मोदी म्हणाले, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा केली जाते. माता शैलपुत्री स्नेह, करुणा आणि ममतेचे रुप आहे. माता शैलपुत्रीला प्रकृतीची देवताही म्हटले जाते. आज देश ज्या संकाटातून चालला आहे, आशा वेळी तिच्या आशीर्वादाची अत्यंत आवश्यकता आहे. मी कामना करतो, की आपण तिच्या आशीर्वादेने या संकटाचा धैर्याने सामना करू.

ठळक मुद्देमोदी म्हणाले, कोरोना व्हायरस आपली संस्कृती आणि संस्कार नष्ट करूच शकत नाही  कोरोनाला केवळ करुणेनेच प्रत्युत्तर दिले जाऊ शकते - मोदी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हेल्पलाईन नंबरही सार्वजनिक केला

वाराणसी - कोरोनाला केवळ करुणेनेच प्रत्युत्तर दिले जाऊ शकते. आपण या संकटप्रसंगी गरिबांच्या प्रती करुणा दाखवू शकतो. आता नवरात्र सुरू आहे. या निमित्ताने आपण पुढील 21 दिवस 9 गरीब कुटुंबाचे पालन करण्याची जबाबदारी घेतली, तर नवरात्र यशस्वी होईल. या शिवाय आपल्या सभोवताली असणाऱ्या प्राण्यांचीही काळजी घ्या, असे आवाहन पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी आज जनतेला केले. संपूर्ण जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना व्हायरसबरोबरच्या लढाल्या सुरुवात केल्यानंतर, त्यांनी आज वाराणसीतील जनतेशी संवाद साधला. 

मोदी म्हणाले, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा केली जाते. माता शैलपुत्री स्नेह, करुणा आणि ममतेचे रुप आहे. माता शैलपुत्रीला प्रकृतीची देवताही म्हटले जाते. आज देश ज्या संकाटातून चालला आहे, आशा वेळी तिच्या आशीर्वादाची अत्यंत आवश्यकता आहे. मी कामना करतो, की आपण तिच्या आशीर्वादेने या संकटाचा धैर्याने सामना करू.

कोरोना व्हायरस आपली संस्कृती आणि संस्कार नष्ट करूच शकत नाही. यामुळे संकटाच्या काळात आपली संवेदना जागृत होते. मी म्हणालो, की सर्वकाही व्यवस्थित आहे, तर ते स्वतःलाच धोका दिल्यासारखे होईल. या क्षणाला केंद्र सरकार असो अथवा राज्य सरकारे या व्हायरसशी लढण्याचा पराकोटीने प्रयत्न करत आहेत. आपल्या देशासमोर एवढेमोठे संकट असताना आणि संपूर्ण जग या संकटाशी लढत असताना, सर्वकाही ठीक होईल असे म्हणणे म्हणजे, आपणच आपल्याला धोका दिल्यासारखे आहे, असे मोदी म्हणाले.

महाभारताचे युद्ध 18 दिवसांत जिंकले गेले होते. मात्र आज कोरोनाविरुद्ध संपूर्ण देश जे युद्ध लढत आहे, ते 21 दिवस चालणार आहे. 21 दिवसांतच हे युद्ध जिंकण्याचा आपला प्रयत्न आहे, असेही मोदी म्हणाले,

वाराणसीतील जनतेच्या प्रश्नांना उत्तरे देताना मोदी म्हणाले, अनेकदा लोक माहिती असतानाही चुका करतात. कोरोनाशी लढण्यासाठी केवळ सोशल डिस्टंसिंग हाच उपाय आहे. यामुळेच लोक बरेही होत आहेत. याची अनेक उदाहरणेही सापडली आहेत.  यावेळी मोदींनी एक हेल्पलाइन नंबरही सार्वजनिक केला. मोदी म्हणाले, कोरोनासंदर्भातील अचूक आणि योग्य माहिती घेण्यासाठी सरकारने व्हॉट्सअॅपच्या सहाय्याने एक हेल्पडेस्कदेखील तयार केला आहे. जर तुमच्याकडे व्हॉट्सअॅप सुविधा असेल तर, 9013151515 या क्रमांकावर 'नमस्ते' लिहून पाठवा. तुम्हाला योग्य माहिती मिळणे प्रारंभ होईल.

आज आपण जो त्रास सहन करत  आहोत, तो सध्या केवळ 21 दिवसांचाच आहे. कोरोनाचे संकट नष्ट झाले नाही आणि त्याचा प्रसार थांबला नाही, तर केवढे मोठे नुकसान होणार आहे, याचा अंदाज लावता येणार नाही. निराशा पसरविण्याची अनेक कारणे असू शकतात. मात्र,  जीवन हे केवळ आशा आणि विश्वासावरच चालते. आपण एक नागरिक म्हणून प्रशासनाला जेवढे सहकार्य कराल तेवढेच चांगले परिणामही येतील. प्रशासनावर कमीत कमी ताण यावा हाच आपल्या सर्वांचा प्रयत्न असायला हवा. आपण, रुग्णालयांत काम करणारे, पोलीस कर्मचारी, शासकीय कार्यालयांत काम करणारे आणि माध्यमप्रतिनिधी यांचा विश्वास वाढवायला हवा, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानUttar Pradeshउत्तर प्रदेश