शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
5
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
6
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
8
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
9
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
10
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
11
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
12
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
13
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
14
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
15
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
16
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
17
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
18
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
19
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
20
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन

'दोन कायद्यांनी देश चालू शकत नाही', समान नागरी कायद्याबाबत पीएम मोदी स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 14:52 IST

PM Modi in Bhopal: पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच सार्वजनिक मंचावरुन समान नागरी कायद्याचा उल्लेख केला.

PM Modi On UCC: पीएम मोदींनी मंगळवारी (27 जून) मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये 'मेरा बूथ सबसे मजबूत' या कार्यक्रमांतर्गत पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी समान नागरी कायद्याबाबत(UCC) मोठे विधान केले आहे. 'दोन कायद्यांनी घर चालू शकत नाही, त्याचप्रमाणे देशही दोन कायद्याने चालू शकत नाहीत,' असे विधान मोदींनी केले.

'दोन कायद्यांनी देश...'

यावेळी पंतप्रधान मोदींनी समान नागरी कायद्याबाबत आपले मत मांडले. 'भारताच्या संविधानात नागरिकांच्या समान अधिकारांवर जोर दिला आहे. विरोधक आमच्यावर आरोप लावतात, पण मूळात हेच लोक मुसलमान-मुसलमान करतात. यांनी मुस्लिमांच्या हिताचे निर्णय घेतले असते, तर आज बहुतांश मुस्लिम लोक शिक्षणात मागे राहिले नसते, रोजगारात मागे राहिले नसते, अडचणीचे जीवन जगत राहिले नसते. सुप्रीम कोर्टाने अनेकदा समान नागरी कायदा आणा, असे म्हटले आहे. पण, विरोधक फक्त व्होट बँकेचे राजकारण करतात,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

विरोधकांवर जोरदार टीका

यावेळी मोदींनी विरोधकांवरही जोरदार टीका केली. 'पाटण्यातील बैठकीत सर्व भ्रष्टाचाऱ्यांनी हातमिळवणी केली. घोटाळाविरोधी कारवाईतून विरोधी पक्ष पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. भ्रष्ट नेते एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मी तुम्हाला हमी देतो की, मी त्यांच्यापैकी कुणालाही सोडणार नाही,' अशी टीकी मोदींनी केली.

'भाजपची सर्वात मोठी शक्ती म्हणजे त्यांचे कार्यकर्ते आहेत. आज या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मी राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे आभार मानतो, याद्वारे मी भाजपच्या सुमारे 10 लाख बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करू शकलो. इतिहासात राजकीय पक्षाचा असा एकही कार्यक्रम आजवर झालेला नाही. तुम्ही केवळ भाजपचेच नाही, तर देशाचे संकल्प पूर्ण करण्यासाठी एक मजबूत सैनिकही आहात,' असंही मोदी म्हणाले. 

समान नागरी कायदा म्हणजे काय?समान नागरी कायदा देशातील सर्व नागरिकांसाठी समान कायदे सांगतो. म्हणजेच विवाह, घटस्फोट, मूल दत्तक घेणे, मालमत्तेचे विभाजन यासारख्या बाबींमध्ये सर्व नागरिकांसाठी समान नियम आहेत. सध्या देशात विविध धर्मांबाबत वेगवेगळे कायदे आहेत, त्यामुळे देशात समान नागरी कायदा आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMadhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेस