शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : 21 दिवस 9 गरीब कुटुंबांची मदत करून देवीची आराधना करा, पंतप्रधानांचे जनतेला आवाहन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 19:29 IST

मोदी म्हणाले, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा केली जाते. माता शैलपुत्री स्नेह, करुणा आणि ममतेचे रुप आहे. माता शैलपुत्रीला प्रकृतीची देवताही म्हटले जाते. आज देश ज्या संकाटातून चालला आहे, आशा वेळी तिच्या आशीर्वादाची अत्यंत आवश्यकता आहे. मी कामना करतो, की आपण तिच्या आशीर्वादेने या संकटाचा धैर्याने सामना करू.

ठळक मुद्देमोदी म्हणाले, कोरोना व्हायरस आपली संस्कृती आणि संस्कार नष्ट करूच शकत नाही  कोरोनाला केवळ करुणेनेच प्रत्युत्तर दिले जाऊ शकते - मोदी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हेल्पलाईन नंबरही सार्वजनिक केला

वाराणसी - कोरोनाला केवळ करुणेनेच प्रत्युत्तर दिले जाऊ शकते. आपण या संकटप्रसंगी गरिबांच्या प्रती करुणा दाखवू शकतो. आता नवरात्र सुरू आहे. या निमित्ताने आपण पुढील 21 दिवस 9 गरीब कुटुंबाचे पालन करण्याची जबाबदारी घेतली, तर नवरात्र यशस्वी होईल. या शिवाय आपल्या सभोवताली असणाऱ्या प्राण्यांचीही काळजी घ्या, असे आवाहन पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी आज जनतेला केले. संपूर्ण जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना व्हायरसबरोबरच्या लढाल्या सुरुवात केल्यानंतर, त्यांनी आज वाराणसीतील जनतेशी संवाद साधला. 

मोदी म्हणाले, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा केली जाते. माता शैलपुत्री स्नेह, करुणा आणि ममतेचे रुप आहे. माता शैलपुत्रीला प्रकृतीची देवताही म्हटले जाते. आज देश ज्या संकाटातून चालला आहे, आशा वेळी तिच्या आशीर्वादाची अत्यंत आवश्यकता आहे. मी कामना करतो, की आपण तिच्या आशीर्वादेने या संकटाचा धैर्याने सामना करू.

कोरोना व्हायरस आपली संस्कृती आणि संस्कार नष्ट करूच शकत नाही. यामुळे संकटाच्या काळात आपली संवेदना जागृत होते. मी म्हणालो, की सर्वकाही व्यवस्थित आहे, तर ते स्वतःलाच धोका दिल्यासारखे होईल. या क्षणाला केंद्र सरकार असो अथवा राज्य सरकारे या व्हायरसशी लढण्याचा पराकोटीने प्रयत्न करत आहेत. आपल्या देशासमोर एवढेमोठे संकट असताना आणि संपूर्ण जग या संकटाशी लढत असताना, सर्वकाही ठीक होईल असे म्हणणे म्हणजे, आपणच आपल्याला धोका दिल्यासारखे आहे, असे मोदी म्हणाले.

महाभारताचे युद्ध 18 दिवसांत जिंकले गेले होते. मात्र आज कोरोनाविरुद्ध संपूर्ण देश जे युद्ध लढत आहे, ते 21 दिवस चालणार आहे. 21 दिवसांतच हे युद्ध जिंकण्याचा आपला प्रयत्न आहे, असेही मोदी म्हणाले,

वाराणसीतील जनतेच्या प्रश्नांना उत्तरे देताना मोदी म्हणाले, अनेकदा लोक माहिती असतानाही चुका करतात. कोरोनाशी लढण्यासाठी केवळ सोशल डिस्टंसिंग हाच उपाय आहे. यामुळेच लोक बरेही होत आहेत. याची अनेक उदाहरणेही सापडली आहेत.  यावेळी मोदींनी एक हेल्पलाइन नंबरही सार्वजनिक केला. मोदी म्हणाले, कोरोनासंदर्भातील अचूक आणि योग्य माहिती घेण्यासाठी सरकारने व्हॉट्सअॅपच्या सहाय्याने एक हेल्पडेस्कदेखील तयार केला आहे. जर तुमच्याकडे व्हॉट्सअॅप सुविधा असेल तर, 9013151515 या क्रमांकावर 'नमस्ते' लिहून पाठवा. तुम्हाला योग्य माहिती मिळणे प्रारंभ होईल.

आज आपण जो त्रास सहन करत  आहोत, तो सध्या केवळ 21 दिवसांचाच आहे. कोरोनाचे संकट नष्ट झाले नाही आणि त्याचा प्रसार थांबला नाही, तर केवढे मोठे नुकसान होणार आहे, याचा अंदाज लावता येणार नाही. निराशा पसरविण्याची अनेक कारणे असू शकतात. मात्र,  जीवन हे केवळ आशा आणि विश्वासावरच चालते. आपण एक नागरिक म्हणून प्रशासनाला जेवढे सहकार्य कराल तेवढेच चांगले परिणामही येतील. प्रशासनावर कमीत कमी ताण यावा हाच आपल्या सर्वांचा प्रयत्न असायला हवा. आपण, रुग्णालयांत काम करणारे, पोलीस कर्मचारी, शासकीय कार्यालयांत काम करणारे आणि माध्यमप्रतिनिधी यांचा विश्वास वाढवायला हवा, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानUttar Pradeshउत्तर प्रदेश