शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

Pm Modi vs Congress: "काँग्रेस फक्त २ राज्यांतच शिल्लक, ती जिथून काँग्रेस जाते तिथे..."; मोदींना लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 14:20 IST

काँग्रेसने केवळ लुटमार केली, भाजपाने मात्र विकासाची कामे केली- PM मोदी

Pm Modi vs Congress: हिमाचल प्रदेशातील कांगडा येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली. 'आता काँग्रेसचे सरकार फक्त २ राज्यांमध्ये उरले आहे. काँग्रेस जिथून जाते, तिथे त्यांना सत्तेत परतणे कठीण आहे,' असा टोला PM Narendra Modi यांनी लगावला. यासोबतच, काँग्रेसवर आतापर्यंत केवळ लुटमारीचेच काम केले, तर भारतीय जनता पक्षाने राजकीय कार्यपद्धती बदलून कामावर लक्ष केंद्रित केले आणि विकासाची कामे केली, असे विधानही पंतप्रधानांनी केले.

कांगडा येथील चंबी येथे एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "कांगडा ही भूमी शक्तीपीठांची भूमी आहे. हे भारताच्या श्रद्धा आणि अध्यात्माचे तीर्थक्षेत्र आहे. बैजनाथ ते काठगढपर्यंत या भूमीत बाबा भोलेंची असीम कृपा सदैव आपल्या सर्वांवर राहते. आज २१व्या शतकात हिमाचल विकासाच्या टप्प्यावर आहे. त्यांना स्थिर आणि मजबूत सरकारची गरज आहे. जेव्हा हिमाचलमध्ये मजबूत सरकार आणि दुप्पट सामर्थ्य असेल, तेव्हा ते आव्हानांवर मात करतील आणि तितक्याच वेगाने नवी उंची गाठतील."

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, "विकासाचा नवा संकल्प घेऊन एवढा चांगला जाहीरनामा बनवल्याबद्दल सर्वप्रथम मी हिमाचल भाजपचे अभिनंदन करतो. हिमाचल भाजपचे लोक शुभ संकल्प करून येथील विकासाला नव्या उंचीवर नेतील. यावेळी उत्तराखंडच्या जनतेनेही जुनी परंपरा बदलून भाजपला विजय मिळवून दिला. उत्तर प्रदेशातही ४० वर्षांनंतर एखादा पक्ष पुन्हा जिंकला आणि पूर्ण बहुमताने सलग दुसऱ्यांदा सरकारमध्ये आला. मणिपूरमध्येही पुन्हा भाजपचे सरकार आले आहे. त्यामुळे लोकांचा भाजपावर विश्वास असल्याचे स्पष्ट झाले आहे," असेही त्यांनी नमूद केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानHimachal Pradeshहिमाचल प्रदेशcongressकाँग्रेस