शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
2
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
3
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
4
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
5
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
6
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
7
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
8
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
9
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
10
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
11
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
13
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
14
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
15
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
16
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
18
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
20
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

PM Narendra Modi: “अथक मेहनत, कठोर परिश्रमाने जनतेचा विश्वास जिंकलाय, PR करून नाही”: PM नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 15:16 IST

कोणत्याही शाही घराण्यातून येत नसल्यामुळे PR एजन्सीमुळे ही कामगिरी साध्य झालेली नाही, असे रोखठोक प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

ठळक मुद्देजनतेसाठी सर्वकाही, स्वतःसाठी काहीच नाहीअथक मेहनत, कठोर परिश्रमाने जनतेचा विश्वास जिंकलायकोणत्याही शाही घराण्यातून येत नसल्यामुळे PR एजन्सीमुळे ही कामगिरी साध्य झालेली नाही

नवी दिल्ली: सार्वजनिक जीवनात येण्यापूर्वी ३० ते ३५ वर्षे सामाजिक कार्यकर्ता म्हणून व्यतीत केले आहेत. या कालावधीत जीवनाचा मोठा अनुभव घेतला आहे. सामान्य माणसाच्या अडचणी, आकांक्षा आव्हाने आणि क्षमता जवळून आकलन केले आहे. अथक मेहनत आणि कठोर परिश्रमानेच जनतेचा विश्वास जिंकला आहे. कोणत्याही शाही घराण्यातून येत नसल्यामुळे PR एजन्सीमुळे ही कामगिरी साध्य झालेली नाही, असे रोखठोक प्रतिपादन पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केले आहे. एका नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान पंतप्रधान मोदी बोलत होते.  (pm narendra modi says we gather public trust with hard working not using pr agencies)

आमच्या कार्यकाळात राबवण्यात आलेली धोरणे, घेतलेले निर्णय सामान्य जनतेच्या समस्या कमी करणारे ठरले. म्हणूनच जनता आम्हाल त्यांच्यातील एक असेच समजते. पंतप्रधानपदी असलेली व्यक्तीला आपल्या अडचणींची जाणीव आहे, ही बाब जनतेला माहिती आहे, असेही पंतप्रधान मोदींनी नमूद केले. PR एजन्सीचा वापर करून प्रतिमा संवर्धन करण्याविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, पंतप्रधानपदी असलेली व्यक्ती जनतेला आपल्याच घरातील एक सदस्य वाटते. जनतेला असलेला विश्वास कोणत्याही PR एजन्सीमुळे आलेला नाही. तर, तो अथक प्रयत्नांनी संपादन केला आहे. त्यासाठी खूप घाम गाळला आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. 

जनतेसाठी सर्वकाही, स्वतःसाठी काहीच नाही

देशवासीयांसाठी शौचालये उभारून एका प्रकारे सेवा करण्याचे कोणाच्याही मनात आले नाही. ते आम्ही करून दाखवले. आम्ही घेतलेल्या निर्णयांमुळे सामान्य जनतेला वाटते की, पंतप्रधान असलेली व्यक्ती आपल्यासारखाच विचार करतो, आपल्या समस्या जाणतो आणि म्हणूनच आपोआप ते घरातील माणूस असल्यासारखे समजतात. जिथे जातो, तिथे भरपूर प्रेम जनतेचे मिळते. जे काही आहे, ते सर्व जनतेचे आणि जनतेसाठीच आहे. स्वतःसाठी काहीच करणार आहे. सर्व जीवन देशाच्या आणि देशवासीयांसाठी समर्पित आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, गेली सात वर्षे आम्ही सत्तेत आहोत. जनतेचा आमच्याबद्दल असलेला विश्वास आणखी मजबूत होत आहे. तसेच गेल्या सात वर्षातील कामगिरी हीदेखील जनतेच्या विश्वासामुळेच साध्य होऊ शकली, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानBJPभाजपाPoliticsराजकारण