शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

Sri Aurobindo Anniversary : 'भारत अति प्रतिकूल परिस्थितीत थोडा कोमेजू शकतो, पण...'; वाचा - काय म्हणाले पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 00:13 IST

अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये 9 डिसेंबरला भारतीय जवान आणि चिनी सैनिक यांच्यात चकमक झाली. या चकमकीत दोन्ही देशांचे सैनिक किरकोळ जखमी झाले आहेत. अशा या परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे विधान आले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (13 डिसेंबर) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे श्री अरबिंदो यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त एक स्मारक नाणे आणि टपाल तिकीट जारी केले. यावेळी, 'भारताला कुणीही नष्ट करू शकत नाही. भारताला कुणीही दाबू शकत नाही. भारत कधीही नष्ट होऊ शकत नाही,' असे मोदी म्हणाले.

अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये 9 डिसेंबरला भारतीय जवान आणि चिनी सैनिक यांच्यात चकमक झाली. या चकमकीत दोन्ही देशांचे सैनिक किरकोळ जखमी झाले आहेत. अशा या परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे विधान आले आहे. 

पंतप्रधान मोदी म्हणाले, 'भारत एक असे अमर बीज आहे, जे अति प्रतिकूल परिस्थितीत थोडे फार दाबू शकते, थोडे फार कोमेजून जाऊ शकते, परंतू ते नष्ट होऊ शकत नाही. कारण भारत हा मानवी सभ्यतेचा सर्वात परिष्कृत विचार आहे, मानवतेचा सर्वात स्वाभाविक आवाज आहे.'

मोदी म्हणाले, “श्री अरबिंदो यांचे जीवन आणि त्यांचा जन्म, हे एक "एक भारत, श्रेष्ठ भारत"चे प्रतिबिंब आहे. त्यांचा जन्म बंगालमध्ये झाला असला तरी, त्यांनी त्यांचे बहुतांश आयुष्य गुजरात आणि पुद्दुचेरीमध्ये घालविले. ते जिथे-जिथे गेले तिथे-तिथे त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाची खोलवर छाप सोडली. स्वातंत्र्याच्या अमृतकाळासाठी ही एक मोठी प्रेरणा आहे.''

याच बरोबर मोदी म्हणाले, श्री अरबिंदो यांना हिंदी, मराठी, बंगाली आणि संस्कृतसह अनेक भाषांचे ज्ञान होते. आज भारत अनेक गोष्टींचा साक्षीदार आहे. एवढेच नाही, तर भारत आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत आहे," असेही मोदी म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा