शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाख मोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
3
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
4
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
5
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
6
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
7
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
8
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
11
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
12
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
13
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
14
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
15
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
16
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
17
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
18
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
19
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
20
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

लाल डायरीपासून भ्रष्टाचारापर्यंत... नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल, सीकरमधून दिला 'QUIT INDIA' चा नारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 14:41 IST

नरेंद्र मोदी यांनी येथील मंचावरून अशोक गेहलोत यांच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राजस्थानमधील सीकरमध्ये आयोजित सभेला संबोधित केले. यासोबतच नरेंद्र मोदींनीराजस्थानधील विधानसभा निवडणुकीचा बिगुलही वाजवला. नरेंद्र मोदी यांनी येथील मंचावरून अशोक गेहलोत यांच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. लाल डायरीच्या मुद्द्यावरून नरेंद्र मोदींनी या डायरीत गेहलोत सरकारच्या काळ्या कारनाम्यांची नोंद असल्याचे सांगितले. याशिवाय, आपल्याला भ्रष्टाचार, परिवारवाद आणि तुष्टीकरण सोडण्याची गरज आहे. त्यामुळे QUIT INDIA  हा नाराच देशाला वाचवेल, असे म्हणत विरोधकांच्या इंडिया नावावरून नरेंद्र मोदींनी निशाणा साधला.

याचबरोबर, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या प्रोटोकॉलच्या वादादरम्यान नरेंद्र मोदी म्हणाले की, अशोक गेहलोत या कार्यक्रमाला येणार होते. पण काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे, त्यामुळे ते येऊ शकले नाहीत. मी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो. दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील सीकरमधून देशभरातील साडेआठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १७ हजार कोटी रुपये ट्रान्सफर केले. 

यावेळी नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. म्हणाले की, तुम्ही लाल डायरीबद्दल ऐकले आहे, असे म्हटले जाते की, या लाल डायरीमध्ये काँग्रेस सरकारच्या काळ्या कृत्यांचे काळे पुस्तक आहे. लाल डायरीची पाने उघडली तर गोष्टी व्यवस्थित होतील, असे लोक म्हणत आहेत. लाल डायरीचे नाव ऐकताच काँग्रेस नेत्यांची बोलती बंद होते. काँग्रेसने आपल्या वर्चस्वासाठीच्या भांडणात आपला कार्यकाळ वाया घालवला, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

केंद्रातील भाजप सरकार राजस्थानच्या लोकांच्या कल्याणासाठी काम करत आहे, आम्ही घरे बांधून देशातील जनतेला करोडपती बनवत आहोत, आमच्या सरकारने ही हमी पूर्ण केली आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, राजस्थान सरकारच्या लोकांवरच पेपर लीक केल्याचा आरोप आहे, हे सरकार तरुणांच्या विरोधात आहे. त्यांच्यापासून राज्य वाचवायचे असेल, तर काँग्रेसला हटवावे लागेल. राजस्थानात कधी गोळीबार आणि दगडफेक सुरू होईल, कर्फ्यू कधी लागू होईल, हे कोणालाच माहीत नाही, असे म्हणत नरेंद्र मोदींनी काँग्रेस सरकारवर निशाणा साधला.

विरोधकांना नाव बदलून लुटायचे आहे - नरेंद्र मोदीनरेंद्र मोदींनी सीकर रॅलीतून संपूर्ण विरोधकांच्या आघाडीवर सुद्धा हल्लाबोल केला. नरेंद्र मोदी म्हणाले,  देशाचे शत्रू जी पद्धत अवलंबतात, तीच पद्धत विरोधक अवलंबतात. इंडिया हे नाव ईस्ट इंडिया कंपनीतही होते, तेव्हा भारताला लुटण्यासाठी इंडिया लिहिले गेले होते. सिमीचे नावही इंडिया होते, पण दहशतवादी हल्ले करणे हे त्यांचे ध्येय होते. इंडिया नावामागे या लोकांना यूपीएची काळी कृत्ये लपवायची आहेत. त्यांना भारताची काळजी असती, तर त्यांनी सर्जिकल स्ट्राईकला विरोध केला नसता. दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा या लोकांनी मौन बाळगले होते. स्वातंत्र्यापूर्वी महात्मा गांधींनी 'इंग्रजांनो भारत छोडो' हा नारा दिला होता, आजच्या काळातही असाच नारा देण्याची गरज आहे. आज आपल्याला भ्रष्टाचार, परिवारवाद आणि तुष्टीकरण सोडण्याची गरज आहे. त्यामुळे  QUIT INDIA हा नाराच देशाला वाचवेल, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajasthanराजस्थानBJPभाजपा