शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

देशाची माफी मागून सांगतो की...; कृषी कायदे रद्द करताना PM मोदी काय म्हणाले वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 10:15 IST

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठं यश; तीन कृषी कायदे मोदी सरकारकडून रद्द

नवी दिल्ली: गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आता मोठं यश मिळालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. देशवासीयांना संबोधित करताना मोदींनी हा निर्णय घोषित केला आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी त्यांच्या घरी जावं, शेतात जाऊन काम सुरू करावं, एक नवी सुरुवात करावी, असं आवाहन मोदींनी केलं. 

देशाला संबोधित करताना काय म्हणाले मोदी?- देशात तीन कृषी कायदे आणण्यामागे उद्देश हा होता की देशातील शेतकऱ्यांना खास करून छोट्या शेतकऱ्यांना बळ मिळावं.. शेतमालाला योग्य किंमत मिळावी आणि शेतमाल विकण्यासाठी जास्त पर्याय मिळावेत.- अनेक वर्षांपासून ही मागणी शेतकरी, शेती तज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, संघटना करत होत्या. आधीही अनेक सरकारांनी मंथन केलं... यावेळीही संसदेत चर्चा झाली आणि मग हे कायदे आणण्यात आले. कानाकोपऱ्यात शेतकऱ्यांनी, संघटनांनी स्वागत केलं. त्यांचा मी आभारी आहे. 

- शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, कृषी जगताच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी, गाव-गरिबांच्या उन्नतीसाठी, शेतकऱ्यांप्रती समर्पण भावनेनं, प्रामाणिक हेतूनं कायदे सरकारनं केले. पण ही पवित्र बाब, शेतकऱ्यांच्या हिताची बाब प्रयत्न करूनही आम्ही शेतकऱ्यांना समजू शकलो नाही.- भले शेतकऱ्यांचा एक वर्ग या कायद्यांना विरोध करत होता. तरीही आमच्यासाठी हे महत्त्वाचं होतं. अर्थशास्त्रज्ञ, प्रगतीशील शेतकऱ्यांनी, तज्ज्ञांनी त्यांना हे कायदे समजावण्याचा प्रयत्न केला. नम्रपणे, मोकळ्या मनानं त्यांच्या शंका दूर करण्याचे प्रयत्न केले. अनेक माध्यमांद्वारे, व्यक्तिगत आणि सामूहिक संवाद साधला. शेतकऱ्यांची मतं, तर्क समजून घेण्यातही कसूर ठेवली नाही. 

- कायद्यातील ज्या तरतुदींबद्दल आंदोलक शेतकऱ्यांना आक्षेप होता, त्या बदलण्याची तयारी सरकारनं दर्शवली. दोन वर्षांसाठी कायदे निलंबित करण्याचाही प्रस्ताव दिला. सुप्रीम कोर्टातही हे प्रकरण गेलं.- आज देशवासियांची क्षमा मागून, प्रामाणिकपणे मी म्हणू इच्छितो की आमचे प्रयत्नच कुठेतरी कमी पडले. त्यामुळेच आम्ही शेतकऱ्यांना चांगले कायदे समजावू शकलो नाही.- आज गुरुनानकांचं पवित्र प्रकाश पर्व आहे. ही वेळ कुणालाही दोष द्यायची नाही. आज मी पूर्ण देशाला हे सांगायला आलो आहे की आम्ही तीन कृषी कायद्यांना मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या महिनाअखेरीस सुरू होणाऱ्या संसद अधिवेशनात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करू.- आंदोलक शेतकऱ्यांना मी विनंती करतो की आज पवित्र दिन है. आपापल्या घरी परत जा, शेतात जा, परिवाराकडे जा. नवी सुरुवात करू या...

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmers Protestशेतकरी आंदोलन