शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

८ वर्षे विकासासाठी समर्पित, आगामी २५ वर्षांसाठी लक्ष्य निश्चित करा: पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 06:26 IST

भाजपाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी विकास आणि राष्ट्रीय हिताशी संबंधित मुद्यांवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

जयपूर : देशातील विकासाशी संबंधित मुख्य मुद्यांपासून लक्ष विचलित करण्याचे काम काही पक्षांची इकोसिस्टिम करत आहेत. मात्र, भाजपाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी अशा पक्षांच्या जाळ्यात न अडकता विकास आणि राष्ट्रीय हिताशी संबंधित मुद्यांवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आगामी २५ वर्षांसाठी लक्ष्य निश्चित करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

भाजपाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या तीन दिवसीय बैठकीच्या उद्घाटन सत्राला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी विरोधी पक्षांवर आरोप केला की, आपल्या राजकीय स्वार्थासाठी ते तणावाच्या लहान घटनांच्या माध्यमातून समाजात विष कालवत आहेत. कधी जातीच्या तर कधी प्रादेशिकतेच्या मुद्यांवर ते लोकांना भडकावित आहेत. 

मोदी म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर घराणेशाहीमुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे. घराणेशाही जपणारे पक्ष आजही देशाला मागे घेऊन जात आहेत. लोकशाहीसाठी ही घातक परंपरा असल्याचे सांगत ते म्हणाले की, जर लोकशाही वाचवायची असेल तर भाजपाला घराणेशाहीविरुद्ध सातत्याने संघर्ष करावा लागणार आहे. ते म्हणाले की, भाजपाने विकासाचे राजकारण केले आहे आणि आज तोच आज राजकारणाचा मुख्य प्रवाह झाला आहे. मोदी म्हणाले की, रालोआच्या ८ वर्षाच्या काळात संतुलित विकास, सामाजिक न्याय आणि सुरक्षा यांना प्राधान्य दिले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा