शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदी यांची घटिका आता भरत आली - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 05:26 IST

केंद्रातील सरकार बदलण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घटिका भरत आली असल्याचा दावा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केला.

नवी दिल्ली  -  केंद्रातील सरकार बदलण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घटिका भरत आली असल्याचा दावा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केला.राहुल गांधी यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, काँग्रेसने जाहीर केलेली न्याय योजना पसंत पडल्याने युवक तसेच ज्येष्ठ नागरिकही लोकसभा निवडणुकांत आम्हालाच मतदान करत आहेत. देशातील गरिबीचे उच्चाटन करण्यासाठी न्याय योजना अतिशय परिणामकारक ठरणार असल्याचे त्यांना मनोमन पटले आहे.देशातील सर्वात गरीब कुटुंबांना दरवर्षी ७२ हजार रुपयांचे किमान हमी उत्पन्न देण्याचे आश्वासन काँग्रेस पक्षाने आपल्या न्याय योजनेच्या माध्यमातून दिले आहे. ‘अब होगा न्याय’, असे घोषवाक्य असलेली प्रचारमोहीम लोकसभा निवडणुकांत या पक्षाने गेल्या महिन्यापासून राबविली आहे.‘चौकीदार चोर है' विषयीभिंड : ‘चौकीदार चोर है' ही घोषणा मी किंवा काँग्रेसने तयार केलेली नाही. युवक, शेतकरी, मजूर यांनीच मोदी सरकारची खिल्ली उडविण्यासाठी ही घोषणा तयार केली आहे, असा दावा राहुल गांधी यांनी केला. जाहीर सभेत त्यांनी चौकीदार चोर है या घोषणेचा उगम कसा झाला याचा किस्सा सांगितला. दोन कोटी रोजगार निर्माण करीन, प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करणार अशी आश्वासने चौकीदाराने (नरेंद्र मोदी) दिल्याचा उल्लेख आपण छत्तीसगडमधील सभेत करताच श्रोत्यांपैकी दहा-पंधरा युवकांनी ‘चौर है' असा प्रतिसाद दिला. ते काय म्हणाले हे पहिल्यांदा नीट ऐकू न आल्याने आपण पुन्हा विचारले असता ते युवक जोरात म्हणाले की ‘चौकीदार चोर है'. त्यानंतर ही घोषणा जनमानसात पसरली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदी