शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

लाल डायरीपासून भ्रष्टाचारापर्यंत... नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल, सीकरमधून दिला 'QUIT INDIA' चा नारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 14:41 IST

नरेंद्र मोदी यांनी येथील मंचावरून अशोक गेहलोत यांच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राजस्थानमधील सीकरमध्ये आयोजित सभेला संबोधित केले. यासोबतच नरेंद्र मोदींनीराजस्थानधील विधानसभा निवडणुकीचा बिगुलही वाजवला. नरेंद्र मोदी यांनी येथील मंचावरून अशोक गेहलोत यांच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. लाल डायरीच्या मुद्द्यावरून नरेंद्र मोदींनी या डायरीत गेहलोत सरकारच्या काळ्या कारनाम्यांची नोंद असल्याचे सांगितले. याशिवाय, आपल्याला भ्रष्टाचार, परिवारवाद आणि तुष्टीकरण सोडण्याची गरज आहे. त्यामुळे QUIT INDIA  हा नाराच देशाला वाचवेल, असे म्हणत विरोधकांच्या इंडिया नावावरून नरेंद्र मोदींनी निशाणा साधला.

याचबरोबर, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या प्रोटोकॉलच्या वादादरम्यान नरेंद्र मोदी म्हणाले की, अशोक गेहलोत या कार्यक्रमाला येणार होते. पण काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे, त्यामुळे ते येऊ शकले नाहीत. मी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो. दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील सीकरमधून देशभरातील साडेआठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १७ हजार कोटी रुपये ट्रान्सफर केले. 

यावेळी नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. म्हणाले की, तुम्ही लाल डायरीबद्दल ऐकले आहे, असे म्हटले जाते की, या लाल डायरीमध्ये काँग्रेस सरकारच्या काळ्या कृत्यांचे काळे पुस्तक आहे. लाल डायरीची पाने उघडली तर गोष्टी व्यवस्थित होतील, असे लोक म्हणत आहेत. लाल डायरीचे नाव ऐकताच काँग्रेस नेत्यांची बोलती बंद होते. काँग्रेसने आपल्या वर्चस्वासाठीच्या भांडणात आपला कार्यकाळ वाया घालवला, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

केंद्रातील भाजप सरकार राजस्थानच्या लोकांच्या कल्याणासाठी काम करत आहे, आम्ही घरे बांधून देशातील जनतेला करोडपती बनवत आहोत, आमच्या सरकारने ही हमी पूर्ण केली आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, राजस्थान सरकारच्या लोकांवरच पेपर लीक केल्याचा आरोप आहे, हे सरकार तरुणांच्या विरोधात आहे. त्यांच्यापासून राज्य वाचवायचे असेल, तर काँग्रेसला हटवावे लागेल. राजस्थानात कधी गोळीबार आणि दगडफेक सुरू होईल, कर्फ्यू कधी लागू होईल, हे कोणालाच माहीत नाही, असे म्हणत नरेंद्र मोदींनी काँग्रेस सरकारवर निशाणा साधला.

विरोधकांना नाव बदलून लुटायचे आहे - नरेंद्र मोदीनरेंद्र मोदींनी सीकर रॅलीतून संपूर्ण विरोधकांच्या आघाडीवर सुद्धा हल्लाबोल केला. नरेंद्र मोदी म्हणाले,  देशाचे शत्रू जी पद्धत अवलंबतात, तीच पद्धत विरोधक अवलंबतात. इंडिया हे नाव ईस्ट इंडिया कंपनीतही होते, तेव्हा भारताला लुटण्यासाठी इंडिया लिहिले गेले होते. सिमीचे नावही इंडिया होते, पण दहशतवादी हल्ले करणे हे त्यांचे ध्येय होते. इंडिया नावामागे या लोकांना यूपीएची काळी कृत्ये लपवायची आहेत. त्यांना भारताची काळजी असती, तर त्यांनी सर्जिकल स्ट्राईकला विरोध केला नसता. दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा या लोकांनी मौन बाळगले होते. स्वातंत्र्यापूर्वी महात्मा गांधींनी 'इंग्रजांनो भारत छोडो' हा नारा दिला होता, आजच्या काळातही असाच नारा देण्याची गरज आहे. आज आपल्याला भ्रष्टाचार, परिवारवाद आणि तुष्टीकरण सोडण्याची गरज आहे. त्यामुळे  QUIT INDIA हा नाराच देशाला वाचवेल, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajasthanराजस्थानBJPभाजपा