शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

PM Modi Security Breach: "पोलीस म्हणाले पंतप्रधान येताहेत, पण आम्हाला वाटलं ते...," ताफा थांबवण्यावर म्हणाले बीकेयू नेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 07:37 IST

PM Modi Security Breach: पंजाबच्या फिरोजपुरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या ढिसाळपणाबद्दल केंद्र सरकार आता 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये आलं आहे.

PM Modi Security Breach: पंजाबच्या फिरोजपुरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या ढिसाळपणाबद्दल केंद्र सरकार आता 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये आलं आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेत कोणतीही हयगय अजिबात सहन केली जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत झालेल्या चुकीबाबत सविस्तर अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयानं (Home Ministry) पंजाब सरकारकडे (Punjab Government) मागितला आहे. दरम्यान भारतीय किसान युनियननं (क्रांतीकारी) आपल्याच कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा अडवल्याचं कबूल केलं.

"दुपारी जवळपास २ वाजता आम्हाला समजलं की पंतप्रधान भटिंडाहून रस्त्यामार्गे येत आहेत. परंतु रॅलीजवळ एक हेलिपॅड होतं. अशातच पोलिसांनी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रस्त्यामार्गे येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यावेळी आम्हाला पोलीस खोटं बोलत आहेत, असं वाटलं. म्हणूनच आम्ही रस्ता रिकामा केला नाही," अशी माहिती बीकेयू क्रांतीकारीचे प्रमुख सुरजीत सिंह फूल यांनी दिली. टाईम्स नाऊशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.

... तर मार्ग रिकामा केला असता"पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना थांबवण्याचे प्रयत्न केले. परंतु पोलीस आणि शेतकऱ्यांची संख्या सारखीच होती. आम्ही मार्गातून हटलो नाही. पंतप्रधानांचा कार्यक्रम कसा बदलला याबद्दल आम्हाला माहित नाही. परंतु ते जर रस्ते मार्गानं येत असते याची कल्पना असती तर आम्ही मार्ग मोकळा केला असता," असंही ते म्हणाले.

माफीचा प्रश्नच नाही"माफी मागण्याचा कोणता प्रश्नच उद्भवत नाही. विरोध करणं हा लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे. आम्ही विरोध करू शकत नाही का? आम्ही जे काही केलं ते योग्य केलं," असंही विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फूल म्हणाले. १२-१३ शेतकरी संघटनांनी विरोध करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारनं एमएसपीवर कोणतीही समिती स्थापन न केल्यानं आंदोलन करण्यात आलं होतं. परंतु मोदींच्या रॅलीच्या जागेपासून ८ किलोमीटरवर हे आंदोलन सुरू होतं. त्यांच्या ताफ्यानं अखेरच्या क्षणी मार्ग बदलल्यानं ही स्थिती निर्माण झाल्याचंही ते म्हणाले.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPunjabपंजाबFarmerशेतकरी