शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
2
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
3
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
4
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
5
टीडीपीने अद्याप पत्तेच खोललेले नाहीत, भाजप टेन्शनमध्ये; लोकसभा अध्यक्षपदासाठी बैठकांचे सत्र
6
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
7
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
8
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

'सण साजरा करा, पण सावधगिरीने'; 'मन की बात'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 2:49 PM

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला. यादरम्यान, पंतप्रधान मोदींनी अवयवदान आणि स्वच्छ ऊर्जेचे महत्त्व सांगण्यासोबतच लोकांना कोरोना विषाणूबाबत सतर्क केले.

'मन की बात'या कार्यक्रमाचा आज ९९ व्या भाग प्रसारीत झाला. पंतप्रधान मोदींनी देशवासियांना संबोधित करताना, लोकांना पवित्र रमजान महिन्यासह विविध आगामी सणांसाठी शुभेच्छा दिल्या, पण, देशातील वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर इशारा दिला. 'सण साजरे करा, पण नेहमी सतर्क राहा',असा संदेशही पंतप्रधान मोदींनी दिला. 

Rahul Gandhi : 'राहुल गांधी हार्वर्ड आणि केंब्रिजमध्ये शिकले, तुम्ही त्यांना पप्पू म्हणता', प्रियंका गांधी संतापल्या

'देशात काही ठिकाणी कोरोनाही वाढत आहे. म्हणूनच तुम्ही सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे, स्वच्छतेचीही काळजी घेतली पाहिजे. एक महिन्यापूर्वी देशभरात कोविड-19 संसर्गाच्या नवीन रुग्णांची संख्या १०० च्या आत होती, तिथे आता एकापेक्षा जास्त आणि दररोज दीड हजार नवीन रुग्णांची नोंद होत आहे, असंही मोदी म्हणाले. 

'भारतात कोरोना विषाणूचे १८९० नवीन रुग्ण आढळले आहेत, जे १४९ दिवसांतील सर्वाधिक आहे. त्यानंतर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ९४३३ वर पोहोचली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये देशात एकाच दिवसात २२०८ रुग्ण आढळले होते, अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे. 

यासोबतच पंतप्रधान मोदींनी मन की बात कार्यक्रमात अवयवदानाचे महत्त्वही अधोरेखित केले. 'आज देशात अवयवदानाविषयी जागरूकता वाढत आहे आणि गेल्या १० वर्षांत अवयवदान करणाऱ्यांची संख्या तीन पटीने वाढली आहे. यावेळी पंतप्रधानांनी देशवासियांना रक्तदानासाठी जास्तीत जास्त संख्येने पुढे येण्याचे आवाहन केले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवयवदान करणाऱ्यांच्या नातेवाइकांचे अनुभव ऐकून घेतले. “तुमचा एक निर्णय अनेकांचे जीव वाचवू शकतो, जीवन घडवू शकतो.”, असंही पंतप्रधान म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMan ki Baatमन की बातcorona virusकोरोना वायरस बातम्या