शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

पंतप्रधान मोदी म्हणाले, "यापूर्वी अर्थसंकल्प मतांची बॅलन्स शीट होती, सरकारनं कोणताही नवा कर लावला नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 13:39 IST

शेती आणि आरोग्य सुविधांवरही लक्ष केंद्रीत केल्याचं मोदींचं वक्तव्य

ठळक मुद्देशेती आणि आरोग्य सुविधांवरही लक्ष केंद्रीत केल्याचं मोदींचं वक्तव्ययापूर्वीच्या सरकारांकडून अर्थसंकल्पात गरजेप्रमाणे घोषणा, मोदींचा आरोप

पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी गुरुवारी स्वातंत्र्यलढ्याच्या ऐतिहासिक चौरा चौरी कार्यक्रमाच्या शताब्दी समारंभांचा प्रारंभ केला. उत्तर प्रदेशच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये याचं आयोजन करण्यात येत आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदी हे या कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. यादरम्या त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पावही भाष्य केलं. तसंच त्यांनी या अर्थसंकल्पाचं स्वागत करत आपल्या सरकारनं कोणत्याही व्यक्तीवर नव्या कराचा बोजा टाकला नसल्याचं म्हटलं."यापूर्वीच्या सरकारांनी अर्थसंकल्पाचा वापर मतांच्या बॅलन्स शीट प्रमाणे केला. गरजेप्रमाणेच केवळ घोषणा करण्यात येत होता. कोरोना विषाणूच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर यावेळी लोकांवर कराचा अतिरिक्त बोजा पडेल असं तज्ज्ञ म्हणत होते. परंतु आमच्या सरकारनं कोणत्याही नव्या कराचा बोजा टाकला नाही," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांकडेही विशेष लक्ष देण्यात आलं आहे. तसंच मंडया मजबूत करण्यासाठीही तरतूद करण्यात आली आहे. जवळपास १ हजार मंडयांना आम्ही ई-नाम शी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना संकटातही कृषी क्षेत्र न थांबता देशाच्या प्रगतीत आपलं योगदान देत असल्याचंही ते म्हणाले. अर्थसंकल्पात काय आहे विशेष?आता कोणत्याही गावातील किंवा कोणत्याही ठिकाणातील लोकांना आरोग्य सुविधांसाठी आणि छोट्या मोठ्या आजारांसाठी शहराकडे पळावं लागणार नाही यावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. एवढंच नाही तर शहरांमध्ये उपचार घेण्यास कोणतीही अडचण येऊ नये यासाठी मोठे निर्णय घेण्यात आल्याचे मोदी म्हणाले. "ग्रामीण भागांमध्ये पायाभूत सुविधांसाठी करण्यात आलेली तरतूद वाढवून ४० हजार कोटी रूपये केली आहे. याचा देशातील प्रत्येक शेतकऱ्याला लाभ होणार आहे. हे निर्णय आपल्या देशातील शेतकऱ्याला आत्मनिर्भर बनवतील," असंही त्यांनी नमूद केलं.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानbudget 2021बजेट 2021TaxकरFarmerशेतकरीNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन