शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

PM Modi Security Breach: "पोलीस म्हणाले पंतप्रधान येताहेत, पण आम्हाला वाटलं ते...," ताफा थांबवण्यावर म्हणाले बीकेयू नेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 07:37 IST

PM Modi Security Breach: पंजाबच्या फिरोजपुरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या ढिसाळपणाबद्दल केंद्र सरकार आता 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये आलं आहे.

PM Modi Security Breach: पंजाबच्या फिरोजपुरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या ढिसाळपणाबद्दल केंद्र सरकार आता 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये आलं आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेत कोणतीही हयगय अजिबात सहन केली जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत झालेल्या चुकीबाबत सविस्तर अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयानं (Home Ministry) पंजाब सरकारकडे (Punjab Government) मागितला आहे. दरम्यान भारतीय किसान युनियननं (क्रांतीकारी) आपल्याच कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा अडवल्याचं कबूल केलं.

"दुपारी जवळपास २ वाजता आम्हाला समजलं की पंतप्रधान भटिंडाहून रस्त्यामार्गे येत आहेत. परंतु रॅलीजवळ एक हेलिपॅड होतं. अशातच पोलिसांनी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रस्त्यामार्गे येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यावेळी आम्हाला पोलीस खोटं बोलत आहेत, असं वाटलं. म्हणूनच आम्ही रस्ता रिकामा केला नाही," अशी माहिती बीकेयू क्रांतीकारीचे प्रमुख सुरजीत सिंह फूल यांनी दिली. टाईम्स नाऊशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.

... तर मार्ग रिकामा केला असता"पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना थांबवण्याचे प्रयत्न केले. परंतु पोलीस आणि शेतकऱ्यांची संख्या सारखीच होती. आम्ही मार्गातून हटलो नाही. पंतप्रधानांचा कार्यक्रम कसा बदलला याबद्दल आम्हाला माहित नाही. परंतु ते जर रस्ते मार्गानं येत असते याची कल्पना असती तर आम्ही मार्ग मोकळा केला असता," असंही ते म्हणाले.

माफीचा प्रश्नच नाही"माफी मागण्याचा कोणता प्रश्नच उद्भवत नाही. विरोध करणं हा लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे. आम्ही विरोध करू शकत नाही का? आम्ही जे काही केलं ते योग्य केलं," असंही विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फूल म्हणाले. १२-१३ शेतकरी संघटनांनी विरोध करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारनं एमएसपीवर कोणतीही समिती स्थापन न केल्यानं आंदोलन करण्यात आलं होतं. परंतु मोदींच्या रॅलीच्या जागेपासून ८ किलोमीटरवर हे आंदोलन सुरू होतं. त्यांच्या ताफ्यानं अखेरच्या क्षणी मार्ग बदलल्यानं ही स्थिती निर्माण झाल्याचंही ते म्हणाले.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPunjabपंजाबFarmerशेतकरी