शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

Narendra Modi: भाजपा खासदारांच्या बैठकीत नरेंद्र मोदी भावूक; देशाबाबत केलं मोठं विधान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 12:12 IST

Narendra Modi: दिल्ली हिंसाचारानंतर पहिल्यांदा २६ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर भाष्य केलं होतं.

ठळक मुद्देदेशात शांतता आणि एकता गरजेची आहे.विकास भाजपाचा मंत्र आहे. त्यासाठी शांतता आणि सद्भावना गरजेचे आहेपंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं भाजपा खासदारांना मार्गदर्शन

नवी दिल्ली - सीएएच्या मुद्द्यावरुन देशाच्या राजधानी दिल्लीत गेल्या आठवडाभरापासून हिंसाचार पेटला आहे. या हिंसाचारात आतापर्यंत ४० हून अधिक लोकांचा जीव गेला. अनेकांची घरे जाळण्यात आली, दुकाने लुटली, दंगल पेटवण्यात आली. या संपूर्ण प्रकारावरुन विरोधकांकडून केंद्र सरकारला घेरण्यात येत आहे. 

सोशल मीडियापासून दूर राहण्याचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. हिंसाचार भडकवण्यामागे सोशल मीडियाची भूमिका महत्त्वाची ठरली, अनेक अफवांमुळे दिल्लीतील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे. या अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवण्यात येतात. सोमवारी अचानक नरेंद्र मोदींनी ट्विट केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं. अशातच आज भाजपाच्या संसदीय दलाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंसाचाराच्या घटनेवरुन भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. 

या बैठकीला संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, देशात शांतता आणि एकता गरजेची आहे. सबका साथ-सबका विकास करत असताना सबका विश्वासही महत्त्वाचा आहे. माझ्यासाठी सर्वात पहिलं माझा देश महत्त्वाचा आहे त्यानंतर पक्ष आहे असं त्यांनी सांगितले. तसेच देश सर्वोच्च आहे. विकास भाजपाचा मंत्र आहे. त्यासाठी शांतता आणि सद्भावना गरजेचे आहे. विकास पुढे घेऊन जायचा आहे. फक्त बोलू नका तर प्रत्येक खासदाराने शांतता, एकता आणि सद्भावना राखण्यासाठी पुढाकार घेण्यात यावा अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदारांना दिली. 

दिल्ली हिंसाचारानंतर पहिल्यांदा २६ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर भाष्य केलं होतं. तब्बल ६९ तासांनंतर आलेल्या या ट्विटमुळे पंतप्रधान मोदींवर विरोधकांनी टीकाही केली. लोकांना शांतता राखण्याचं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं होतं. या ट्विटमध्ये म्हटलं होतं की, दिल्लीच्या विविध भागातील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलीस आणि इतर यंत्रणा कार्यरत आहेत. त्यामुळे सर्वांनी शांतता व बंधुता टिकवून ठेवण्याचं काम करावं अशी विनंती त्यांनी केली होती. 

दरम्यान, सोमवारी अचानक मोदींनी टि्वटर, फेसबुक, इन्स्टाग्राम व यूट्यूब या सोशल मीडियावरील माझी अकाउंट्स येत्या रविवारपासून बंद करण्याचा विचार करत आहे. याविषयी पुढील माहिती नंतर देईन असं म्हटलं, त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीdelhi violenceदिल्लीBJPभाजपा