शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

मोदींचे 'जय किसान'; देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले २,००० रुपये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2019 12:24 IST

येत्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारसाठी 'गेमचेंजर' ठरू शकणाऱ्या किसान सन्मान निधी योजनेचा प्रारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.

ठळक मुद्देयेत्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारसाठी 'गेमचेंजर' ठरू शकणाऱ्या किसान सन्मान निधी योजनेचा प्रारंभ आज पंतप्रधान मोदींनी केला.केंद्र सरकारने यंदाच्या बजेटमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची घोषणा केली होती.२ हेक्टरपेक्षा कमी जागा असलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून दरवर्षी सहा हजार रुपये दिले जाणार आहेत.

लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागल्यानं सर्व घटकांना खूश करण्याचा प्रयत्न केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार करताना दिसतंय. विविध विकासकामांच्या भूमिपूजनाचे, लोकार्पणाचे, उद्घाटनांचे कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजित केले जाताहेत. वेगवेगळ्या योजनांचीही अंमलबजावणी झटपट सुरू करण्यात येतेय. अशातच, येत्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारसाठी 'गेमचेंजर' ठरू शकणाऱ्या किसान सन्मान निधी योजनेचा प्रारंभ आज पंतप्रधान मोदींनी केला. या योजनेअंतर्गत देशातील १२ कोटी गरीब शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत तीन टप्प्यांमध्ये केली जाणार आहे. या योजनेसाठी आतापर्यंत २ कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी केलीय. त्यांच्या खात्यात पहिल्या हप्त्याचे २ हजार रुपये मोदींनी पाठवले.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज गोरखपूरमधील खतनिर्मिती कारखान्याचं उद्घाटन होणार आहे. हा कारखाना १९९०-९१ मध्ये बंद पडला होता. त्यामुळे अनेक जण बेरोजगार झाले होते आणि शेतकऱ्यांचंही नुकसान होत होतं. तब्बल २५ वर्षं हा मुद्दा राजकारणात गाजत होता, पण कारखाना बंदच होता. २०१६ मध्ये पंतप्रधान मोदींनी या कारखान्याचं भूमिपूजन करून पूर्वांचलमधील शेतकऱ्यांना आशेचा किरण दाखवला होता. आता २०२० मध्ये या कारखान्यातून खतनिनर्मिती सुरू होणार आहे. आज याच कारखान्यात मोदी पूर्वांचलमधील शेतकऱ्यांना खतांचं वाटप करणार आहेत. त्याचवेळी त्यांनी किसान सन्मान योजनेचंही डिजिटल लाँचिंग केलं. 

केंद्र सरकारने यंदाच्या बजेटमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची घोषणा केली होती. २ हेक्टरपेक्षा कमी जागा असलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून दरवर्षी सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. या योजनेसाठी ७५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली असली, तरी या योजनेद्वारे 'जय किसान'चा नारा देत मोदींनी मतपेरणी केल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. आता शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा करून मोदी सरकारनं एक पाऊल पुढे टाकलं आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरी