शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
3
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
6
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
7
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
8
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
11
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
12
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
13
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
14
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
15
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
16
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
17
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
18
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
19
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
20
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त

आंदोलनजीवी प्रवृत्तींपासून सावध राहा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संसदेत हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 06:52 IST

नव्या कृषी कायद्यांना यापूर्वी पाठिंबा देणाऱ्या विरोधी पक्षांनी आता घूमजाव केले आहे, असा आरोप मोदी यांनी केला.

नवी दिल्ली : आंदोलन केल्याशिवाय जगू न शकणारी ‘आंदोलनजीवी’ ही नवी जमात सध्या देशात पैदा झाली आहे. या आंदोलनकारी प्रवृत्तींपासून देशाने सावध राहायला हवे, अशी कडक टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केली. नव्या कृषी कायद्यांना यापूर्वी पाठिंबा देणाऱ्या विरोधी पक्षांनी आता घूमजाव केले आहे, असा आरोपही मोदी यांनी केला.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाबद्दल मांडण्यात आलेल्या आभार प्रदर्शनाच्या ठरावावरील चर्चेत विरोधकांनी अनेक मुद्दे राज्यसभेत उपस्थित केले होते. त्याला उत्तर देताना मोदी म्हणाले की, नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी सुरू ठेवलेले आंदोलन मागे घ्यावे. केंद्र सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास तयार आहे. मोदी यांनी सांगितले की, नवे एफडीआय (विदेशी विध्वंसक विचारसरणी) फोफावताना दिसत आहे. अशा विचारांपासून देशाला वाचविण्यासाठी आपण सर्वांनी अधिक जागरूक राहिले पाहिजे. शेतकऱ्यांनी नव्या कृषी कायद्यांबद्दल केंद्र सरकारशी चर्चा करण्याकरिता पुढे यावे. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. याआधीही केंद्रीय कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी काही वेळा चर्चा केली आहे. आंदोलनात वयोवृद्ध गृहस्थ दिवसेंदिवस ठिय्या देऊन बसले आहेत, ही चांगली गोष्ट नाही. या वयोवृद्धांना आंदोलकांनी घरी परत पाठविले पाहिजे.  नरेंद्र मोदी म्हणाले की, किमान हमीभावही कायम राहणार आहे. नव्या कृषी कायद्यांमुळे सुधारणा अधिक गतिमान होणार आहेत. त्याचा फायदा सर्वांनी घेतला पाहिजे. 

शिखांची बदनामी करण्याचा डाव पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, शिखांबद्दल काही जणांनी वापरलेली बदनामीकारक भाषा अतिशय अयोग्य आहे. हा डाव हाणून पाडला पाहिजे. शेतीमध्ये योग्य सुुधारणा झाल्या पाहिजेत असे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटले होते. त्यांच्या विचारांची अंमलबजावणी मोदी करत आहे याचा काँग्रेसला अभिमान वाटला पाहिजे, असा टोला नरेंद्र मोदी यांनी लगावला.

शरद पवारांनी विराेध केला नाहीशरद पवार व काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी याआधी शेती सुधारणांना पाठिंबा दिला आहे. आताही पवारांनी शेती सुधारणांना विरोध केलेला नाही. आमच्या सरकारला ज्या योग्य वाटल्या, त्या शेती सुधारणा आम्ही केल्या आहेत. यापुढेही करत राहू.

भाषणात डाॅ. सिंग यांचा उल्लेखशेतीमध्ये योग्य सुुधारणा झाल्या पाहिजेत, असे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटले होते. त्यांच्या विचारांची अंमलबजावणी मोदी करत आहेत, याचा काँग्रेसला अभिमान वाटला पाहिजे.

किमान हमी भाव कायम राहण्यासाठी कायदा करावागाझियाबाद : किमान हमी भाव कायम राहाण्यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा अशी मागणी भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी पुन्हा केली आहे. भूक, अन्नधान्याशी संबंधित प्रश्नांवर व्यापारी पद्धतीच्या वाटाघाटी कोणीही करू नयेत. असे प्रयत्न करणाऱ्यांना देशाबाहेर हाकलून द्यायला हवे.  केंद्राने नवे कृषी कायदे मागे घ्यावेत. शेतकरी सरकारशी चर्चा करण्याकरिता तयार आहेत असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीManmohan Singhमनमोहन सिंगSharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेसFarmers Protestशेतकरी आंदोलन