शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

PM Modi In Lok Sabha: “आज तो नेहरुजी ही नेहरुजी; मजा लिजिए”; मोदींनी महागाईची आकडेवारीच दाखवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 19:53 IST

PM Modi In Lok Sabha: महागाईवरुन काँग्रेसने केंद्र सरकारवर केलेल्या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत प्रत्युत्तर दिले.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लोकसभेत बोलताना काँग्रेस आणि कोरोना काळातील विरोधकांकडून सातत्याने होत असलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. पंतप्रधान मोदी काँग्रेसवर निशाणा साधत असताना काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्यासह काँग्रेस सदस्यांनी गोंधळ आणि गदारोळ करण्यास सुरुवात केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी आज तो नेहरुजी ही नेहरुजी; मजा लिजिए, असा टोला लगावला. 

एकीकडे कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे अगदी पेट्रोल डिझेलपासून ते सिलिंडर गॅसपर्यंत अनेक गोष्टींचे दर गगनाला भिडले आहेत. याच मुद्द्यावरून काँग्रेसने सातत्याने केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर हल्लाबोल केल्याचे दिसून आले. याला लोकसभेत उत्तर देताना अगदी देशाचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भाषणांचा सारांश देत महागाईचा दर भाजपच्या कार्यकाळात कसा कमी होता, याची आकडेवारीच दिली. 

आम्ही पळून जाणारे लोक नाही, आमचे प्रयत्न प्रामाणिक

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज नेहरुंचे नाव घ्यावेच लागेल. किंबहुना ते मी घेणारच आहे. देशात महागाई वाढली होती, तेव्हा तत्कालीन सरकाने हात वर केले होते. महागाईवर सरकारचे नियंत्रण नव्हते. लाल किल्यावरून भाषण करताना नेहरुंनी, कोरियातील लढाईमुळे भारतात महागाई वाढते. ही बाब आमच्या नियंत्रणातील नाही, असे सांगितले होते. तसेच अमेरिकेतील घटनांमुळेही भारतातील महागाई वाढते, असे म्हटले होते. मात्र, आम्ही पळून जाणाऱ्यांपैकी किंवा हात वर करणाऱ्यांपैकी नाही. महागाई नियंत्रण तसेच स्थिरता येण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. तसेच सन २०१४ ते २०२० या कालावधीत महागाईचा दर हा ५ टक्क्यांपेक्षा कमी राहिला, असे पंतप्रधान मोदींनी नमूद केले.

काँग्रेसवाल्यांनी महागाईचा कांगावा केला

तत्कालीन माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम सध्या वर्तमानपत्रात अर्थव्यवस्थेवर लेख लिहित आहेत. पण सन २०१२ मध्ये ते म्हणाले की, पाण्याच्या बाटलीसाठी १५ रुपये आणि आईस्क्रीमसाठी २० रुपये खर्च करतात, तेव्हा जनतेला त्रास होत नाही. परंतु गहू आणि तांदूळाच्या किमती १ रुपयांनी वाढल्याने जनता सहन करू शकत नाही, असे म्हटले होते. यावरूनच काँग्रेसला सामान्य जनतेची पर्वा नाही. महागाईचा काँग्रेसने केवळ कांगावा केला, अशी टीकाही पंतप्रधान मोदी यांनी केली. 

टॅग्स :lok sabhaलोकसभाNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारcongressकाँग्रेस