शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

देशाची माफी मागून सांगतो की...; कृषी कायदे रद्द करताना PM मोदी काय म्हणाले वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 10:15 IST

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठं यश; तीन कृषी कायदे मोदी सरकारकडून रद्द

नवी दिल्ली: गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आता मोठं यश मिळालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. देशवासीयांना संबोधित करताना मोदींनी हा निर्णय घोषित केला आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी त्यांच्या घरी जावं, शेतात जाऊन काम सुरू करावं, एक नवी सुरुवात करावी, असं आवाहन मोदींनी केलं. 

देशाला संबोधित करताना काय म्हणाले मोदी?- देशात तीन कृषी कायदे आणण्यामागे उद्देश हा होता की देशातील शेतकऱ्यांना खास करून छोट्या शेतकऱ्यांना बळ मिळावं.. शेतमालाला योग्य किंमत मिळावी आणि शेतमाल विकण्यासाठी जास्त पर्याय मिळावेत.- अनेक वर्षांपासून ही मागणी शेतकरी, शेती तज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, संघटना करत होत्या. आधीही अनेक सरकारांनी मंथन केलं... यावेळीही संसदेत चर्चा झाली आणि मग हे कायदे आणण्यात आले. कानाकोपऱ्यात शेतकऱ्यांनी, संघटनांनी स्वागत केलं. त्यांचा मी आभारी आहे. 

- शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, कृषी जगताच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी, गाव-गरिबांच्या उन्नतीसाठी, शेतकऱ्यांप्रती समर्पण भावनेनं, प्रामाणिक हेतूनं कायदे सरकारनं केले. पण ही पवित्र बाब, शेतकऱ्यांच्या हिताची बाब प्रयत्न करूनही आम्ही शेतकऱ्यांना समजू शकलो नाही.- भले शेतकऱ्यांचा एक वर्ग या कायद्यांना विरोध करत होता. तरीही आमच्यासाठी हे महत्त्वाचं होतं. अर्थशास्त्रज्ञ, प्रगतीशील शेतकऱ्यांनी, तज्ज्ञांनी त्यांना हे कायदे समजावण्याचा प्रयत्न केला. नम्रपणे, मोकळ्या मनानं त्यांच्या शंका दूर करण्याचे प्रयत्न केले. अनेक माध्यमांद्वारे, व्यक्तिगत आणि सामूहिक संवाद साधला. शेतकऱ्यांची मतं, तर्क समजून घेण्यातही कसूर ठेवली नाही. 

- कायद्यातील ज्या तरतुदींबद्दल आंदोलक शेतकऱ्यांना आक्षेप होता, त्या बदलण्याची तयारी सरकारनं दर्शवली. दोन वर्षांसाठी कायदे निलंबित करण्याचाही प्रस्ताव दिला. सुप्रीम कोर्टातही हे प्रकरण गेलं.- आज देशवासियांची क्षमा मागून, प्रामाणिकपणे मी म्हणू इच्छितो की आमचे प्रयत्नच कुठेतरी कमी पडले. त्यामुळेच आम्ही शेतकऱ्यांना चांगले कायदे समजावू शकलो नाही.- आज गुरुनानकांचं पवित्र प्रकाश पर्व आहे. ही वेळ कुणालाही दोष द्यायची नाही. आज मी पूर्ण देशाला हे सांगायला आलो आहे की आम्ही तीन कृषी कायद्यांना मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या महिनाअखेरीस सुरू होणाऱ्या संसद अधिवेशनात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करू.- आंदोलक शेतकऱ्यांना मी विनंती करतो की आज पवित्र दिन है. आपापल्या घरी परत जा, शेतात जा, परिवाराकडे जा. नवी सुरुवात करू या...

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmers Protestशेतकरी आंदोलन