शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

PM मोदींनी 4 वर्षांपूर्वीच अयोध्येतील कार्यक्रमाचा...; PK नी सांगितलं काँग्रेस नेमकी कुठे चुकतेय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 17:36 IST

"मोदीजींनी अयोध्येतील राममंदिरातील प्राणप्रतिष्ठापनेचा समारंभ अशा वेळी ठेवला की, तो निवडणुकीच्या तीन महिने आधी व्हावा. हे असेच झाले नाही..."

लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक तज्ज्ञ भाजप+ विरुद्ध काँग्रेस+ यांचे मूल्यांकन करताना दिसत आहेत. भाजपचा सामना करताना विरोधक नेमके कुठे उभे आहेत, यावर सातत्याने चर्चा सुरू आहे. हाच प्रश्न निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांना विचारला असता, त्यांनी विरोधकांना काही बारीकसारीक गोष्टी समजावण्याचा प्रयत्न केला. प्रशांत किशोर म्हणाले, आपण ऐकता की, मोदीजींनी अयोध्येतील राममंदिरातील प्राणप्रतिष्ठापनेचा समारंभ अशा वेळी ठेवला की, तो निवडणुकीच्या तीन महिने आधी व्हावा. हे असेच झाले नाही.

मोदीजींनी अयोध्येसंदर्भात 4 वर्षांपूर्वीच विचार केला असेल...-  बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत पीके म्हणाले, इतर पक्षांनी विचार करण्यासारखी गोष्ट आहे की, मंदिरातील प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम जानेवारी 2024 मध्ये व्हावा, यासाठी किमान 3 ते 4 वर्षांपूर्वीच कुणी विचार केला असेल आणि त्यनुसारच मंदिराचे बांधकाम करण्यात आले. सर्व गोष्टींचा विचार त्यांनी चार वर्षांपूर्वीच केला असेल. कारण एप्रिल-मे 2024 मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत, हे सर्वांनाच माहीत आहे. 

तीन वर्षांपूर्वीच करायला हवी होती आघाडी - किशोर म्हणाले, जर ही गोष्ट मोदींना माहीत आहे, ते त्या दिशेने काम करत आहेत, पत्रकारांनाही माहीत आहे, तर मग हे विरोधकांना का माहीत नव्हतं, की मंदिर निवडणुकीपूर्वीच उभे राहील, प्राणप्रतिष्ठा होईल, त्याला काउंटर करण्यासाठी आपल्याकडे काहीही नाही. कसल्याही प्रकारची तयारी नाही. तो विचार कधी नव्हताच. जागा वाटप आज होवो अथवा 6 महिन्यांपूर्वी होवो, निवडणुकीची वेळ तर सर्वांनाच माहीत होती. जे लोक आज I.N.D.I.A.मध्ये आहेत. त्यांना ही आघाडी तयार करण्यापासून कुणी रोखले होते का? तीन वर्षांपूर्वीच त्यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा उचलला असता, तीन वर्षांपूर्वीच जागावाटप केले असते. त्यांच वेळी त्यांनी आपल्या आघाडीचे नाव 'I.N.D.I.A.' ठेवले असते.

किशोर पुढे म्हणाले, विरोधकांची ही आघाडी तीन वर्षांपूर्वीच अस्तित्वात आली असती, तर अधिकांश लोकांना ती समजली असती. त्याच वेळी जागावाटप झाले असते, तर आपल्या मतदारसंघात कोणता पक्ष निवडणूक लढवणार हेही लोकांना अधिक कळले असते. त्यांना कुणी रोखले होते? गेल्या काही दिवसांपूर्वीच काँग्रेसची आप आणि सपासोबतची युती निश्चित झाली होती. पीके यांनी याला फार उशीर झाल्याचे म्हटले आहे.

400+ एक प्रेशर...- किशोर म्हणाले, आम्ही 400 जागांवर जिंकत आहोत, असे पंतप्रधा नरेंद्र मोदी संसदेत उभे राहून म्हणत आहेत. ते एक सायकलॉजिकल प्रेशर तयार करत आहेत. अर्थात जय-पराजयावर चर्चाच होत नाहीय. आता लोक विचारत आहेत, की 400 येणार की नाही.

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरcongressकाँग्रेसBJPभाजपाlok sabhaलोकसभाNarendra Modiनरेंद्र मोदी