शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
2
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
3
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
4
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
5
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
6
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
7
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
8
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
9
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
11
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
12
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
13
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
14
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलांचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले
15
What Is Option Trading: किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
16
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
17
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
18
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
19
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
20
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या

“तेव्हाच सरदार पटेल POK ताब्यात घेणार होते, पण...”; पंतप्रधान मोदींनी सांगितली Inside Story

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 14:10 IST

PM Narendra Modi In Gandhinagar: त्याच दिवशी दहशतवाद्यांना जन्माची अद्दल घडवायला हवी होती. परंतु, तसे झाले नाही आणि त्याचे परिणाम आपण गेली ७५ वर्षे भोगत आहोत, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

PM Narendra Modi In Gandhinagar: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर पावले उचलली आहेत. तसेच या निर्णयांवर भारत ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत भारत काय करू शकतो, याची एक चुणूक पाकिस्तानसह जगाला दाखवण्यात आली आहे. यानंतर आता भारतीय खासदारांचे शिष्टमंडळ जगभरातील अनेक देशांमध्ये जाऊन भारताची बाजू मांडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. गांधीधाम येथे एका सभेला पंतप्रधान मोदी यांनी संबोधित केले. तत्पूर्वी मोठा रोड शो करण्यात आला. 

सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९४७ वेळी भारताची फाळणी झाली. तेव्हा घडलेल्या काही गोष्टींचा उल्लेख केला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, जेव्हा १९४७ रोजी देशाची फाळणी झाली, तेव्हा काही साखळदंडातून मुक्तता व्हायला हवी होती. परंतु, हातातील बळ संपुष्टात आणण्यात आले. देशाचे तीन तुकडे करण्यात आले. त्याच रात्री पहिला दहशतवादी हल्ला काश्मीर खोऱ्यात करण्यात आला. देशाचा एक भाग दहशतवादाच्या बळावर पाकिस्तानने हडपला. त्याच दिवशी या दहशतवाद्यांना जन्माची अद्दल घडवायला हवी होती. सरदार पटेल यांची तेव्हा अशीच इच्छा होती की, जोपर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारतात परत येत नाही, तोपर्यंत सैन्याने थांबता कामा नये. मागे हटता कामा नये. परंतु, सरदार पटेल यांचे ऐकले नाही. याच दहशतवाद्यांना भारताला रक्तबंबाळ करण्याचे काम पुढे ७५ वर्ष सुरू ठेवले, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

७५ वर्ष आपण केवळ सहन करत आहोत

पहलगाम येथे झालेला हल्लाही याच विकृतीचा भाग होता. गेली ७५ वर्ष आपण केवळ सहन करत आहोत. जेव्हा जेव्हा पाकिस्तानशी युद्ध करायची वेळ आली, तेव्हा तेव्हा तीनही वेळा भारताच्या सैन्याने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. ०६ मेच्या रात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ राबण्यात आले. पण आता ‘ऑपरेशन सिंदूर’ जनबळावर पुढे नेण्यात येईल. जनतेने आता देशाच्या विकासात सहभागी व्हायला हवे. आपली जबाबदारी घ्यावी. २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र करायचे आहे. भारताची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर न्यायची आहे, त्यासाठी जनतेने हातभार लावावा. परदेशी वस्तू वापरणार नाही, असा संकल्प घ्यावा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी देशाला केले. 

दरम्यान, सर्जिकल स्ट्राईकनंतर अनेकांनी सरकारकडे पुराव्यांची मागणी केली होती. म्हणून यावेळी सगळ्या गोष्टी कॅमेरासमोरच केल्या. अवघ्या २२ मिनिटांत दहशतवाद्यांची ९ तळे उद्ध्वस्त करण्यात आली. नंतर कुणी पुरावे नाहीत, अशी बोंब करू नये, म्हणून यावेळी आधीच कॅमेऱ्यांची पूर्ण व्यवस्था केली होती. ६ मेची ती दृश्य बघितल्यावर कुणीही याला प्रॉक्सी वॉर म्हणू शकत नाही. यावेळी आम्हाला पुरावे द्यावे लागले नाहीत, त्यांनी समोरूनच परिस्थिती दाखवली, असे पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना सुनावले.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरNarendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरातPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक