शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा अजेंडा ठरला?; पंतप्रधान मोदींच्या भाषणातून मोठे संकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 16:54 IST

२०४७ मध्ये देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न पाहायचे असेल, तर महिलांच्या सहभागाशिवाय हे काम अपूर्णच राहणार असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा अजेंडा स्पष्ट केला आहे. ‘भ्रष्टाचारावर केलेली कारवाई’ या जोरावर भाजपा ही लढाई लढणार असल्याचे संकेत मोदींनी दिले आहेत. ईडी-सीबीआयच्या राजकीय गैरवापराबाबत विरोधकांच्या आरोपांमुळे विचलित न होता भ्रष्ट नेत्यांवर कारवाई सुरूच राहील असंही पंतप्रधान मोदींच्या भाषणातून संकेत मिळाले आहेत.  

म्हणजेच आगामी काळात विरोधी पक्षनेत्यांच्या अडचणी वाढू शकतात. महिलांच्या सन्मानाचा मुद्दा उपस्थित करून पंतप्रधानांनी आगामी काळातही केंद्र सरकारच्या महिलाभिमुख योजना महत्त्वाच्या राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. यामुळे २०२४ मध्ये पुन्हा सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो याची जाणीव भाजपाला आहे. पंतप्रधानांनी विविध क्षेत्रातील पात्र तरुणांच्या प्रगतीमध्ये भ्रष्टाचार हा अडथळा असल्याचं म्हटलं. सर्व क्षेत्रांतून भ्रष्टाचार आणि घराणेशाहीचे समूळ उच्चाटन केल्यास त्या क्षेत्रातील तरुणांचा  मार्ग सुकर होईल असं मोदींनी सांगितले. यामुळे बिगर राजकीय क्षेत्रातही भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट होते. यामुळे तरुणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा मजबूत होईल.

पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून 'महिलांच्या सन्मानाचा' मुद्दा गांभीर्याने घेतला आहे. सार्वजनिक जीवनातही लोक महिलांचा अपमान करतात, असे त्यांनी म्हटले आहे. यातून महिलांचा अपमान तर होतोच, पण त्यामुळे देशाच्या आणि समाजाच्या विकासाला खीळ बसते. २०४७ मध्ये देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न पाहायचे असेल, तर महिलांच्या सहभागाशिवाय हे काम अपूर्णच राहणार असल्याचे मोदींनी स्पष्ट केले. महिलांना योग्य भूमिका दिल्यास भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प सोपा होईल. केंद्र सरकारच्या योजनांमध्ये येत्या काही वर्षांत महिलाभिमुख योजनांचा समावेश राहणार असल्याचेही यावरून स्पष्ट होते. २०१९ मध्ये भाजपाच्या सत्तेत पुनरागमन करण्यात महिलांचाही मोठा वाटा होता.

गेल्या काही दिवसांपासून अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि सीबीआयकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांवर सातत्याने कारवाई सुरू आहे. यूपी, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंडपासून देशाच्या अनेक भागांमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांवर किंवा त्यांच्या निकटवर्तीयांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत कोट्यवधी रुपयांची रोकड, मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने आणि जंगम मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई मुख्यतः विरोधी पक्षांच्या नेत्यांवर किंवा त्यांच्या जवळच्या लोकांवर झाली असल्याने, विरोधकांना धमकावण्याचा आणि राज्यात सत्ता मिळवण्याचा उद्देश असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. पण हा आरोप पूर्णत: खरा नाही. केंद्र सरकारने राजकारणासह अनेक क्षेत्रातील भ्रष्टाचार्‍यांवर कारवाई केली आहे. केंद्र सरकारच्या कारभारात मूळ असलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना बळजबरीने निवृत्त करून त्याची सुरुवात झाली. नंतर अशाच प्रकारची कारवाई इतर बिगर राजकीय क्षेत्रातही करण्यात आली आहे असंही मोदींनी भाषणातून सूचित केले.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा