शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
2
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
3
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
4
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
5
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
6
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
7
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
8
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
9
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
10
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
11
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
12
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
13
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
14
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
15
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
16
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
17
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
18
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
19
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
20
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनजीवी प्रवृत्तींपासून सावध राहा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संसदेत हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 06:52 IST

नव्या कृषी कायद्यांना यापूर्वी पाठिंबा देणाऱ्या विरोधी पक्षांनी आता घूमजाव केले आहे, असा आरोप मोदी यांनी केला.

नवी दिल्ली : आंदोलन केल्याशिवाय जगू न शकणारी ‘आंदोलनजीवी’ ही नवी जमात सध्या देशात पैदा झाली आहे. या आंदोलनकारी प्रवृत्तींपासून देशाने सावध राहायला हवे, अशी कडक टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केली. नव्या कृषी कायद्यांना यापूर्वी पाठिंबा देणाऱ्या विरोधी पक्षांनी आता घूमजाव केले आहे, असा आरोपही मोदी यांनी केला.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाबद्दल मांडण्यात आलेल्या आभार प्रदर्शनाच्या ठरावावरील चर्चेत विरोधकांनी अनेक मुद्दे राज्यसभेत उपस्थित केले होते. त्याला उत्तर देताना मोदी म्हणाले की, नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी सुरू ठेवलेले आंदोलन मागे घ्यावे. केंद्र सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास तयार आहे. मोदी यांनी सांगितले की, नवे एफडीआय (विदेशी विध्वंसक विचारसरणी) फोफावताना दिसत आहे. अशा विचारांपासून देशाला वाचविण्यासाठी आपण सर्वांनी अधिक जागरूक राहिले पाहिजे. शेतकऱ्यांनी नव्या कृषी कायद्यांबद्दल केंद्र सरकारशी चर्चा करण्याकरिता पुढे यावे. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. याआधीही केंद्रीय कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी काही वेळा चर्चा केली आहे. आंदोलनात वयोवृद्ध गृहस्थ दिवसेंदिवस ठिय्या देऊन बसले आहेत, ही चांगली गोष्ट नाही. या वयोवृद्धांना आंदोलकांनी घरी परत पाठविले पाहिजे.  नरेंद्र मोदी म्हणाले की, किमान हमीभावही कायम राहणार आहे. नव्या कृषी कायद्यांमुळे सुधारणा अधिक गतिमान होणार आहेत. त्याचा फायदा सर्वांनी घेतला पाहिजे. 

शिखांची बदनामी करण्याचा डाव पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, शिखांबद्दल काही जणांनी वापरलेली बदनामीकारक भाषा अतिशय अयोग्य आहे. हा डाव हाणून पाडला पाहिजे. शेतीमध्ये योग्य सुुधारणा झाल्या पाहिजेत असे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटले होते. त्यांच्या विचारांची अंमलबजावणी मोदी करत आहे याचा काँग्रेसला अभिमान वाटला पाहिजे, असा टोला नरेंद्र मोदी यांनी लगावला.

शरद पवारांनी विराेध केला नाहीशरद पवार व काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी याआधी शेती सुधारणांना पाठिंबा दिला आहे. आताही पवारांनी शेती सुधारणांना विरोध केलेला नाही. आमच्या सरकारला ज्या योग्य वाटल्या, त्या शेती सुधारणा आम्ही केल्या आहेत. यापुढेही करत राहू.

भाषणात डाॅ. सिंग यांचा उल्लेखशेतीमध्ये योग्य सुुधारणा झाल्या पाहिजेत, असे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटले होते. त्यांच्या विचारांची अंमलबजावणी मोदी करत आहेत, याचा काँग्रेसला अभिमान वाटला पाहिजे.

किमान हमी भाव कायम राहण्यासाठी कायदा करावागाझियाबाद : किमान हमी भाव कायम राहाण्यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा अशी मागणी भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी पुन्हा केली आहे. भूक, अन्नधान्याशी संबंधित प्रश्नांवर व्यापारी पद्धतीच्या वाटाघाटी कोणीही करू नयेत. असे प्रयत्न करणाऱ्यांना देशाबाहेर हाकलून द्यायला हवे.  केंद्राने नवे कृषी कायदे मागे घ्यावेत. शेतकरी सरकारशी चर्चा करण्याकरिता तयार आहेत असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीManmohan Singhमनमोहन सिंगSharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेसFarmers Protestशेतकरी आंदोलन