शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: आझाद मैदानावर आंदोलन करावे, इतर कुठेही बसू नये; मुंबई पोलिसांचे आंदोलकांना आवाहन
3
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
4
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
5
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
6
GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले
7
Parivartani Ekadashi 2025: परिवर्तनी एकादशी; चातुर्मासाचा मध्यंतर, यादिवशी श्रीहरी श्रीविष्णूंची बदलतात कूस!
8
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
9
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
10
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
11
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
12
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
13
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
14
'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?
15
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
16
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
17
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
18
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
19
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
20
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार

पंतप्रधान मोदी यांची घटिका आता भरत आली - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 05:26 IST

केंद्रातील सरकार बदलण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घटिका भरत आली असल्याचा दावा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केला.

नवी दिल्ली  -  केंद्रातील सरकार बदलण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घटिका भरत आली असल्याचा दावा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केला.राहुल गांधी यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, काँग्रेसने जाहीर केलेली न्याय योजना पसंत पडल्याने युवक तसेच ज्येष्ठ नागरिकही लोकसभा निवडणुकांत आम्हालाच मतदान करत आहेत. देशातील गरिबीचे उच्चाटन करण्यासाठी न्याय योजना अतिशय परिणामकारक ठरणार असल्याचे त्यांना मनोमन पटले आहे.देशातील सर्वात गरीब कुटुंबांना दरवर्षी ७२ हजार रुपयांचे किमान हमी उत्पन्न देण्याचे आश्वासन काँग्रेस पक्षाने आपल्या न्याय योजनेच्या माध्यमातून दिले आहे. ‘अब होगा न्याय’, असे घोषवाक्य असलेली प्रचारमोहीम लोकसभा निवडणुकांत या पक्षाने गेल्या महिन्यापासून राबविली आहे.‘चौकीदार चोर है' विषयीभिंड : ‘चौकीदार चोर है' ही घोषणा मी किंवा काँग्रेसने तयार केलेली नाही. युवक, शेतकरी, मजूर यांनीच मोदी सरकारची खिल्ली उडविण्यासाठी ही घोषणा तयार केली आहे, असा दावा राहुल गांधी यांनी केला. जाहीर सभेत त्यांनी चौकीदार चोर है या घोषणेचा उगम कसा झाला याचा किस्सा सांगितला. दोन कोटी रोजगार निर्माण करीन, प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करणार अशी आश्वासने चौकीदाराने (नरेंद्र मोदी) दिल्याचा उल्लेख आपण छत्तीसगडमधील सभेत करताच श्रोत्यांपैकी दहा-पंधरा युवकांनी ‘चौर है' असा प्रतिसाद दिला. ते काय म्हणाले हे पहिल्यांदा नीट ऐकू न आल्याने आपण पुन्हा विचारले असता ते युवक जोरात म्हणाले की ‘चौकीदार चोर है'. त्यानंतर ही घोषणा जनमानसात पसरली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदी