शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

मोदी सरकार UPA सरकारच्या आर्थिक गैरव्यवस्थापनावर 'श्वेतपत्रिका' आणणार! जाणून घ्या संसदेत केव्हा सादर होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 19:20 IST

Parliament Budget Session 2024: ही श्वेतपत्रिका शुक्रवारी अर्थात 9 फेब्रुवारीला अथवा शनिवारी  म्हणजेच 10 फेब्रुवारीला सभागृहात सादर केली जाऊ शकते.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या (2004-2014) 10 वर्षांच्या कार्यकाळातील आर्थिक गैरव्यवस्थापनासंदर्भात संसदेत श्वेतपत्रिका आणणार आहे. ही श्वेतपत्रिका शुक्रवारी अर्थात 9 फेब्रुवारीला अथवा शनिवारी  म्हणजेच 10 फेब्रुवारीला सभागृहात सादर केली जाऊ शकते.

या श्वेतपत्रिकेत आर्थिक गैरव्यवस्थापनाशिवाय यूपीए सरकारच्या कार्यकाळात उचलल्या जाऊ शकणाऱ्या सकारात्मक पावलांच्या परिणामांसंदर्भातही चर्चा केली जाईल. एवढेच नाही, तर या श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून भारताची आर्थिक दुर्दशा आणि अर्थव्यवस्थेवर पडलेला नकारात्मक प्रभवही सविस्तरपणे समोर समोर ठेवला जाईल.

काय म्हणाल्या होत्या निर्मला सीतारामन? -तत्पूर्वी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा तात्पुरता अर्थसंकल्प नुकताच सादर केला.  यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या गेल्या 10 वर्षांतील कामाचा लेखाजोखा मांडला आणि विविध बाबतीत त्याची तुलना यूपीए सरकारच्या 10 वर्षांच्या कार्यकाळाशी केली. यूपीए सरकारच्या कार्यकाळात अर्थव्यवस्थेचे कसे गैरव्यवस्थापन झाले, यावर श्वेतपत्रिका मांडणार असल्याचेही निर्मला सीतारामन यांनी तेव्हा जाहीर केले होते.

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकार 2014मध्ये सत्तेवर आले. त्यापूर्वीच्या 10 वर्षांच्या काळात काय झाले आणि त्यातून काय धडे घ्यायला हवे, हे सांगण्यासाठी श्वेतपत्रिका काढणार असल्याचे अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या होत्या. एवढेच नाही तर, माेदी सरकार स्थापन झाले त्यावेळी अर्थव्यवस्था टप्प्याटप्प्याने सुधारणे आणि शासन व्यवस्थेची घडी नीट बसविण्याची माेठी जबाबदारी सरकारवर हाेती. लाेकांना आशा देणे, गुंतवणूक आकर्षित करणे आणि अतिशय आवश्यक असलेल्या सुधारणांसाठी समर्थन उभे करणे, ही त्यावेळी काळाची गरज हाेती. ‘देश प्रथम’ या तत्त्वावर विश्वास ठेवून सरकारने हे कार्य यशस्वीपणे पार पाडले. सरकारसमाेरील संकटांवर मात करून, सर्वांगीण विकास साधण्यासाठी अर्थव्यवस्थेला सातत्यशील विकासाच्या मार्गावर आणण्यात आले आहे, असे सीतारामन यांनी म्हटले होते.

महागाईच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर निशाणा -सोमावारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर धन्यवाद प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना काँग्रेसवर निशाणा साधला होता. यावेळी त्यांनी महागाईच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर निशाणा साधला होता. ते म्हणाले, ''युक्रेन आणि गाझामध्ये युद्ध सुरू असूनही देशातील महागाई नियंत्रणात आहे. देशातील महागाईवर दोन गाणी सुपर हिट झाले. एक ‘महंगाई मार गई’ आणि दुसरे ‘महंगाई डायन खाए जात है’. हे दोन्ही गाणी काँग्रेस सरकारच्या कार्यकाळा आली आहेत.’’

महत्वाचे म्हणजे, या वेळचे संसदेतील अर्थसंकल्पिय अधिवेशन अत्यंत महत्वाचे मानले जात आहे. कारण हे या वर्षात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वीचे अखेरचे अधिवेश  आहे.  

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसParliamentसंसदBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशन