शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

PM Modi In Lok Sabha: “आज तो नेहरुजी ही नेहरुजी; मजा लिजिए”; मोदींनी महागाईची आकडेवारीच दाखवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 19:53 IST

PM Modi In Lok Sabha: महागाईवरुन काँग्रेसने केंद्र सरकारवर केलेल्या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत प्रत्युत्तर दिले.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लोकसभेत बोलताना काँग्रेस आणि कोरोना काळातील विरोधकांकडून सातत्याने होत असलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. पंतप्रधान मोदी काँग्रेसवर निशाणा साधत असताना काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्यासह काँग्रेस सदस्यांनी गोंधळ आणि गदारोळ करण्यास सुरुवात केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी आज तो नेहरुजी ही नेहरुजी; मजा लिजिए, असा टोला लगावला. 

एकीकडे कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे अगदी पेट्रोल डिझेलपासून ते सिलिंडर गॅसपर्यंत अनेक गोष्टींचे दर गगनाला भिडले आहेत. याच मुद्द्यावरून काँग्रेसने सातत्याने केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर हल्लाबोल केल्याचे दिसून आले. याला लोकसभेत उत्तर देताना अगदी देशाचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भाषणांचा सारांश देत महागाईचा दर भाजपच्या कार्यकाळात कसा कमी होता, याची आकडेवारीच दिली. 

आम्ही पळून जाणारे लोक नाही, आमचे प्रयत्न प्रामाणिक

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज नेहरुंचे नाव घ्यावेच लागेल. किंबहुना ते मी घेणारच आहे. देशात महागाई वाढली होती, तेव्हा तत्कालीन सरकाने हात वर केले होते. महागाईवर सरकारचे नियंत्रण नव्हते. लाल किल्यावरून भाषण करताना नेहरुंनी, कोरियातील लढाईमुळे भारतात महागाई वाढते. ही बाब आमच्या नियंत्रणातील नाही, असे सांगितले होते. तसेच अमेरिकेतील घटनांमुळेही भारतातील महागाई वाढते, असे म्हटले होते. मात्र, आम्ही पळून जाणाऱ्यांपैकी किंवा हात वर करणाऱ्यांपैकी नाही. महागाई नियंत्रण तसेच स्थिरता येण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. तसेच सन २०१४ ते २०२० या कालावधीत महागाईचा दर हा ५ टक्क्यांपेक्षा कमी राहिला, असे पंतप्रधान मोदींनी नमूद केले.

काँग्रेसवाल्यांनी महागाईचा कांगावा केला

तत्कालीन माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम सध्या वर्तमानपत्रात अर्थव्यवस्थेवर लेख लिहित आहेत. पण सन २०१२ मध्ये ते म्हणाले की, पाण्याच्या बाटलीसाठी १५ रुपये आणि आईस्क्रीमसाठी २० रुपये खर्च करतात, तेव्हा जनतेला त्रास होत नाही. परंतु गहू आणि तांदूळाच्या किमती १ रुपयांनी वाढल्याने जनता सहन करू शकत नाही, असे म्हटले होते. यावरूनच काँग्रेसला सामान्य जनतेची पर्वा नाही. महागाईचा काँग्रेसने केवळ कांगावा केला, अशी टीकाही पंतप्रधान मोदी यांनी केली. 

टॅग्स :lok sabhaलोकसभाNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारcongressकाँग्रेस