शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

महाकुंभमेळ्यावर टीका करणाऱ्या विरोधकांचा PM मोदींनी घेतला समाचार; म्हणाले, “धर्म अन् देश...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 10:40 IST

PM Narendra Modi News: महाकुंभमेळा एकतेचा महाकुंभ म्हणून प्रेरणा देत राहील, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.

PM Narendra Modi News: १४४ वर्षांनी आलेल्या महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले. महाशिवरात्रीला महाकुंभमेळ्याची सांगता होणार आहे. मकर संक्रातीला सुरू झालेल्या या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत तब्बल ६२ कोटींहून अधिक लोकांनी हजेरी लावली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून दिग्गज कलाकार, सेलिब्रिटी, उद्योजक अतीव श्रद्धेने सहभागी झाले. आता १४४ वर्षांनी महाकुंभमेळ्याचा योग जुळून येणार आहे. महाकुंभमेळ्यात काही अप्रिय घटनाही घडल्या. यावरून विरोधकांनी उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारवर यथेच्छ टीका केली. यावरून आता पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना चांगलेच सुनावले आहे. 

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महाकुंभमध्ये गैरव्यवस्थापन आणि चेंगराचेंगरीच्या घटनांचा दाखला देत महाकुंभला ‘मृत्यू कुंभ’ संबोधले होते. तसेच इंडिया आघाडीतील सामील पक्षांच्या नेत्यांनीही महाकुंभमेळ्यावरून टीकास्त्र सोडले. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांच्या टीकेचा खरपूस शब्दांत समाचार घेत पलटवार केला आहे. 

देश आणि धर्म कमकुवत करण्याचा प्रयत्न 

गुलामांची मानसिकता असलेले लोक परदेशी शक्तींच्या पाठिंब्याने देशाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांवर आक्रमण करीत आहेत. आताच्या घडीला आपण पाहतो की, आपल्या धर्माची खिल्ली उडवणाऱ्या नेत्यांचा एक गट आहे. ते एकता भंग करण्यात आणि लोकांमध्ये फूट पाडण्यात गुंतलेले आहेत. अनेक वेळा परदेशी शक्तीही या लोकांना पाठिंबा देऊन देश आणि धर्म कमकुवत करण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. हिंदू धर्माचा द्वेष करणारे हे लोक शतकानुशतके कोणत्या ना कोणत्या वेशात जगत आहेत. गुलामगिरीच्या मानसिकतेने वेढलेले हे लोक आपल्या मठांवर, मंदिरांवर, आपल्या संतांवर, संस्कृतीवर आणि तत्त्वांवर हल्ले करत राहतात. हे लोक आपले सण, परंपरा आणि चालीरीतींचा गैरवापर करतात. पुरोगामी असलेल्या धर्म आणि संस्कृतीवर चिखलफेक करण्याचे धाडस ते दाखवतात, या शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी निशाणा साधला.

दरम्यान, भारतात होत असलेल्या महाकुंभमेळ्याची सर्वत्र चर्चा होत आहे. महाकुंभ आता पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे. आतापर्यंत कोट्यवधी लोक महाकुंभमेळ्यात पोहोचले आहेत. कोट्यवधी लोकांनी अद्भूत अनुभव घेतला आहे. संतांचे दर्शन घेतले आहे. आपण या महाकुंभाकडे पाहिले तर आपल्याला सहज लक्षात येईल की, हा एकतेचा महाकुंभ आहे. १४४ वर्षांनी आलेला हा महाकुंभमेळा एकतेचा महाकुंभ म्हणून प्रेरणा देत राहील, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.

 

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाNarendra Modiनरेंद्र मोदी