शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची संरक्षण व्यवस्था अन् आर्थिक परिस्थिती मजबूत राहील; भेंडवळचं भाकीत
2
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मार्चला महायुतीची रॅली
3
'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान
4
आयर्लंडचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, टी-२० वर्ल्डकपआधी नोंदवला धक्कादायक निकाल
5
पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज
6
चांगल्या पगाराची नोकरी सोडली, नारळाचं कवच हाती घेतलं अन् मुंबईची पोरगी कोट्यधीश बनली
7
Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; KYC स्टेटस त्वरित चेक करा 
8
उडाला भडका, निघाला धूर! अजित पवार गटाचे झिरवाळ, मविआच्या प्रचारसभेला
9
IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन
10
Vinayak Chaturthi 2024: संकटमुक्तीसाठी हनुमान चालीसा म्हणता, तशी विनायकीनिमित्त गणेश चालीसा म्हणा!
11
भेंडवळच्या प्रसिद्ध घटमांडणीचा अंदाज जाहीर, पाऊस, पिकांबाबत केलं असं भाकित 
12
होणाऱ्या बायकोचा चेहरा लपवला, 'छोटा भाईजान' अब्दूने अखेर साखरपुडा केला
13
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२४; कोणत्याही अवैध कामापासून दूर राहा, नाहीतर...
14
डॉक्टर पत्नीला २ प्रियकरांसोबत हॉटेलमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं; पतीनं बेदम मारलं
15
पंतप्रधानांशी कोणत्याही व्यासपीठावर चर्चेस तयार, ‘इंडिया’ आघाडीचे वादळ येत आहे : राहुल गांधी
16
Tarot Card: आगामी काळात यशप्राप्तीचे संकेत; पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका; वाचा साप्ताहिक भविष्य!
17
पवार, ठाकरेंनी शिंदे आणि अजित पवार गटात यावे; पंतप्रधान मोदींचा नंदुरबारच्या सभेत सल्ला
18
केजरीवाल जामिनावर मुक्त, निवडणुकीच्या शेवटच्या चार टप्प्यांमध्ये करणार प्रचार
19
सेक्स स्कँडलमुळे या नेत्यांचेही करिअर झाले उद्ध्वस्त; राजभवनात नकाे ते कृत्य अन् द्यावा लागला राजीनामा
20
अंगठाबहाद्दर म्हणून सरणावर जाणार नसल्याचा आनंद; ठाणे जिल्ह्यात १३ हजार ७७ निरक्षर झाले साक्षरतेच्या परीक्षेत उत्तीर्ण

पंतप्रधान मोदींकडून आयुष्यमान भारत योजनेचा शुभारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 2:24 PM

जगातील सर्वात मोठ्या आरोग्य योजनेचं मोदींकडून अनावरण

रांची: पंतप्रधाननरेंद्र मोदींनी आयुष्यमान भारत योजनेचा शुभारंभ केला आहे. आयुष्यमान भारत अर्थात पंतप्रधान जन आरोग्य योजना मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. देशातील 10.74 कोटी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मानवतेची खूप मोठी सेवा म्हणून ही योजना भविष्यात ओळखली जाईल, असं मोदींनी आयुष्यमान भारत योजनेचा शुभारंभ करताना म्हटलं.काही लोक आयुष्यमान भारत योजनेला मोदी केअर म्हणत आहेत. काहीजण गरिबांची योजना म्हणत आहेत. मात्र मी याला गोर गरीब जनतेची सेवा म्हणतो, असं मोदी यांनी योजनेचं अनावरण करताना म्हटलं. युरोपीय देश, अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको यांच्या एकत्रित लोकसंख्येपेक्षा अधिकजण या योजनेचे लाभार्थी असतील, असंही ते म्हणाले. 'देशातील श्रीमंत लोकांना ज्या आरोग्य सुविधा मिळतात, त्याच सुविधा गरिबांनादेखील मिळायला हव्यात. आमच्या सरकारच्या सर्व योजनांची निर्मिती गरिबांच्या सशक्तीकरणाच्या उद्देशानं करण्यात आली आहे,' असं मोदींनी म्हटलं.यावेळी मोदींनी आधीच्या सरकारवर जोरदार टीका केली. आधीचं सरकार व्होट बँकेचा विचार करुन योजना आखायचं. अशाच योजनांनी मागील सरकारनं तिजोरी लुटली, असा आरोपदेखील त्यांनी केला. मात्र आयुष्यमान योजनेचा लाभ प्रत्येकाला मिळेल. त्यात धर्म, जात, पंथ असा भेदभाव असणार नाही, असा विश्वासदेखील त्यांनी उपस्थितांना दिला. आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत 1300 गंभीर आजारांवर उपचार होतील. सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये हे उपचार करण्यात येतील, असं मोदी म्हणाले. 

टॅग्स :ayushman bharatआयुष्मान भारतNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानHealthआरोग्यMedicalवैद्यकीय