शहरं
Join us  
Trending Stories
1
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
2
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
3
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
4
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
5
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
6
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
7
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
8
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
9
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
10
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
11
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
12
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
13
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
14
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
15
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
16
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
17
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
18
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
19
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
20
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकार UPA सरकारच्या आर्थिक गैरव्यवस्थापनावर 'श्वेतपत्रिका' आणणार! जाणून घ्या संसदेत केव्हा सादर होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 19:20 IST

Parliament Budget Session 2024: ही श्वेतपत्रिका शुक्रवारी अर्थात 9 फेब्रुवारीला अथवा शनिवारी  म्हणजेच 10 फेब्रुवारीला सभागृहात सादर केली जाऊ शकते.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या (2004-2014) 10 वर्षांच्या कार्यकाळातील आर्थिक गैरव्यवस्थापनासंदर्भात संसदेत श्वेतपत्रिका आणणार आहे. ही श्वेतपत्रिका शुक्रवारी अर्थात 9 फेब्रुवारीला अथवा शनिवारी  म्हणजेच 10 फेब्रुवारीला सभागृहात सादर केली जाऊ शकते.

या श्वेतपत्रिकेत आर्थिक गैरव्यवस्थापनाशिवाय यूपीए सरकारच्या कार्यकाळात उचलल्या जाऊ शकणाऱ्या सकारात्मक पावलांच्या परिणामांसंदर्भातही चर्चा केली जाईल. एवढेच नाही, तर या श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून भारताची आर्थिक दुर्दशा आणि अर्थव्यवस्थेवर पडलेला नकारात्मक प्रभवही सविस्तरपणे समोर समोर ठेवला जाईल.

काय म्हणाल्या होत्या निर्मला सीतारामन? -तत्पूर्वी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा तात्पुरता अर्थसंकल्प नुकताच सादर केला.  यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या गेल्या 10 वर्षांतील कामाचा लेखाजोखा मांडला आणि विविध बाबतीत त्याची तुलना यूपीए सरकारच्या 10 वर्षांच्या कार्यकाळाशी केली. यूपीए सरकारच्या कार्यकाळात अर्थव्यवस्थेचे कसे गैरव्यवस्थापन झाले, यावर श्वेतपत्रिका मांडणार असल्याचेही निर्मला सीतारामन यांनी तेव्हा जाहीर केले होते.

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकार 2014मध्ये सत्तेवर आले. त्यापूर्वीच्या 10 वर्षांच्या काळात काय झाले आणि त्यातून काय धडे घ्यायला हवे, हे सांगण्यासाठी श्वेतपत्रिका काढणार असल्याचे अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या होत्या. एवढेच नाही तर, माेदी सरकार स्थापन झाले त्यावेळी अर्थव्यवस्था टप्प्याटप्प्याने सुधारणे आणि शासन व्यवस्थेची घडी नीट बसविण्याची माेठी जबाबदारी सरकारवर हाेती. लाेकांना आशा देणे, गुंतवणूक आकर्षित करणे आणि अतिशय आवश्यक असलेल्या सुधारणांसाठी समर्थन उभे करणे, ही त्यावेळी काळाची गरज हाेती. ‘देश प्रथम’ या तत्त्वावर विश्वास ठेवून सरकारने हे कार्य यशस्वीपणे पार पाडले. सरकारसमाेरील संकटांवर मात करून, सर्वांगीण विकास साधण्यासाठी अर्थव्यवस्थेला सातत्यशील विकासाच्या मार्गावर आणण्यात आले आहे, असे सीतारामन यांनी म्हटले होते.

महागाईच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर निशाणा -सोमावारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर धन्यवाद प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना काँग्रेसवर निशाणा साधला होता. यावेळी त्यांनी महागाईच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर निशाणा साधला होता. ते म्हणाले, ''युक्रेन आणि गाझामध्ये युद्ध सुरू असूनही देशातील महागाई नियंत्रणात आहे. देशातील महागाईवर दोन गाणी सुपर हिट झाले. एक ‘महंगाई मार गई’ आणि दुसरे ‘महंगाई डायन खाए जात है’. हे दोन्ही गाणी काँग्रेस सरकारच्या कार्यकाळा आली आहेत.’’

महत्वाचे म्हणजे, या वेळचे संसदेतील अर्थसंकल्पिय अधिवेशन अत्यंत महत्वाचे मानले जात आहे. कारण हे या वर्षात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वीचे अखेरचे अधिवेश  आहे.  

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसParliamentसंसदBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशन