शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 12:53 IST

अहमदाबाद विमान अपघातातून बचावलेल्या रमेश विश्वासकुमारची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली.

Ahmedabad Air India Plane Crash: गुजरातच्याअहमदाबादमध्ये लंडनला जाणाऱ्या विमानाच अपघात होऊन २६५ जणांचा मृत्यू झाला. उड्डाणानंतर काही सेकंदामध्येच हे विमान एका निवासी डॉक्टरांच्या इमारतीवर कोसळले. त्यामुळे २५ डॉक्टरांसह २४१ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. विमानामध्ये २४२ प्रवासी होते, त्यापैकी १६९ भारतीय, ७३ ब्रिटिश, सात पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन नागरिक होता. आश्चर्याची बाब म्हणजे या विमान दुर्घटनेत केवळ एकाच प्रवाशाचा जीव वाचला. लंडनमधील रहिवासी असलेले रमेश विश्वासकुमार या अपघातात जखमी झाले तर त्यांच्या भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानात २४२ जण होते, त्यापैकी २४१ जणांचा मृत्यू झाला आहे. एअर इंडियाचे विमान दुपारी १.३८ वाजता लंडनला निघाले. उड्डाणानंतर काही सेकंदातच विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलला धडकले. शुक्रवारी नरेंद्र मोदी यांनी विमान अपघातातील जखमींची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भेट घेतली. पंतप्रधान मोदींनी अपघाताच बचाववेल्या रमेश विश्वासकुमार याचीही भेट घेतली. यावेळी रमेशने पंतप्रधान नरेंद्र मोदींना घडलेल्या घटनेची माहिती दिली. "पंतप्रधान मोदींनी मला अपघात कसा झाला ते विचारलं. त्यावर मी त्यांना घटनाक्रम सांगितला. ते सगळं माझ्या डोळ्यांसमोर झालं. मला स्वतःला विश्वास बसत नाहीये की मी त्यातून जिवंत कसा बाहेर आलो. कारण थोड्यावेळासाठी माझाही मृत्यू होणार आहे असं वाटतं होतं. पण मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा मला कळलं की मी जिवंत आहे. मी सेटबेल्ट काढला आणि तिथून बाहेर पडलो. माझ्यासमोरच एअरहोस्टेसचा आणि बाकीच्या लोकांचे मृतदेह पडले होते", असं रमेश विश्वासकुमारने दूरदर्शनसोबत बोलताना सांगितले.

"टेकऑफ नंतर विमानाचा वेग वाढवताच, काहीतरी विचित्र वाटले. अचानक ५-१० सेकंदांसाठी सर्व काही थांबल्यासारखे वाटले. नंतर अचानक विमानात हिरवी आणि सफेद लाईट सुरु झाली. असं वाटत होतं की जणू काही पायलटने उड्डाणासाठी सर्व शक्ती पणाला लावली होती आणि मग ते थेट होस्टलच्या इमारतीत घुसले. विमानाचा ज्या भागात माझी सीट होती तो भाग इमारतीच्या खालच्या भागाला धडकला असावा. वरच्या भागात आग लागली होती, तिथे बरेच लोक अडकले होते. कदाचित मी सीटसह खाली पडलो. मी कसा तरी बाहेर पडण्यात यशस्वी झालो. दरवाजा तुटलेला होता आणि मला समोर काही रिकामी जागा दिसली, म्हणून मी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला," असे विश्वासकुमारने सांगितले.

"दुसऱ्या बाजूला एक भिंत होती, कदाचित तिथून कोणीही बाहेर पडू शकले नाही. माझ्या डोळ्यासमोर दोन एअर होस्टेस, एक काका-काकी आणि सर्व काही जळत होते. या अपघातात माझा डावा हात गंभीरपणे भाजला. बाहेर येताच आग पसरत होती. जर काही सेकंद जास्त उशीर झाला असता तर कदाचित माझ्यासोबतही काही वाईट घडले असते," असं विश्वासकुमारने म्हटलं.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादGujaratगुजरातAir Indiaएअर इंडियाAccidentअपघात