शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

PM Narendra Modi: “अथक मेहनत, कठोर परिश्रमाने जनतेचा विश्वास जिंकलाय, PR करून नाही”: PM नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 15:16 IST

कोणत्याही शाही घराण्यातून येत नसल्यामुळे PR एजन्सीमुळे ही कामगिरी साध्य झालेली नाही, असे रोखठोक प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

ठळक मुद्देजनतेसाठी सर्वकाही, स्वतःसाठी काहीच नाहीअथक मेहनत, कठोर परिश्रमाने जनतेचा विश्वास जिंकलायकोणत्याही शाही घराण्यातून येत नसल्यामुळे PR एजन्सीमुळे ही कामगिरी साध्य झालेली नाही

नवी दिल्ली: सार्वजनिक जीवनात येण्यापूर्वी ३० ते ३५ वर्षे सामाजिक कार्यकर्ता म्हणून व्यतीत केले आहेत. या कालावधीत जीवनाचा मोठा अनुभव घेतला आहे. सामान्य माणसाच्या अडचणी, आकांक्षा आव्हाने आणि क्षमता जवळून आकलन केले आहे. अथक मेहनत आणि कठोर परिश्रमानेच जनतेचा विश्वास जिंकला आहे. कोणत्याही शाही घराण्यातून येत नसल्यामुळे PR एजन्सीमुळे ही कामगिरी साध्य झालेली नाही, असे रोखठोक प्रतिपादन पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केले आहे. एका नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान पंतप्रधान मोदी बोलत होते.  (pm narendra modi says we gather public trust with hard working not using pr agencies)

आमच्या कार्यकाळात राबवण्यात आलेली धोरणे, घेतलेले निर्णय सामान्य जनतेच्या समस्या कमी करणारे ठरले. म्हणूनच जनता आम्हाल त्यांच्यातील एक असेच समजते. पंतप्रधानपदी असलेली व्यक्तीला आपल्या अडचणींची जाणीव आहे, ही बाब जनतेला माहिती आहे, असेही पंतप्रधान मोदींनी नमूद केले. PR एजन्सीचा वापर करून प्रतिमा संवर्धन करण्याविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, पंतप्रधानपदी असलेली व्यक्ती जनतेला आपल्याच घरातील एक सदस्य वाटते. जनतेला असलेला विश्वास कोणत्याही PR एजन्सीमुळे आलेला नाही. तर, तो अथक प्रयत्नांनी संपादन केला आहे. त्यासाठी खूप घाम गाळला आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. 

जनतेसाठी सर्वकाही, स्वतःसाठी काहीच नाही

देशवासीयांसाठी शौचालये उभारून एका प्रकारे सेवा करण्याचे कोणाच्याही मनात आले नाही. ते आम्ही करून दाखवले. आम्ही घेतलेल्या निर्णयांमुळे सामान्य जनतेला वाटते की, पंतप्रधान असलेली व्यक्ती आपल्यासारखाच विचार करतो, आपल्या समस्या जाणतो आणि म्हणूनच आपोआप ते घरातील माणूस असल्यासारखे समजतात. जिथे जातो, तिथे भरपूर प्रेम जनतेचे मिळते. जे काही आहे, ते सर्व जनतेचे आणि जनतेसाठीच आहे. स्वतःसाठी काहीच करणार आहे. सर्व जीवन देशाच्या आणि देशवासीयांसाठी समर्पित आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, गेली सात वर्षे आम्ही सत्तेत आहोत. जनतेचा आमच्याबद्दल असलेला विश्वास आणखी मजबूत होत आहे. तसेच गेल्या सात वर्षातील कामगिरी हीदेखील जनतेच्या विश्वासामुळेच साध्य होऊ शकली, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानBJPभाजपाPoliticsराजकारण