शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
2
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
3
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
4
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
5
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
6
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
7
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
8
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
9
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 
10
Shreyas Iyer : श्रेयस लवकर बरा व्हावा! सूर्याच्या आईची देवासमोर प्रार्थना; व्हिडिओ व्हायरल
11
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
12
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
13
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
14
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
15
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
16
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
17
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
18
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
19
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
20
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस

भ्रष्टाचारी सरकारला मतदारांनी हद्दपार केले; PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 20:06 IST

'आजचा निकाल काँग्रेस आणि त्यांच्या घमंडिया आघाडीसाठी मोठा धडा आहेत.'

नवी दिल्ली: आजच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. "आजचा विजय ऐतिहासिक आणि अभुतपूर्वक आहे. आज 'सबका साथ, सबका विकास'ची भावना जिंकली आहे, आज आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा विजय झाला, आज भारताच्या विकासासाठी राज्यांचा विकास, या विचाराचा विजय झाला, आज इमानदारी, पारदर्शकता आणि सू-शानाचा विजय झाला," अशी भावना पीएम मोदींनी व्यक्त केली.

मोदी पुढे म्हणतात, "देशातील तरुणांना भ्रष्टाचाराची मोठी चीड आहे. ज्या सरकाराने तरुणांविरोधात काम केले, ते सरकार आज सत्तेतून बाहेर पडले आहे. हे सरकार पेपर लीक आणि जमीन घोटाळ्यांच्या आरोपात अडकले आहे. याचाच परिणाम या तिन्ही राज्यात सत्ताधारी बाहेर गेले. आज देशातील तरुणांमध्ये विश्वास वाढतोय, भाजप त्यांच्या इच्छा जाणतो आणि त्यांच्यासाठी काम करतो, हे देशातील तरुणांना माहिती आहे. भाजपचे सरकार तरुणांच्या हिताचे काम करते, नवीन संधी निर्माण करत आहे." 

"आज देशातील आदिवासी समाज भाजपकडे आशेने पाहतोय. काँग्रेसने कधीच आदिवासी समाजाला योग्य आदर दिला नाही. त्यामुळेच आदिवासी समाजाने काँग्रेसला हद्दपार केले. आदिवासी समाजाला विकास हवाय, त्यांना भाजपवरच विश्वास आहे. मी आज भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याचेही आभार मानतो. तुमची निष्ठा, तुमचे समर्पण अतुलनीय आहे. डबल इंजिन सरकारचा मेसेज पूर्ण इमानदारीने लोकापर्यंत पोहोचवले. याचाच परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. आपले अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही दिवसरात्री काम केले. त्यांच्या कामामुळे आज आपल्याला हा निकाप पाहायला मिळतोय."

"फक्त विजयासाठी काहीही बोलणे, लालसेपोटी खोट्या घोषणा करणे, हे मतदारांना आवडत नाही. भारताच्या मतदारांना माहित आहे की, जेव्हा भारत प्रगती करतो तेव्हा राज्याची प्रगती होते आणि प्रत्येक कुटुंबाचे जीवन सुधारते. म्हणूनच ते सतत भाजपची निवड करत आहेत. हे निवडणूक निकाल काँग्रेस आणि त्यांच्या अहंकारी आघाडीसाठीही मोठा धडा आहेत. धडा असा आहे की, केवळ काही कुटुंबातील सदस्य मंचावर एकत्र आल्याने देशाचा विश्वास जिंकता येत नाही. देशातील जनतेची मने जिंकण्यासाठी राष्ट्रसेवेची भावना असली पाहिजे, ती घमंडिया आघाडीत नाही."

"भ्रष्टाचाराविरोधात काम करणाऱ्या संस्थांना बदनाम करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं, ही जनता तुम्हाला माफ करणार नाही. त्या लोकांच्या मनात थोडीही देशभक्ती दिसत नाही. त्यामुळेच लोकांनी तुम्हाला हद्दपार केले आहे. लोकशाहीच्या हितासाठी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना माझा आणखी एक सल्ला आहे. कृपया देशविरोधी आहे, देशाचे विभाजन आणि देशाला कमकुवत करणारे राजकारण करू नका," असा टोलाही त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMadhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकchhattisgarh assembly electionछत्तीसगड विधानसभा निवडणूक २०२३telangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३