शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

PM Modi In Lok Sabha: “आज तो नेहरुजी ही नेहरुजी; मजा लिजिए”; मोदींनी महागाईची आकडेवारीच दाखवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 19:53 IST

PM Modi In Lok Sabha: महागाईवरुन काँग्रेसने केंद्र सरकारवर केलेल्या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत प्रत्युत्तर दिले.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लोकसभेत बोलताना काँग्रेस आणि कोरोना काळातील विरोधकांकडून सातत्याने होत असलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. पंतप्रधान मोदी काँग्रेसवर निशाणा साधत असताना काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्यासह काँग्रेस सदस्यांनी गोंधळ आणि गदारोळ करण्यास सुरुवात केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी आज तो नेहरुजी ही नेहरुजी; मजा लिजिए, असा टोला लगावला. 

एकीकडे कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे अगदी पेट्रोल डिझेलपासून ते सिलिंडर गॅसपर्यंत अनेक गोष्टींचे दर गगनाला भिडले आहेत. याच मुद्द्यावरून काँग्रेसने सातत्याने केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर हल्लाबोल केल्याचे दिसून आले. याला लोकसभेत उत्तर देताना अगदी देशाचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भाषणांचा सारांश देत महागाईचा दर भाजपच्या कार्यकाळात कसा कमी होता, याची आकडेवारीच दिली. 

आम्ही पळून जाणारे लोक नाही, आमचे प्रयत्न प्रामाणिक

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज नेहरुंचे नाव घ्यावेच लागेल. किंबहुना ते मी घेणारच आहे. देशात महागाई वाढली होती, तेव्हा तत्कालीन सरकाने हात वर केले होते. महागाईवर सरकारचे नियंत्रण नव्हते. लाल किल्यावरून भाषण करताना नेहरुंनी, कोरियातील लढाईमुळे भारतात महागाई वाढते. ही बाब आमच्या नियंत्रणातील नाही, असे सांगितले होते. तसेच अमेरिकेतील घटनांमुळेही भारतातील महागाई वाढते, असे म्हटले होते. मात्र, आम्ही पळून जाणाऱ्यांपैकी किंवा हात वर करणाऱ्यांपैकी नाही. महागाई नियंत्रण तसेच स्थिरता येण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. तसेच सन २०१४ ते २०२० या कालावधीत महागाईचा दर हा ५ टक्क्यांपेक्षा कमी राहिला, असे पंतप्रधान मोदींनी नमूद केले.

काँग्रेसवाल्यांनी महागाईचा कांगावा केला

तत्कालीन माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम सध्या वर्तमानपत्रात अर्थव्यवस्थेवर लेख लिहित आहेत. पण सन २०१२ मध्ये ते म्हणाले की, पाण्याच्या बाटलीसाठी १५ रुपये आणि आईस्क्रीमसाठी २० रुपये खर्च करतात, तेव्हा जनतेला त्रास होत नाही. परंतु गहू आणि तांदूळाच्या किमती १ रुपयांनी वाढल्याने जनता सहन करू शकत नाही, असे म्हटले होते. यावरूनच काँग्रेसला सामान्य जनतेची पर्वा नाही. महागाईचा काँग्रेसने केवळ कांगावा केला, अशी टीकाही पंतप्रधान मोदी यांनी केली. 

टॅग्स :lok sabhaलोकसभाNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारcongressकाँग्रेस