शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

"कठोर कायदे असले तरी ते..."; महिला अत्याचारांच्या घटनांवर बोलताना PM मोदींचा महत्त्वाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 14:13 IST

एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदींनी महिलांवरील अत्यांचारांसंबधित गुन्ह्यांवर जलद न्यायाचा मुद्दाही उपस्थित केला.

PM Narendra Modi on Crime against Women:  कोलकाताच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचा बलात्कार करुन हत्या केल्याच्या घटनेनं देशभरात खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ पश्चिम बंगालमधील जनतेसह देशभरातली डॉक्टर संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. लोकांचा रोष वाढत असतानाच पश्चिम बंगालमध्ये या प्रकरणावरुन राजकारण सुरु आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही या घटनेवरुन संताप व्यक्त केला होता. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा प्रकरणांमध्ये जलदगतीने निर्णय व्हायला हवा असं म्हटलं आहे.

कोलकाता बलात्कार प्रकरणाच्या सीबीआय तपासादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी देशाला अशा गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये जलदगतीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी भारत मंडपम येथे जिल्हा न्यायपालिकेच्या राष्ट्रीय परिषदेला संबोधित केले. यावेळी देशाच्या सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासह सर्वोच्च न्यायालयातील अनेक वरिष्ठ न्यायाधीश उपस्थित होते.

"न्यायपालिकेने राष्ट्रीय हित सर्वोपरि ठेवून राष्ट्रीय अखंडतेचे रक्षण केले आहे. कोलकाता येथील महिला डॉक्टरचा बलात्कार आणि खून आणि बदलापूरातील एका शाळेत दोन मुलींचा लैंगिक छळ या घटनांच्या पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचार आणि मुलांची सुरक्षा ही समाजासाठी गंभीर चिंतेची बाब आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी देशात अनेक कठोर कायदे करण्यात आले आहेत, पण ते अधिक सक्रिय करण्याची गरज आहे. संबंधित प्रकरणांमध्ये जितके जलद निर्णय होतील तितके महिलांवरील अत्याचार कमी होतील आणि निम्म्या लोकसंख्येला सुरक्षिततेची हमी मिळेल," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

"न्यायपालिका ही राज्यघटनेची संरक्षक मानली जाते आणि सर्वोच्च न्यायालय आणि न्यायपालिकेने ही जबाबदारी चोखपणे पार पाडली आहे. भारतीय जनतेने सर्वोच्च न्यायालय किंवा न्यायव्यवस्थेवर कधीही अविश्वास दाखवला नाही. आणीबाणीच्या काळातही मूलभूत अधिकार राखण्यात न्यायपालिकेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे," असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीwest bengalपश्चिम बंगालSupreme Courtसर्वोच्च न्यायालयDY Chandrachudडी. वाय. चंद्रचूड