शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'PM नरेंद्र मोदींनी मणिपूरमध्ये जाऊन लोकांची माफी मागावी', काँग्रेसने साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 19:21 IST

Congress On Biren Singh Apologies: मणिपूर हिंसाचाराबद्दल आज मुख्यमंत्री बीरेन सिंग यांनी माफी मागितली आहे.

Congress On Manipur Violence: भारताच्या ईशान्येकडील मणिपूर राज्य गेल्या वर्षभरापासून हिंसाचाराच्या आगीत जळत आहे. याबाबत मुख्यमंत्री एन बीरेन सिंग यांनी आज (31 डिसेंबर 2024) पत्रकार परिषदेत माफी मागितली आणि लवकरच राज्यात शांतता प्रस्थापित करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, आता यावरुन काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. 'नरेंद्र मोदी जगभर फिरतात, पण मणिपूरला जाऊन तेथील लोकांची माफी का मागत नाहीत?' असा सवाल काँग्रेसने केला.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पंतप्रधानांवर मणिपूरकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी अद्याप मणिपूरला का गेले नाही, हे तिथल्या लोकांना समजत नाहीये. पंतप्रधान मणिपूरला जाऊन का माफी मागू शकत नाहीत? ते देश आणि जगाच्या कानाकोपऱ्यात फिरतात, मात्र 4 मे 2023 पासून मणिपूरचा दौरा ट देणे जाणूनबुजून टाळला'

'मणिपूरचे मुख्यमंत्री 19 महिने काहीही बोलले नाहीत. शेकडो लोक मारले गेले आणि हजारो विस्थापित झाले. मुख्यमंत्री आज यावर बोलले, पण पंतप्रधान अद्याप गप्प आहेत. मणिपूरचे अपयश पंतप्रधानांचे आहे. तुम्ही फक्त मदत शिबिरे उभारुन मणिपूरच्या जनतेवर उपकार केला नाही, ही तुमची जबाबदारी आहे.

मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी मागितली माफीमणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी आज राज्यातील हिंसाचाराबद्दल माफी मागितली आणि सर्व समुदायांना भूतकाळातील चुका विसरुन शांततापूर्ण आणि समृद्ध राज्यात एकत्र राहण्याचे आवाहन केले. हे संपूर्ण वर्ष खूप दुर्दैवी आहे. आजपर्यंत जे काही घडले, त्याबद्दल मला खेद वाटतो आणि मी सर्वांची माफी मागू इच्छितो. 2025 मध्ये राज्यातील परिस्थिती सामान्य होईल आणि शांतता परत येईल, अशी मला आशा आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी आज दिली. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी