शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
5
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
6
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
7
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
8
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
9
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
10
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
11
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
12
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
13
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
14
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
15
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
16
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
17
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
18
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
19
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
20
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

लाल किल्ल्यावर नरेंद्र मोदींसोबत सेल्फी घेण्यासाठी सर्वसामान्यांची गर्दी; पाहा व्हिडिओ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 12:22 IST

Independence Day 2023 : स्वातंत्र्य दिनानिमित्त नरेंद्र मोदींनी आपल्या ९० मिनिटांच्या भाषणात मणिपूर हिंसाचारासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.

नवी दिल्ली : भारतात आज स्वांतत्र्यदिन (Independence Day 2023) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. आपल्या सुमारे ९० मिनिटांच्या भाषणात त्यांनी मणिपूर हिंसाचारासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.

विशेष म्हणजे, पुढील १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून पुन्हा एकदा देशाला संबोधित करणार असल्याचेही नरेंद्र मोदी म्हणाले. दरम्यान, नरेंद्र मोदींचे भाषण ऐकण्यासाठी आणि स्वातंत्र्य सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सर्वसामान्य लोकांसह अनेक मान्यवर मंडळी लाल किल्ल्यावर उपस्थित होती. पोहोचले होते. नरेंद्र मोदी आपले भाषण संपल्यानंतर लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून खाली आले आणि थेट सर्वसामान्यांना सामोरे गेले. 

नरेंद्र मोदी प्रोटोकॉल तोडून ते आपल्या सुरक्षेची काळजी न करता उपस्थित सर्वसामान्य नागरिकांना भेटायला गेले. ज्यावेळी नरेंद्र मोदी लोकांसमोर होते, तेव्हाचे ते दृश्य अनेकांनी आपल्या कॅमेऱ्या टिपले. कोणी नरेंद्र मोदींसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होते, तर कोणी त्यांना काहीतरी गिफ्ट द्यायचा प्रयत्न करत होते. यावेळी नरेंद्र मोदींनी अनेक लोकांशी प्रेमाने हस्तांदोलन केले. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदींचे भाषण ऐकण्यासाठी १८ हजारांहून अधिक लोक लाल किल्ल्यावर पोहोचले होते. 

नरेंद्र मोदींच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे...- भ्रष्टाचाराच्या विरोधात अखंड लढणार आहे.  देशातून परिवारवाद उखडून लावणार आहे. लोकशाहीत परिवारवादी पक्ष ही विकृती आहे. परिवारवादामुळे विकासाला ब्रेक लागला आहे. - रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्मच्या माध्यमातून  दिलेले आश्वासन पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्यासाठी नेशन फर्स्ट आणि राष्ट्र सर्वोपरी आहे. - आज भारतात महिला वैमानिकांची संख्या सर्वाधिक आहे. २ कोटी लखपती दीदींचे टार्गेट घेऊन आम्ही काम करत आहोत. - देश नवनवे संकल्प घेऊन पुढे जात आहे. भारतात जास्तीत जास्त युवाशक्ती आहे, क्षमता देशाचे नशीब बदलते.- लोकशाहीच्या मजबुतीसाठी कुटुंबवादापासून मुक्तता आवश्यक आहे. कुटुंबवाद आणि घराणेशाही हे प्रतिभेचे शत्रू आहेत, क्षमता नाकारतात.-  विश्वकर्मा योजना विश्वकर्मा जयंतीला सुरू होणार असून त्यासाठी १३-१५ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. आमचे सरकार गरीबांसाठी समर्पित आहे.-  आज भारत जुनी विचारसरणी मागे टाकून पुढे जात आहे. ज्यांची पायाभरणी आमच्या सरकारने केली, त्यांचे उद्घाटनही करत आहे. - २०१४ पूर्वी देशभरातील राज्यांना केंद्र सरकारकडून ३० लाख कोटी रूपय दिले जायचे, मात्र आता १०० लाख कोटी रूपये दिले जातात.- डेमोग्राफी, डेमोक्रेसी आणि डायव्हर्सिटी भारताची ताकद आहे. 30 वर्षाखालील युवकांची सर्वाधिक संख्या फक्त भारताकडे आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndependence Dayस्वातंत्र्य दिन