शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

...म्हणून मोदींनी मागितली विद्यार्थ्यांची माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 13:39 IST

विश्व भारती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती

कोलकाता : शांतिनिकेतनमध्ये विश्व भारती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांची माफी मागितली. यावेळी बंगाली भाषेत मोदींनी भाषणाची सुरुवात केली. 'मी येथे येत असताना काही विद्यार्थ्यांनी याठिकाणी पाण्याची समस्या असल्याचं मला सांगितलं. याबद्दल मी तुमची क्षमा मागतो,' असं मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 'मी याठिकाणी एक पाहुणा म्हणून नव्हे, तर कुलगुरु म्हणून आलोय. गुरुंकडे गेल्याशिवाय विद्या मिळत नाही, असं आपली संस्कृती सांगते. रविंद्रनाथ टागोर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीवर इतक्या प्राध्यापकांच्या उपस्थितीत वेळ घालवण्याची संधी मला मिळतेय, याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो,' असं मोदी म्हणाले. यावेळी मोदींनी रविंद्रनाथ टागोर आणि महात्मा गांधींचा विशेष उल्लेख केला. 'इथल्या जमिनीला गुरुदेवांच्या पायांचा स्पर्श लाभलाय. केव्हा तरी त्यांनी याच ठिकाणी त्यांनी महात्मा गांधींसोबत चर्चा केली असेल, असा विचार मी जेव्हा गाडीतून उतरलो, तेव्हा माझ्या मनात येऊन गेला,' अशा शब्दांमध्ये मोदींनी टागोर आणि महात्मा गांधींच्या स्मृतींना उजाळा दिला. पंतप्रधान मोदींनी यावेळी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचाही उल्लेख केला. 'एका विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला दोन देशांचे पंतप्रधान उपस्थित आहेत, असं बहुधा पहिल्यांदाच घडलं असावं. भारत आणि बांगलादेश एकमेकांकडून खूप काही शिकू शकतात,' असं मोदींनी म्हटलं. विश्व भारती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना उपस्थित होत्या. दीक्षांत समारंभानंतर मोदी झारखंडचा दौरा करणार आहेत.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीwest bengalपश्चिम बंगालStudentविद्यार्थी