शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

लाल डायरीपासून भ्रष्टाचारापर्यंत... नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल, सीकरमधून दिला 'QUIT INDIA' चा नारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 14:41 IST

नरेंद्र मोदी यांनी येथील मंचावरून अशोक गेहलोत यांच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राजस्थानमधील सीकरमध्ये आयोजित सभेला संबोधित केले. यासोबतच नरेंद्र मोदींनीराजस्थानधील विधानसभा निवडणुकीचा बिगुलही वाजवला. नरेंद्र मोदी यांनी येथील मंचावरून अशोक गेहलोत यांच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. लाल डायरीच्या मुद्द्यावरून नरेंद्र मोदींनी या डायरीत गेहलोत सरकारच्या काळ्या कारनाम्यांची नोंद असल्याचे सांगितले. याशिवाय, आपल्याला भ्रष्टाचार, परिवारवाद आणि तुष्टीकरण सोडण्याची गरज आहे. त्यामुळे QUIT INDIA  हा नाराच देशाला वाचवेल, असे म्हणत विरोधकांच्या इंडिया नावावरून नरेंद्र मोदींनी निशाणा साधला.

याचबरोबर, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या प्रोटोकॉलच्या वादादरम्यान नरेंद्र मोदी म्हणाले की, अशोक गेहलोत या कार्यक्रमाला येणार होते. पण काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे, त्यामुळे ते येऊ शकले नाहीत. मी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो. दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील सीकरमधून देशभरातील साडेआठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १७ हजार कोटी रुपये ट्रान्सफर केले. 

यावेळी नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. म्हणाले की, तुम्ही लाल डायरीबद्दल ऐकले आहे, असे म्हटले जाते की, या लाल डायरीमध्ये काँग्रेस सरकारच्या काळ्या कृत्यांचे काळे पुस्तक आहे. लाल डायरीची पाने उघडली तर गोष्टी व्यवस्थित होतील, असे लोक म्हणत आहेत. लाल डायरीचे नाव ऐकताच काँग्रेस नेत्यांची बोलती बंद होते. काँग्रेसने आपल्या वर्चस्वासाठीच्या भांडणात आपला कार्यकाळ वाया घालवला, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

केंद्रातील भाजप सरकार राजस्थानच्या लोकांच्या कल्याणासाठी काम करत आहे, आम्ही घरे बांधून देशातील जनतेला करोडपती बनवत आहोत, आमच्या सरकारने ही हमी पूर्ण केली आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, राजस्थान सरकारच्या लोकांवरच पेपर लीक केल्याचा आरोप आहे, हे सरकार तरुणांच्या विरोधात आहे. त्यांच्यापासून राज्य वाचवायचे असेल, तर काँग्रेसला हटवावे लागेल. राजस्थानात कधी गोळीबार आणि दगडफेक सुरू होईल, कर्फ्यू कधी लागू होईल, हे कोणालाच माहीत नाही, असे म्हणत नरेंद्र मोदींनी काँग्रेस सरकारवर निशाणा साधला.

विरोधकांना नाव बदलून लुटायचे आहे - नरेंद्र मोदीनरेंद्र मोदींनी सीकर रॅलीतून संपूर्ण विरोधकांच्या आघाडीवर सुद्धा हल्लाबोल केला. नरेंद्र मोदी म्हणाले,  देशाचे शत्रू जी पद्धत अवलंबतात, तीच पद्धत विरोधक अवलंबतात. इंडिया हे नाव ईस्ट इंडिया कंपनीतही होते, तेव्हा भारताला लुटण्यासाठी इंडिया लिहिले गेले होते. सिमीचे नावही इंडिया होते, पण दहशतवादी हल्ले करणे हे त्यांचे ध्येय होते. इंडिया नावामागे या लोकांना यूपीएची काळी कृत्ये लपवायची आहेत. त्यांना भारताची काळजी असती, तर त्यांनी सर्जिकल स्ट्राईकला विरोध केला नसता. दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा या लोकांनी मौन बाळगले होते. स्वातंत्र्यापूर्वी महात्मा गांधींनी 'इंग्रजांनो भारत छोडो' हा नारा दिला होता, आजच्या काळातही असाच नारा देण्याची गरज आहे. आज आपल्याला भ्रष्टाचार, परिवारवाद आणि तुष्टीकरण सोडण्याची गरज आहे. त्यामुळे  QUIT INDIA हा नाराच देशाला वाचवेल, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajasthanराजस्थानBJPभाजपा