शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

'आता पायाभरणी समारंभाठी वेळ कमी...' पीएम मोदींनी द्वारका एक्सप्रेसवेचे उद्घाटन केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 15:33 IST

लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींचे दौरे सुरू आहेत. पीएम मोदींनी आज गुरुग्राममध्ये आयोजित कार्यक्रमात द्वारका एक्सप्रेसवेच्या हरियाणा भागाचे उद्घाटन केले.

लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींचे दौरे सुरू आहेत. पीएम मोदींनी आज गुरुग्राममध्ये आयोजित कार्यक्रमात द्वारका एक्सप्रेसवेच्या हरियाणा भागाचे उद्घाटन केले. हा एक मोठा द्रुतगती मार्ग आहे. या एक्सप्रेसवेमुळे राष्ट्रीय महामार्ग-४८ वरील दिल्ली आणि गुरुग्राम दरम्यानची वाहतूक सुरळीत होण्यास आणि गर्दी कमी होण्यास मदत होईल.

गुरुग्राममधील खेडकी दौला टोल प्लाझा जवळून दिल्लीतील महिपालपूरमधील शिवमूर्तीपर्यंत हा एक्सप्रेसवे गुरुग्राममध्ये १८.९ किलोमीटर आणि दिल्लीत १०.१ किलोमीटरचा विस्तारित आहे. ९,००० कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे दिल्ली-गुरुग्राम द्रुतगती मार्ग आणि इतर मुख्य रस्त्यांवरील रहदारीची परिस्थिती कमी होण्याची अपेक्षा आहे. या एक्स्प्रेसवेच्या उद्घाटनामुळे दिल्ली-गुडगाव द्रुतगती मार्ग आणि इतर मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

Chungreng Koren : Video - "दररोज लोक मरताहेत... मोदीजी, एकदा मणिपूरला या"; चुंगरेंग कोरेनने सांगितलं दु:ख

यावेळी पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात म्हटले की, 'पूर्वीची सरकारे काही छोटी योजना बनवायची, काही छोटे कार्यक्रम आयोजित करायचे आणि पाच वर्षे तेच करत होते. भाजप सरकार ज्या वेगाने काम करत आहे, त्यादृष्टीने पायाभरणी समारंभ आणि उद्घाटनासाठी वेळ आणि दिवस कमी पडत आहेत.

पीएम नरेंद्र मोदी म्हणाले की, 'मला आज द्वारका एक्सप्रेसवे देशाला समर्पित करण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे.  या प्रकल्पासाठी ९ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. आजपासून दिल्ली आणि हरियाणादरम्यानचा वाहतुकीचा अनुभव कायमचा बदलेल. हा आधुनिक एक्स्प्रेस वे केवळ वाहनांमध्येच नाही तर दिल्ली एनसीआरमधील लोकांच्या जीवनात 'गिअर शिफ्ट' करेल, असंही मोदी म्हणाले. 

पीएम मोदी म्हणाले, २०२४ सुरू होऊन अजून तीन महिनेही पूर्ण झालेले नाहीत आणि इतक्या कमी कालावधीत १० लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन झाले आहे. याशिवाय माझ्या मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्र्यांनीही विकास प्रकल्पांची पायाभरणी व उद्घाटने केली आहेत. आज ज्या ठिकाणी द्वारका द्रुतगती मार्ग बांधण्यात आला आहे, एक काळ असा होता की लोक संध्याकाळनंतर येथे येणे टाळायचे. टॅक्सीचालकही इथे येऊ नका, असे सांगत. हा संपूर्ण परिसर असुरक्षित मानला जात होता. मात्र आज अनेक मोठ्या कंपन्या येथे येऊन आपले प्रकल्प उभारत आहेत. हे क्षेत्र एनसीआरमधील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या क्षेत्रांपैकी एक बनत आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा