शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

भ्रष्टाचारी सरकारला मतदारांनी हद्दपार केले; PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 20:06 IST

'आजचा निकाल काँग्रेस आणि त्यांच्या घमंडिया आघाडीसाठी मोठा धडा आहेत.'

नवी दिल्ली: आजच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. "आजचा विजय ऐतिहासिक आणि अभुतपूर्वक आहे. आज 'सबका साथ, सबका विकास'ची भावना जिंकली आहे, आज आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा विजय झाला, आज भारताच्या विकासासाठी राज्यांचा विकास, या विचाराचा विजय झाला, आज इमानदारी, पारदर्शकता आणि सू-शानाचा विजय झाला," अशी भावना पीएम मोदींनी व्यक्त केली.

मोदी पुढे म्हणतात, "देशातील तरुणांना भ्रष्टाचाराची मोठी चीड आहे. ज्या सरकाराने तरुणांविरोधात काम केले, ते सरकार आज सत्तेतून बाहेर पडले आहे. हे सरकार पेपर लीक आणि जमीन घोटाळ्यांच्या आरोपात अडकले आहे. याचाच परिणाम या तिन्ही राज्यात सत्ताधारी बाहेर गेले. आज देशातील तरुणांमध्ये विश्वास वाढतोय, भाजप त्यांच्या इच्छा जाणतो आणि त्यांच्यासाठी काम करतो, हे देशातील तरुणांना माहिती आहे. भाजपचे सरकार तरुणांच्या हिताचे काम करते, नवीन संधी निर्माण करत आहे." 

"आज देशातील आदिवासी समाज भाजपकडे आशेने पाहतोय. काँग्रेसने कधीच आदिवासी समाजाला योग्य आदर दिला नाही. त्यामुळेच आदिवासी समाजाने काँग्रेसला हद्दपार केले. आदिवासी समाजाला विकास हवाय, त्यांना भाजपवरच विश्वास आहे. मी आज भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याचेही आभार मानतो. तुमची निष्ठा, तुमचे समर्पण अतुलनीय आहे. डबल इंजिन सरकारचा मेसेज पूर्ण इमानदारीने लोकापर्यंत पोहोचवले. याचाच परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. आपले अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही दिवसरात्री काम केले. त्यांच्या कामामुळे आज आपल्याला हा निकाप पाहायला मिळतोय."

"फक्त विजयासाठी काहीही बोलणे, लालसेपोटी खोट्या घोषणा करणे, हे मतदारांना आवडत नाही. भारताच्या मतदारांना माहित आहे की, जेव्हा भारत प्रगती करतो तेव्हा राज्याची प्रगती होते आणि प्रत्येक कुटुंबाचे जीवन सुधारते. म्हणूनच ते सतत भाजपची निवड करत आहेत. हे निवडणूक निकाल काँग्रेस आणि त्यांच्या अहंकारी आघाडीसाठीही मोठा धडा आहेत. धडा असा आहे की, केवळ काही कुटुंबातील सदस्य मंचावर एकत्र आल्याने देशाचा विश्वास जिंकता येत नाही. देशातील जनतेची मने जिंकण्यासाठी राष्ट्रसेवेची भावना असली पाहिजे, ती घमंडिया आघाडीत नाही."

"भ्रष्टाचाराविरोधात काम करणाऱ्या संस्थांना बदनाम करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं, ही जनता तुम्हाला माफ करणार नाही. त्या लोकांच्या मनात थोडीही देशभक्ती दिसत नाही. त्यामुळेच लोकांनी तुम्हाला हद्दपार केले आहे. लोकशाहीच्या हितासाठी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना माझा आणखी एक सल्ला आहे. कृपया देशविरोधी आहे, देशाचे विभाजन आणि देशाला कमकुवत करणारे राजकारण करू नका," असा टोलाही त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMadhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकchhattisgarh assembly electionछत्तीसगड विधानसभा निवडणूक २०२३telangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३