शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

"दिल्ली और दिल की दूरी खत्म करना चाहता हूं"; काश्मिरी नेत्यांच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 19:53 IST

बैठकीत मोदी म्हणाले, 'राजकीय मतभेद असतील. मात्र, राष्‍ट्र हितासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करायला हवे. जेणेकरून जम्मू आणि काश्मीरमधील लोकांना फायदा होईल. जम्‍मू आणि काश्मीरमध्ये सर्वांसाठीच सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करायचे आहे.

नवी दिल्ला - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू-काश्मीरसंदर्भात काश्मिरी नेत्यांची बैठक बोलावली होती. जवळपास साडे तीन तास चाललेली ही बैठक सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास संपली. बैठकीत मोदी म्हणाले, 'राजकीय मतभेद असतील. मात्र, राष्‍ट्र हितासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करायला हवे. जेणेकरून जम्मू आणि काश्मीरमधील लोकांना फायदा होईल. जम्‍मू आणि काश्मीरमध्ये सर्वांसाठीच सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करायचे आहे. एवढेच नाही, तर "दिल्ली और दिल की दूरी खत्म करना चाहता हूं", असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. (PM Narendra Modi meeting with jammu kashmir's leaders on J&K article 370)

गुलाम नबी आझादांनी सरकारसमोर ठेवल्या अशा मागण्या- बैठकीनंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद म्हणाले, या बैठकीत आम्ही काँग्रेसच्या वतीने सरकार समोर 5 मोठ्या मागण्या ठेवल्या आहेत. पहिली मागणी होती, सरकारने राज्याचा दर्जा लवकरात लवकर बहाल करावा. ते म्हणाले, आम्ही काश्मिरी पंडितांना खोऱ्यात वसविण्यासंदर्भातही बोललो आहोत. केंद्र सरकारने लवकरात लवकर जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घ्याव्यात, अशी मागणीही आम्ही केली आहे. अनुच्छेद 370 चे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे, असे यावेळी अधिकांश पक्ष म्हणाले. याच बरोबर, सरकार जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देण्यास वचनबद्ध आहे, असे गृह मंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. तसेच सर्वच नेत्यांनी संपूर्ण राज्याची मागणी केली आहे, असेही आझाद यांनी यावेळी सांगितले. 

सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? काश्मिरी नेत्यांसोबतच्या बैठकीपूर्वी मोदींच्या घरी पोहोचले अमित शाह

पीडीपी नेते मुजफ्फर हुसैन बेग म्हणाले, अनुच्छेद 370 हटविण्याचा निर्णय जम्मू-काश्मीर विधानसभेच्या माद्यमाने व्हायला हवा, असे मी बैठकीत म्हटले आहे. मात्र, पंतप्रधानांनी जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासंदर्भात स्पष्टपणे भाष्य केलेले नाही, असेही ते म्हणाले. 

महबुबा मुफ्तींनी उचलला अनुच्छेद 370 चा मुद्दा - बैठकीनंतर महबुबा मुफ्ती (पीडीपी अध्यक्ष) म्हणाल्या, बैठकीदरम्यान मी पंतप्रधानांना म्हणाले, की आपल्याला अनुच्छेद 370 हटवायचेच होते, तर आपण जम्मू-काश्मीरच्या विधानसभेला बोलवून ते हटवायला हवे होते. ते बेकायदेशीरपणे हविण्याचा कसलाही अधिकार नव्हता. अनुच्छेद 370 घटनात्मक आणि कायदेशीर मार्गाने बहाल करण्याची आमची इच्छा आहे. 

नरेंद्र मोदींच्या बैठकीपूर्वी निवडणूक आयोगाची जम्मू-काश्मीरमधील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक

उमर अब्दुल्लांचं वक्तव्य -बैठकीनंतर उमर अब्दुल्ला म्हणाले, आम्ही बैठकीत म्हणालो, की 5 ऑगस्ट 2019 रोजी केंद्र सरकारने अनुच्छेत 370 हटविण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा आम्ही स्वीकार करणार नाही. आम्ही न्यायालयाच्या माध्यमाने 370 च्या मुद्द्यावर आमचा लढा लढू.

जम्मू-काश्मीरला लागू असलेले आर्टिकल 370 हटविल्यानंतर जवळपास दोन वर्षांनी केंद्र सरकारकडून राज्यातील नेत्यांसोबत चर्चा करण्यात आली आहे. नवी दिल्ली येथे पंतप्रधानांच्या निवासस्थानी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली. यावेळी काश्मिरी नेते फारूक अब्दुल्ला, महबूबा मुफ्ती, उमर अब्दुल्ला, गुलाम नबी आझाद, रविन्द्र रैना, कवींद्र गुप्ता, निर्मल सिंह, सज्जाद लोन, भीम सिंह यांच्यासह इतरही काही नेते उपस्थित होते. याशिवाय, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, NSA अजीत डोवाल, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा, तसेच केंद्रातील काही अधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाJammu Kashmirजम्मू-काश्मीर