शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

मित्रों, स्वातंत्र्य दिनीच मोदींनी सव्वासो करोड देशवासीयांना फसवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 16:46 IST

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातील आकडेवारी चुकीच्या पद्धतीनं सांगितली

नवी दिल्ली: स्वच्छ भारत योजनेमुळे 3 लाख मुलांचा जीव वाचला, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना म्हटलं. ही आकडेवारी देताना मोदींनी जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालाचा उल्लेख केला. मात्र मोदींनी दिलेली आकडेवारी आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातील आकडेवारी यात मोठा फरक आहे. त्यामुळे मोदींच्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. लाल किल्ल्यावरुन स्वातंत्र्य दिनानिमित्त देशवासीयांना संबोधित करताना मोदींनी स्वच्छ भारत अभियानाचा उल्लेख केला. स्वच्छ भारत अभियानामुळे आतापर्यंत तीन लाख मुलांचा जीव वाचला असल्याचं मोदी म्हणाले. यासाठी पंतप्रधानांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालाचा संदर्भ दिला. 'मी 2014 मध्ये लाल किल्ल्यावरुन भाषण करताना स्वच्छ भारत मोहिमेची घोषणा केली. त्यावेळी काही लोकांनी माझी खिल्ली उडवली होती. सरकारनं अशा गोष्टींवर आपली उर्जा वाया घालवू नये, असा सल्ला त्यावेळी काहींनी दिला होता. मात्र काही दिवसांपूर्वीच जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल प्रसिद्ध झाला. स्वच्छ भारत अभियानामुळे 3 लाख मुलांचा जीव वाचला, असं जागतिक आरोग्य संघटनेनं अहवालात नमूद केलं आहे. तीन लाख गरीब मुलांचा जीव वाचवणं, ही मानवतेच्या दृष्टीनं मोठी गोष्ट आहे,' असं मोदी म्हणाले.

स्वच्छ भारत अभियानामुळे तीन लाख मुलांचा जीव वाचला का?या वर्षाच्या सुरुवातीला जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशिया विभागानं एक अहवाल प्रसिद्ध केला. यामध्ये स्वच्छ भारत अभियानाचा उल्लेख आहे. 'स्वच्छतेसाठी भारताकडून सुरू असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत ऑक्टोबर 2019 पर्यंत ठेवण्यात आलेलं उद्दिष्ट गाठण्यात 100 टक्के यश मिळाल्यास तीन लाख मुलांचा जीव वाचेल. हे अभियान पूर्णपणे यशस्वी ठरल्यास अतिसार आणि कुपोषणामुळे होणारे मृत्यू टाळता येऊ शकतील,' असं जागतिक आरोग्य संघटनेनं अहवालात म्हटलेलं आहे. मोदींनी जागतिक आरोग्य संघटनेचा उल्लेख करत त्यांच्या अहवालाचा संदर्भ दिला. मात्र ही आकडेवारी चुकीची आहे. ऑक्टोबर 2019 पर्यंत स्वच्छ भारत अभियान 100 टक्के यशस्वी ठरल्यास तीन लाख मुलांचा जीव वाचेल, असं अहवालात नमूद करण्यात आलं होतं. मात्र अद्याप ऑक्टोबर 2019 उजाडलेलं नाही. त्याला अद्याप 14 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. विशेष म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेनं स्वच्छ भारत अभियान 100 टक्के यशस्वी ठरलं तर 3 लाख मुलांचा जीव वाचू शकेल, असं म्हटलं आहे. मात्र मोदींनी थेट 3 लाख मुलांचा जीव वाचला, अशी आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेचा संदर्भ देत लाल किल्ल्यावरुन सव्वासो करोड भारतीयांना सांगितली आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndependence Dayस्वातंत्र्य दिवसRed Fortलाल किल्ला