शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

'छत्रपती शिवाजी महाराजांनी गुलामगिरीची मानसिकता संपवली...' राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मोदींनी दिल्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 12:06 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला आज ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं यंदाचे ३५० वे वर्ष आहे. तिथीनुसार किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून दिमाखदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी गुलामीची मानसिकता संपवली. शिवाजी महाराजांनी भारताची एकता आणि अखंडता नेहमीच सर्वोच्च ठेवली. आज शिवाजी महाराजांच्या विचारांचे प्रतिबिंब एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेत पाहायला मिळते. 

पंतप्रधान मोदींकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राष्ट्रीय स्मारकाची मागणी करणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पंतप्रधान मोदी म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाने नवी चेतना, नवी ऊर्जा दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा त्या काळातील एक अद्भुत आणि विशेष अध्याय आहे. राष्ट्रीय कल्याण आणि लोककल्याण हे त्यांच्या कारभाराचे मूलभूत घटक होते. आज मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक आहे.

'महाराजांनी भारताची एकता आणि अखंडता नेहमीच सर्वोच्च ठेवली, आज शिवाजी महाराजांच्या विचारांचे प्रतिबिंब 'एक भारत-उत्तम भारत' या संकल्पनेत पाहायला मिळते. शेकडो वर्षांच्या गुलामगिरीने देशवासीयांचा आत्मविश्वास हिरावून घेतला होता, अशा काळात लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे कठीण काम होते. त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी आक्रमकांच्या विरोधात लढाच दिला नाही तर स्वराज्य शक्य आहे हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण केला, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व अद्भुत होते, त्यांनी स्वराज्यही स्थापन केले आणि सुराज्यही स्थापन केले. ते त्यांच्या शौर्यासाठी आणि सुशासनासाठी देखील ओळखले जातात. त्यांनी राष्ट्र उभारणीचा व्यापक दृष्टीकोनही मांडला. राज्यकारभाराचे लोककल्याणकारी चरित्र त्यांनी लोकांसमोर ठेवले.  त्यावेळी लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे हे अवघड काम होते. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात केवळ आक्रमकांशीच लढा दिला नाही तर स्वराज्य शक्य आहे हा विश्वास लोकांमध्ये निर्माण केला, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRaigadरायगडBJPभाजपा