शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

हे ज्यांचं वाईट चिंततील, त्यांचं भलंच झालंय; PM मोदींची जोरदार बॅटिंग, तीन उदाहरणंच दिली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 18:10 IST

Parliament No-confidence Motion: जगभरात भारताचं नाव उंचावलं असून देशात परदेशी गुंतवणूक देखील वाढत असल्याचं नरेंद्र मोदींनी सांगितले.

नवी दिल्ली: लोकसभेत आज काँग्रेसने आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले. देशाच्या जनतेने आमच्या सरकारवर वारंवार जो विश्वास दाखवला आहे, देशाच्या कोट्यवधी जनतेचे आभार, असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरुवात केली. आम्ही जेव्हा जनतेचा कौल मागितला, तेव्हा जनतेनेही पूर्ण ताकदीने यांच्यासाठी अविश्वास घोषित केला. एनडीएला आणि भाजपाला जास्त जागा मिळाल्या. त्यामुळे एक प्रकारे विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी शुभ असतो. तुम्ही पक्क केलं आहे की एनडीए आणि भाजपा २०२४च्या निवडणुकीत जुने सर्व विक्रम तोडून जनतेच्या आशीर्वादाने विजयी होतील, असा दावाही नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला. 

पाच वर्षांत साडे तेरा कोटी लोक गरिबीतून बाहेर आल्याची माहिती देखील नरेंद्र मोदींनी दिली. देशाचं जे मंगल होतंय, जयजयकार होतोय. दिवसरात्र हे मला बोलतच असतात. मोदी तेरी कब्र खुदेगी, हा यांचा आवडता नारा आहे. पण माझ्यासाठी यांचे हे अपशब्द टॉनिक आहे. हे असं का करतात, याचं सिक्रेट मी सांगू इच्छितो की, माझा ठाम विश्वास झाला आहे. विरोधी लोकांना एक सिक्रेट वरदान मिळालं आहे, ते म्हणजे, ज्यांचं वाईट चिंततील, त्यांचं भलंच होईल. एक उदाहरण माझ्या रुपाने आहेच, २० वर्षं झाली, काय-काय केलं गेलं...पण माझं भलंच झालं, असा टोला नरेंद्र मोदींनी विरोधकांना लगावला.

जगाचा भारतावरचा विश्वास वाढत असल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले. तर जगभरात भारताचं नाव उंचावलं असून देशात परदेशी गुंतवणूक देखील वाढत असल्याचं नरेंद्र मोदींनी सांगितले. जगाचा भारतावरचा विश्वास वाढत चालला आहे. इतकं आश्वासक वातावरण असताना, अविश्वास प्रस्तावाच्या माध्यमातून जनतेचा आत्मविश्वास तोडण्याचा प्रयत्न विरोधक करत असल्याचा आरोप नरेंद्र मोदींनी केला. तसेच हे लोक देशाच्या ज्या संस्थां रसातळाला जाण्याचे दावे करतात, त्या संस्थांचं भाग्य उजळून निघतं. हे लोक ज्या पद्धतीने देशाबद्दल बोलत आहेत, मला विश्वास आहे की देशाचंही भलंच होणार आहे, असं सांगत नरेंद्र मोदींनी तीन उदाहरणे दिली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली ३ उदाहरणे-

१. बँकिंग क्षेत्र उद्ध्वस्त होऊन जाईल. मोठमोठ्या तज्ज्ञांना विदेशातून आणून त्यांच्याकडून हे बोलून घेत होते. पण आपल्या सार्वजनिक बँकांचा निव्वळ नफा दुप्पट झाला. त्यांनी फोन बँकिंग घोटाळ्याचा उल्लेख केला. पण एनपीए पूर्ण कमी करून नव्या दिशेनं वाटचाल सुरू केलं आहे.

२. एचएएलवर बऱ्याच वाईट गोष्टी हे बोलले. एचएएल उद्ध्वस्त झालंय असं सांगितलं गेलं. आजकाल शेतांमध्ये जाऊन व्हिडीओ शूट केले जातात. तसेच त्या वेळी एचएएल कंपनीच्या दरवाज्यावर कामगारांची सभा घेऊन व्हिडीओ शूट केला होता. कामगारांना भडकवण्यात आलं होतं. पण आज HAL यशस्वी आहे.

३. एलआयसीबाबतही असेच दावे केले गेले. पण आज एलआयसी सातत्याने मजबूत होत आहे. शेअर मार्केटमध्ये रस असणाऱ्यांना हा गुरुमंत्र आहे. ज्या सरकारी कंपनीवर विरोधक आरोप करतील, त्यात तुम्ही गुंतवणूक करून टाका, असा टोला देखील नरेंद्र मोदींनी लगावला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनParliamentसंसदBJPभाजपाcongressकाँग्रेस